शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
3
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
4
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
5
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
6
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
8
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
9
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
10
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
11
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
12
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
13
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
14
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
15
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
16
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
17
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
18
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
19
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
20
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?

राज्य सरकारचा जनतेला केवळ त्रास, मुख्यमंत्र्यांचं भाषणच कळलं नाही; फडणवीसांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2021 13:23 IST

devendra fadnavis criticised cm uddhav thackeray: नागपूर येथे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांनी भाषण का केलं, ते समजलं नाही - फडणवीसदोन दिवसांत काय होणार आहे? - फडणवीस यांची विचारणाराज्य सरकारचा जनतेला केवळ त्रास - फडणवीसांचा आरोप

नागपूर: राज्यातील कोरोनाची परिस्थिती आणि लॉकडाऊन होणार का, यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी रात्री राज्यातील जनतेला संबोधित केले. मात्र, यावरून आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला असून, संपूर्ण कोरोना परिस्थितीत कोणते राज्य आपल्याच जनतेला त्रास देत असेल, तर ते महाराष्ट्र आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी कशासाठी भाषण केलं हेच समजलं नाही, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. (devendra fadnavis criticised cm uddhav thackeray) 

नागपूर येथे बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. कोरोनाच्या काळात केंद्र सरकारने २० लाख कोटींचे पॅकेज गेल्या वर्षभरात दिले. देशातील अन्य राज्यांनीही जनतेसाठी पॅकेज दिले. केवळ महाराष्ट्राने एक पैशांचेही पॅकेज दिले नाही. मात्र, त्याऐवजी लोकांचे वीज कनेक्शन कापणे, लोकांना त्रास देणे यावरच भर दिला, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली. 

पश्चिम बंगालमध्ये प्रचार जोमात, अर्थव्यवस्था कोमात; रोजगारातही मोठी घट

मुख्यमंत्र्यांनी भाषण का केलं, ते समजलं नाही

मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी केलेल्या आपल्या भाषणात कोरोना वाढण्याची कारणे सांगितली नाही की, उपाययोजना सांगितल्या नाहीत. मुख्यमंत्र्यांनी भाषण कशासाठी केले? तेच समजले नाही, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. राज्यात अनेक ठिकाणी बेड उपलब्ध होत नाही. ते का मिळत नाहीत, त्यावर काय करणार आहोत, उपाययोजना काय, व्यवस्था का नाही, याचे उत्तर द्यायला हवे होते. पण मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना उत्तर दे, टोलेबाजी कर, सल्ला देतात त्यांना उत्तर दे यातच वेळ घालवला, या शब्दांत फडणवीस यांनी निशाणा साधला.

दोन दिवसांत काय होणार आहे?

मुख्यमंत्री लॉकडाऊनसाठी दिलेल्या अल्टिमेटमवरही देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली. मुख्यमंत्री म्हणतात की, दोन दिवसांत बघा. काय दोन दिवसांत बघायचंय, अशी खिल्ली उडवत लॉकडाऊन अपवादात्मक परिस्थितीत करावे लागते. तो अपवाद आहे, नियम होऊ शकत नाही. लॉकडाऊनला आमचा विरोध नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन करताना देशातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणारे अन्नधान्य, खात्यावर जाणारे पैसे, अन्य सुविधा यांचाही विचार केला होता. मुख्यमंत्र्यांनीही तेच करायला हवे. केवळ जगभरातील देशात कोरोना कसा वाढतो हे सांगून चालणार नाही, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.  

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसUddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसState Governmentराज्य सरकारPoliticsराजकारण