शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

“बोलायला लावू नका, आम्ही काय आणि कोणत्या माळ्यावर पोहोचवलं हे ‘त्या’ दिवशी सांगेन”

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2023 09:52 IST

नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल

“शिवसेनेची काय अवस्था झालीये. ४० आमदार दिवसाढवळ्या एकनाथ शिंदेंसोबत जातात आणि शिवसैनिक उघड्या डोळ्यांनी पाहतात. उद्धव ठाकरे रडले की हे रडतात. रडणारी शिवसेना कधीच नव्हती, लढणारी शिवसेना होती. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आम्ही सांगायचो. आता कुठे आहे सळसळतं रक्त,” असं म्हणत भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जोरदार हल्लाबोल केला. मुंबईतील एका कार्यक्रमात ते बोलत होते.

“हे दुसऱ्यांना खोके म्हणतात. तुम्ही नाही का घेतले खोके? आम्ही काय मातोश्रीवर गुच्छ घेऊन जायचो का मातोश्रीवर? उद्धव ठाकरे सांगतील त्या दिवशी आम्ही काय काय आणि कोणत्या कोणत्या माळ्यावर पोहोचवलं हे सांगेन. आम्हाला बोलायला लावू नका, वयाच्या १५ व्या वर्षापासून मी शिवसेनेत होतो. बाळासाहेबांसाठी आम्ही वेडे होतो. त्यांनी प्रेमही दिलं आणि विश्वासही दिला. त्यामुळे आम्ही त्यागाला तयार होतो. जीवाची पर्वा केली नाही. संपादकाचाही पगार घ्यायचा आणि नेता म्हणूनही तोडबाजी करायची असं नाही,” असं म्हणत राणे यांनी उद्धव ठाकरेंवर टीकेचा बाण सोडला.

“शिवसेनेसाठी शिवसैनिकांचा त्याग आहे आणि आयत्या बिळावर उद्धव ठाकरे अडीच वर्ष बसले. सिंधुदुर्ग रत्नागिरीबद्दल सांगायचं तर काय केलं? मी पालकमंत्री होतो तेव्हा सिंधुदुर्ग जिल्ह्याला पावणे दोनशे कोटी रुपये दिले. यांनी सव्वाशे कोटींवर दिले नाहीत आणि तेही खर्च केले नाहीत. कोकणासाठी काय केलं?” असा सवालही त्यांनी केला. 

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे Shiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेBJPभाजपा