शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
2
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
3
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
4
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
5
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
6
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
7
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
8
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
9
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
10
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
11
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
12
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
13
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
14
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
15
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
16
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
17
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
18
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
19
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या
20
Mohammad Nabi Fastest Fifty : एका षटकात ५ षटकार! युवीचा विक्रम आला होता धोक्यात, पण...

Maharashtra Vidhan Sabha: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधान भवनात असूनही सभागृहात का आले नाहीत?; देवेंद्र फडणवीसांचा थेट सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2021 17:58 IST

Maharashtra Vidhan Sabha: प्रसारमाध्यमांशी बोलताना महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधत करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

ठळक मुद्देदेवेंद्र फडणवीस यांची महाविकास आघाडीवर जोरदार टीकामुख्यमंत्री सभागृहात उपस्थित राहत नसल्याबाबत फडणवीसांचा थेट सवालमनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचे विधानसभेत तीव्र पडसाद

मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या घराबाहेर आढळून आलेल्या स्फोटकं प्रकरणात स्कॉर्पियो गाडीचे मालक मनसुख हिरेन याचा यांचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आला होता. (Mansukh Hiren Death Case)  या मृत्यू प्रकरणाचे तीव्र पडसाद आज विधानसभेत उमटले. सचिन वाझे यांनीच मनसुख हिरेन यांचा खून केल्याचा दावा करत वाझे यांना तत्काळ निलंबित करण्या यावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. (bjp leader devendra fadnavis slams on uddhav thackeray over legislative attendance)

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी या एकूणच प्रकरणावरून जोरदार टीकास्त्र सोडले. प्रसारमाध्यमांशी बोलताना महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधत करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. विधानसभा अध्यक्षांच्या दालनात अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना हटवायला पाहिजे, असे म्हणाले होते. परंतु, मुख्यमंत्र्यांना भेटल्यानंतर अचानक बदलले, असा दावा फडणवीसांनी केला. 

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी 'या' ५ मुद्द्यांचे अद्यापही कोडे; ATS चे धक्कादायक खुलासे 

मुख्यमंत्री सभागृहात आले नाहीत 

सभागृहातील वातावरण गंभीर होतं, तेव्हा मुख्यमंत्री येतात. सभागृह शांत करतात. अध्यक्षांसोबत बैठका करतात. मात्र, विधीमंडळात उपस्थित असूनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सभागृहात आले नाहीत, अध्यक्षांकडेही आले नाहीत, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली. अध्यक्षांकडे ठरलं ते मुख्यमंत्र्यांकडे गेल्यावर का बदललं, अशी विचारणा देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली. 

अशा प्रकरणांच्या तपासासाठी SIT, NIA सक्षम

मनसुख हिरेन प्रकरणात ज्यांच्यावर संशयाची सूई त्यांच्याकडेच तपासाची सूत्र होती, असे म्हणत अशा प्रकरणांच्या तपासासाठी SIT, NIA सक्षम आहेत. काय शिजलंय हे बाहेर येऊ नये, म्हणूनच कारवाई होत नाहीए, असा दावाही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना केला.

दरम्यान, राज्याच्या गृहमंत्र्यांनी याची माहिती करून घ्यावी की रायपूर हे मध्य प्रदेशात नव्हे, तर छत्तीसगडमध्ये येतं आणि तिथं काँग्रेसचं सरकार आहे. महाराष्ट्रात येऊन लोक आत्महत्या करत आहेत याची खुशी गृहमंत्र्यांना होत असेल तर हा महाराष्ट्र आता पर्यटनाचा नव्हे, तर आत्महत्येचं डेस्टिनेशन होतोय का? याची माहिती राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी द्यावी, असा घणाघात देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केला. 

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाVidhan Bhavanविधान भवनDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरेAnil Deshmukhअनिल देशमुखMansukh Hirenमनसुख हिरणsachin Vazeसचिन वाझे