शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

Devendra Fadnavis On Rahul Gandhi: “बिलावल भुट्टो आणि राहुल गांधी एकाच दिवशी कसे बोलतात? याचंच आश्चर्य”: देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2022 16:41 IST

Devendra Fadnavis On Rahul Gandhi: चीनवरून काही बोलायचा अधिकारच राहुल गांधींना नाही, असे प्रत्युत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

Devendra Fadnavis On Rahul Gandhi: काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला १०० दिवस पूर्ण झाले आहेत. राहुल गांधी यांनी भारत आणि चीनच्या सैनिकांमधील संघर्षावरून मोदी सरकारवर टीका केली. या टीकेला भाजप नेत्यांकडून उत्तर दिले जात आहे. याशिवाय बिलावल भुट्टो यांनी केलेल्या विधानावरूनही भाजप आक्रमक झाली आहे. या दोन्ही मुद्द्यांवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. 

सरकार चीनच्या मुद्द्याकडे सतत दुर्लक्ष करत आहे. पण त्याकडे दुर्लक्ष करता येत नाही आणि लपवताही येत नाही. चीनची कारवाई सुरू आहे. चीन घुसखोरीच्या नाही, युद्धाच्या तयारीत आहेत. भारत सरकार झोपले आहे. मी त्यांना या संदर्भात तीन-चार वेळा बोललो. परराष्ट्र मंत्र्यांनी आपली समज वाढवली पाहिजे, अशी टीका राहुल गांधी यांनी केली होती. यावर देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींना प्रत्युत्तर दिले.  

चीनवरून काही बोलायचा अधिकारच राहुल गांधींना नाही

मी राहुल गांधींना आठवण करून देतो की, भारताचा भूभाग चीनला जेव्हा जेव्हा दिला, त्या त्या वेळेस त्यांच्या परिवारातील लोक देशाचे नेतृत्व करत होते. ते पंतप्रधान होते. भारताचा भूभाग गेल्यानंतर तुम्ही काहीही करू शकला नाहीत. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात डोकलाममध्ये चीनला आपण रोखले. त्यानंतर सातत्याने आपण चीनला रोखले. भारताची एक इंचही जागा चीनला घेऊ दिली नाही. याउलट, चीनने एक स्टेटमेंट काढलेय की, भारताने आमच्या हद्दीत येऊन अतिक्रमण केले. हे म्हणायची वेळ आज चीनवर आली आहे. चीनवरून काही बोलायचा अधिकारच राहुल गांधींना नाही, असा पलटवार देवेंद्र फडणवीस यांनी केला. 

बिलावल भुट्टो आणि राहुल गांधी एकाच दिवशी कसे बोलतात? याचंच आश्चर्य

मला एका गोष्टीचे आश्चर्य वाटते की, बिलावल भुट्टो आणि राहुल गांधी एकाच दिवशी कसे बोलतात. राष्ट्राच्या प्रति तुमच्या संवेदना काय आहेत, हे यातून लक्षात येते. बिलावल भुट्टो हे एका अयशस्वी देशाचे मंत्री आहेत. त्यांना कुणीही गांभीर्याने घेत नाही. एका दहशवादी देशाचे मंत्री असून, जगाने त्यांना दहशतवादी ठरवलेले आहे. त्यांच्या बोलण्याचा काहीही महत्त्व नाही. परंतु, देशाच्या पंतप्रधानांबद्दल असे विधान केल्यावर देशातील प्रमुख विरोधी पक्षांच्या नेत्यांनी देशहित लक्षात घेऊन त्यांविरोधात आवाज उठवायला हवा होता. पण त्यांनी तसे केले नाही. हे अतिशय चुकीचे आहे. 

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय मंचावर भारताविरोधात प्रक्षोभक विधाने केली जात आहेत. पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल जरदारी भुत्तो सातत्याने भारतावर टीका करत आहेत. न्यूयॉर्कमधील एका पत्रकार परिषदेत बिलावल भुत्तो यांनी सर्व मर्यादा पार करत मुक्ताफळे उधळली. नरेंद्र मोदी हे पंतप्रधान होण्यापूर्वी अमेरिकेने त्यांच्या अमेरिकेतील प्रवेशावर बंदी घातली होती. नरेंद्र मोदी आणि एस. जयशंकर हे भारताचे नाही तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पंतप्रधान आणि परराष्ट्रमंत्री आहेत. पाकिस्तानमधील दहशतवादाला शेजारील देशाकडून प्रोत्साहन मिळत आहे. भारत सरकार गांधीजींच्या विचारसरणीवर विश्वास ठेवण्यापेक्षा त्यांच्या हत्याऱ्यांच्या विचारांवर विश्वास ठेवते. भारत सरकारवर हिलटलरचा प्रभाव आहे, अशी मुक्ताफळे बिलावल भुत्तो यांनी उधळली.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसRahul Gandhiराहुल गांधी