शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

“एकीकरण समितीचा पराभव दुर्देवी, राऊत ज्यांच्या प्रचाराला जातात त्याची हार होते”

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2023 16:11 IST

कर्नाटकात काँग्रेसला बहुमत मिळाल्याचं जवळपास स्पष्ट झालं आहे. निकालांनंतर भाजप नेत्याची टीका.

“कर्नाटकातले जे ट्रेण्ड आणि निकाल समोर दिसतायत ते आम्हाला अपेक्षित असलेले निकाल नाहीत. अपेक्षित यश मिळताना दिसत नाही. काँग्रेसच्या बाजूनं झुकाव दिसतोय. भारतीय जनता पार्टी याबाबत विश्लेषण, विच्छेदन, विचार करेल आणि संवाद करून आवश्यक तो निर्णय घेईल,” अशी प्रतिक्रिया भाजप मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांनी दिली. 

“काँग्रेस जिंकल्यावर यांच्या मनात उकळ्या फुटायला लागल्या. दुसऱ्यांच्या घरात काही झाल्यावर पेढे वाटायचं काम उद्धव ठाकरे आणि संजय राऊत करतील. आता उद्धव ठाकरे माध्यमांसमोर येऊन आकाडतांडव करतील. उद्धव ठाकरे आणि राऊंतांच्या शिवसेनेकडून काय अपेक्षा करणार. ते आता केरला स्टोरी, बंजरंग दलावर बंदीची मागणी करतील. हनुमान चालिसाला विरोध त्यांनी आधी केलाच आहे. कर्नाटकात काँग्रेसनं विशिष्ट वर्गाचं लांगूलचालन करण्याचा जो प्रकार केला, तोच संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंकडून आम्हाला अपेक्षित आहे. मात्र या विरोधात आमचा विचारांचा संघर्ष सुरूच राहील,” असंही शेलार यांनी स्पष्ट केलं.

महाराष्ट्र एकीकरण समिती बाबतचा निकाल दुर्दैवी आणि अनाकलनीय आहे. पण जिथे जिथे संजय राऊत जातील तिथे तिथे पराभव त्यांच्या लोकांचा होईलच. संजय राऊत तिथे गेल्याने महाराष्ट्र एकीकरण समितीला झटका खायला लागलाय हे त्यातलं सत्य असल्याचं म्हणत त्यांनी निशाणा साधला.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतKarnataka Electionकर्नाटक विधानसभा निवडणूकAshish Shelarआशीष शेलार