शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

भावना गवळी यांनी 22 वर्षांत केला १०० कोटींचा घोटाळा, आपल्याकडे सबळ पुरावे; किरीट सोमय्यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2021 18:57 IST

"खासदार भावना गवळी व समुहाने कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केला. त्याचे सबळ पुरावेदेखील आहेत. असे असतानाही त्यांच्याविरूद्ध अद्याप कुठलीच कारवाई झालेली नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पोलीस प्रशासन गवळींना ‘प्रोटेक्ट’ करित आहेत."

वाशिम- यवतमाळ लोकसभा मतदारसंघाच्या खासदार भावना गवळी (Bhavana Gawli) यांनी खासदारकीच्या २२ वर्षांच्या कारकिर्दीत तब्बल १०० कोटींचा घोटाळा केला, असा घणाघाती आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केला आहे. एवढेच नाही तर, घोटाळ्याचे आपल्याकडे सबळ पुरावे असून ईडी, सीबीआय, सहकार मंत्री, आयकर विभाग यासह अन्य ठिकाणी तक्रारी करण्यात आल्याचेही त्यांनी म्हटले आहे. ते आज भाजपच्या जिल्हा कार्यालयात पत्रकारांशी बोलत होते. (BJP leader Kirit Somaiya says Bhavana Gawli committed a scam of Rs 100 crore in 22 years, we have strong evidence)

शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांनी त्यांच्या कार्यालयातून पहाटे पाच वाजता ७ कोटींची रक्कम चोरीला गेल्याची तक्रार (एएफआयआर क्रमांक ३८९/२०२०) तब्बल दहा महिन्यानंतर रिसोड पोलिसांत दाखल केली. मुळात एवढी मोठी रक्कम कार्यालयात ठेवण्याची कारण काय? त्यातही ही रक्कम गवळी यांच्याकडे नेमकी कोठून आली, असा सवाल त्यांनी गवळींऐवजी थेट शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना केला. महामार्गाचे काम करणाऱ्या कंत्राटदारांकडून केल्या जाणाऱ्या वसूलीतून हा पैसा जमला का, असाही प्रश्न यावेळी सोमय्या यांनी उपस्थित केला. 

किरीट सोमय्या यांच्या ताफ्यावर शिवसैनिकांकडून दगडफेक, कारवर फेकली शाई 

याच बरोबर, ५५ कोटींचा बालाजी पार्टीकल बोर्ड कारखाना खासदार भावना गवळी यांनी केवळ २५ लाखाला खरेदी केला. या व्यवहारातही मोठ्या प्रमाणात घोटाळा झालेला आहे. त्यांच्याकडे स्टेट बॅंक ऑफ इंडियासह इतर काही बॅंकांचे ११ कोटींचे कर्ज आहे, असे सांगून आपली मालमत्ता बॅंकेने जप्त केली का? डीफॉल्टर झाल्याचे बॅंकांनी घोषित केले का? असे प्रश्न सोमय्या यांनी यावेळी उपस्थित केले. 

यावेळी पत्रकार परिषदेला भाजपा जिल्हाध्यक्ष तथा आमदार राजेंद्र पाटणी, भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष राजू पाटील राजे, तेजराव पाटील थोरात आदिंची उपस्थिती होती.

प्रताप सरनाईक यांचा किरीट सोमय्या यांच्याविरोधात दाखल केला १०० कोटींचा दावा"मुख्यमंत्री ठाकरे व पोलीस गवळींना ‘प्रोटेक्ट’ करित आहेत" -खासदार भावना गवळी व समुहाने कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केला. त्याचे सबळ पुरावेदेखील आहेत. असे असतानाही त्यांच्याविरूद्ध अद्याप कुठलीच कारवाई झालेली नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पोलीस प्रशासन गवळींना ‘प्रोटेक्ट’ करित आहेत. हेच त्यामागील मुख्य कारण असल्याचे भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे.

 

टॅग्स :Kirit Somaiyaकिरीट सोमय्याBJPभाजपाShiv Senaशिवसेनाwashimवाशिम