शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
2
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
5
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
6
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
7
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
8
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
9
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
10
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
11
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
12
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
13
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
14
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
15
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
16
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
17
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा
18
परवाना परत करण्याचे कारण काय? गैरकृत्य होत असल्याचे अप्रत्यक्षपणे मान्य: अनिल परब
19
आता जगभरात व्यापार युद्धाचा भडका! अमेरिकेकडून ७० देशांसाठीही शुल्काची यादी जाहीर
20
कांजूर डम्पिंग ग्राउंड सुरूच राहणार; सुप्रीम कोर्टाचा मुंबई पालिकेला मोठा दिलासा

Devendra Fadnavis On Rahul Gandhi: “बिलावल भुट्टो आणि राहुल गांधी एकाच दिवशी कसे बोलतात? याचंच आश्चर्य”: देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2022 16:41 IST

Devendra Fadnavis On Rahul Gandhi: चीनवरून काही बोलायचा अधिकारच राहुल गांधींना नाही, असे प्रत्युत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

Devendra Fadnavis On Rahul Gandhi: काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला १०० दिवस पूर्ण झाले आहेत. राहुल गांधी यांनी भारत आणि चीनच्या सैनिकांमधील संघर्षावरून मोदी सरकारवर टीका केली. या टीकेला भाजप नेत्यांकडून उत्तर दिले जात आहे. याशिवाय बिलावल भुट्टो यांनी केलेल्या विधानावरूनही भाजप आक्रमक झाली आहे. या दोन्ही मुद्द्यांवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. 

सरकार चीनच्या मुद्द्याकडे सतत दुर्लक्ष करत आहे. पण त्याकडे दुर्लक्ष करता येत नाही आणि लपवताही येत नाही. चीनची कारवाई सुरू आहे. चीन घुसखोरीच्या नाही, युद्धाच्या तयारीत आहेत. भारत सरकार झोपले आहे. मी त्यांना या संदर्भात तीन-चार वेळा बोललो. परराष्ट्र मंत्र्यांनी आपली समज वाढवली पाहिजे, अशी टीका राहुल गांधी यांनी केली होती. यावर देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींना प्रत्युत्तर दिले.  

चीनवरून काही बोलायचा अधिकारच राहुल गांधींना नाही

मी राहुल गांधींना आठवण करून देतो की, भारताचा भूभाग चीनला जेव्हा जेव्हा दिला, त्या त्या वेळेस त्यांच्या परिवारातील लोक देशाचे नेतृत्व करत होते. ते पंतप्रधान होते. भारताचा भूभाग गेल्यानंतर तुम्ही काहीही करू शकला नाहीत. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात डोकलाममध्ये चीनला आपण रोखले. त्यानंतर सातत्याने आपण चीनला रोखले. भारताची एक इंचही जागा चीनला घेऊ दिली नाही. याउलट, चीनने एक स्टेटमेंट काढलेय की, भारताने आमच्या हद्दीत येऊन अतिक्रमण केले. हे म्हणायची वेळ आज चीनवर आली आहे. चीनवरून काही बोलायचा अधिकारच राहुल गांधींना नाही, असा पलटवार देवेंद्र फडणवीस यांनी केला. 

बिलावल भुट्टो आणि राहुल गांधी एकाच दिवशी कसे बोलतात? याचंच आश्चर्य

मला एका गोष्टीचे आश्चर्य वाटते की, बिलावल भुट्टो आणि राहुल गांधी एकाच दिवशी कसे बोलतात. राष्ट्राच्या प्रति तुमच्या संवेदना काय आहेत, हे यातून लक्षात येते. बिलावल भुट्टो हे एका अयशस्वी देशाचे मंत्री आहेत. त्यांना कुणीही गांभीर्याने घेत नाही. एका दहशवादी देशाचे मंत्री असून, जगाने त्यांना दहशतवादी ठरवलेले आहे. त्यांच्या बोलण्याचा काहीही महत्त्व नाही. परंतु, देशाच्या पंतप्रधानांबद्दल असे विधान केल्यावर देशातील प्रमुख विरोधी पक्षांच्या नेत्यांनी देशहित लक्षात घेऊन त्यांविरोधात आवाज उठवायला हवा होता. पण त्यांनी तसे केले नाही. हे अतिशय चुकीचे आहे. 

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय मंचावर भारताविरोधात प्रक्षोभक विधाने केली जात आहेत. पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल जरदारी भुत्तो सातत्याने भारतावर टीका करत आहेत. न्यूयॉर्कमधील एका पत्रकार परिषदेत बिलावल भुत्तो यांनी सर्व मर्यादा पार करत मुक्ताफळे उधळली. नरेंद्र मोदी हे पंतप्रधान होण्यापूर्वी अमेरिकेने त्यांच्या अमेरिकेतील प्रवेशावर बंदी घातली होती. नरेंद्र मोदी आणि एस. जयशंकर हे भारताचे नाही तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पंतप्रधान आणि परराष्ट्रमंत्री आहेत. पाकिस्तानमधील दहशतवादाला शेजारील देशाकडून प्रोत्साहन मिळत आहे. भारत सरकार गांधीजींच्या विचारसरणीवर विश्वास ठेवण्यापेक्षा त्यांच्या हत्याऱ्यांच्या विचारांवर विश्वास ठेवते. भारत सरकारवर हिलटलरचा प्रभाव आहे, अशी मुक्ताफळे बिलावल भुत्तो यांनी उधळली.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसRahul Gandhiराहुल गांधी