शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

Maharashtra Political Crisis: ऐकावं ते नवलंच; देवेंद्र फडणवीस उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री! चर्चांना उधाण, नेमकं प्रकरण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2022 09:53 IST

Maharashtra Political Crisis: देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत, हे सर्वश्रुत असले तरी, सोशल मीडियावर वेगळीच चर्चा रंगली आहे. जाणून घ्या...

मुंबई: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ४० आमदारांसह शिवसेनेतून ऐतिहासिक बंडखोरी करत भाजपच्या देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासोबत नवे सरकार स्थापन केले. एकनाथ शिंदे यांनी यांनी मुख्यमंत्रीपदाची आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन राजकीय वर्तुळाला मोठा धक्का दिला. मात्र, देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे नाही, तर उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री असल्याच्या चर्चांना सोशल मीडियावर चांगलाच ऊत आला आहे. नेमके असे काय घडले, ते जाणून घेऊया...

एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर भाजपने शिंदे गटाला पाठिंबा देत सत्ता स्थापनेचा दावा केला. यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील, अशी घोषणा करत आपण मंत्रिमंडळाचा भाग नसू, असे जाहीर केले होते. मात्र, अवघ्या काही मिनिटांत भाजपच्या पक्षश्रेष्ठींकडून देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याचे आदेश आले. पक्षादेश मानून इच्छा नसतानाही देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. आता मात्र, गुगलवर सर्च केल्यास देवेंद्र फडणवीस हे उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री असल्याचे दाखवले जात आहे. यावरून सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. 

गुगल म्हणतंय देवेंद्र फडणवीस उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री

देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत हे संपूर्ण देशाला माहिती आहे. मात्र, गुगलवर काही वेगळेच दिसत आहे. गुगलवर देवेंद्र फडणवीस याचे नाव टाकून सर्च केल्यावर उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री अशी माहिती समोर येते. गुगलकडून काहीतरी चूक झाल्याने हा प्रकार घडला असावा, असे सांगितले जात आहे. मात्र, या चुकीची सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चा आहे. ३० जून रोजी देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्याआधी त्यांना विरोधी पक्षनेते म्हणून अडीच वर्षे काम केले. ठाकरे सरकारला अनेक मुद्द्यांवरून घेरले. विरोधी पक्षनेते होण्यापूर्वी फडणवीस ५ वर्षे मुख्यमंत्री होते. ३१ ऑक्टोबर २०१४ ते १२ नोव्हेंबर २०१९ या कालावधीत फडणवीसांनी महाराष्ट्राचे नेतृत्त्व केले.

दरम्यान, गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात सत्तासंघर्ष शिगेला पोहोचला. शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापनेची तयारी केली असताना २३ नोव्हेंबरला फडणवीस यांनी अजित पवारांसोबत पहाटे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊन राजकीय वर्तुळाला प्रचंड मोठा झटका दिला. शरद पवारांनी सुत्रे फिरल्याने हे सरकार अल्पकाळ टिकले. त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. महाविकास आघाडीचे सरकार अडीच वर्षांनंतर कोसळले आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री, तर फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. देवेंद्र फडणवीस हे राज्याचे नववे उपमुख्यमंत्री आहेत. 

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपा