शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Vidhan Sabha: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधान भवनात असूनही सभागृहात का आले नाहीत?; देवेंद्र फडणवीसांचा थेट सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2021 17:58 IST

Maharashtra Vidhan Sabha: प्रसारमाध्यमांशी बोलताना महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधत करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

ठळक मुद्देदेवेंद्र फडणवीस यांची महाविकास आघाडीवर जोरदार टीकामुख्यमंत्री सभागृहात उपस्थित राहत नसल्याबाबत फडणवीसांचा थेट सवालमनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचे विधानसभेत तीव्र पडसाद

मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या घराबाहेर आढळून आलेल्या स्फोटकं प्रकरणात स्कॉर्पियो गाडीचे मालक मनसुख हिरेन याचा यांचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आला होता. (Mansukh Hiren Death Case)  या मृत्यू प्रकरणाचे तीव्र पडसाद आज विधानसभेत उमटले. सचिन वाझे यांनीच मनसुख हिरेन यांचा खून केल्याचा दावा करत वाझे यांना तत्काळ निलंबित करण्या यावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. (bjp leader devendra fadnavis slams on uddhav thackeray over legislative attendance)

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी या एकूणच प्रकरणावरून जोरदार टीकास्त्र सोडले. प्रसारमाध्यमांशी बोलताना महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधत करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. विधानसभा अध्यक्षांच्या दालनात अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना हटवायला पाहिजे, असे म्हणाले होते. परंतु, मुख्यमंत्र्यांना भेटल्यानंतर अचानक बदलले, असा दावा फडणवीसांनी केला. 

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी 'या' ५ मुद्द्यांचे अद्यापही कोडे; ATS चे धक्कादायक खुलासे 

मुख्यमंत्री सभागृहात आले नाहीत 

सभागृहातील वातावरण गंभीर होतं, तेव्हा मुख्यमंत्री येतात. सभागृह शांत करतात. अध्यक्षांसोबत बैठका करतात. मात्र, विधीमंडळात उपस्थित असूनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सभागृहात आले नाहीत, अध्यक्षांकडेही आले नाहीत, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली. अध्यक्षांकडे ठरलं ते मुख्यमंत्र्यांकडे गेल्यावर का बदललं, अशी विचारणा देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली. 

अशा प्रकरणांच्या तपासासाठी SIT, NIA सक्षम

मनसुख हिरेन प्रकरणात ज्यांच्यावर संशयाची सूई त्यांच्याकडेच तपासाची सूत्र होती, असे म्हणत अशा प्रकरणांच्या तपासासाठी SIT, NIA सक्षम आहेत. काय शिजलंय हे बाहेर येऊ नये, म्हणूनच कारवाई होत नाहीए, असा दावाही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना केला.

दरम्यान, राज्याच्या गृहमंत्र्यांनी याची माहिती करून घ्यावी की रायपूर हे मध्य प्रदेशात नव्हे, तर छत्तीसगडमध्ये येतं आणि तिथं काँग्रेसचं सरकार आहे. महाराष्ट्रात येऊन लोक आत्महत्या करत आहेत याची खुशी गृहमंत्र्यांना होत असेल तर हा महाराष्ट्र आता पर्यटनाचा नव्हे, तर आत्महत्येचं डेस्टिनेशन होतोय का? याची माहिती राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी द्यावी, असा घणाघात देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केला. 

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाVidhan Bhavanविधान भवनDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरेAnil Deshmukhअनिल देशमुखMansukh Hirenमनसुख हिरणsachin Vazeसचिन वाझे