शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

Keshav Upadhye : "सत्तेच्या मस्तीत राजाची गुंग होती मती, मुलाखत म्हणजे हास्यजत्रेच्या करामती"; भाजपाने उडवली खिल्ली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2023 10:19 IST

BJP Keshav Upadhye slams Uddhav Thackeray : भाजपाचे नेते केशव उपाध्ये यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे.

उद्धव ठाकरे यांनी "माझ्याकडे येण्याची त्यांची हिंमत नाही. आले तर वैगेर विषयच नाही. येऊच शकत नाहीत. त्यांची हिंमत नाही. त्यांना माझा स्वभाव माहिती आहे. शिवसेनेची विचारधारा म्हणजेच बाळासाहेबांची विचारधारा काय आहे हे त्यांना माहिती आहे" अशा शब्दांत शिंदे गटातील आमदारांवर निशाणा साधला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते फुटल्यानंतरही शरद पवारांच्या भेटीला गेले. तसे शिंदेंकडे गेलेले आमदार तुम्हाला भेटण्यासाठी आले तर या संजय राऊतांच्या प्रश्नावर ठाकरेंनी स्पष्ट शब्दांत उत्तर दिले आहे. या मुलाखतीवरून भाजपाने आता खिल्ली उडवली आहे. 

"सत्तेच्या मस्तीत राजाची गुंग होती मती, मुलाखत म्हणजे हास्यजत्रेच्या करामती" असं म्हणत निशाणा साधला आहे. भाजपाचे नेते केशव उपाध्ये यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "‘वजीर’ देतो शिव्या, राखण्या राजाची मर्जी, सारीपाटावर दोघांना मोहऱ्यांची एलर्जी, घरातनं बाहेर न पडलेला पाहिलाय 'राजा' शेवटी, चेकमेट झाला अन् उडाला बँडबाजा!" असं म्हणत केशव उपाध्ये यांनी हल्लाबोल केला आहे. 

"‘विपरीत बुद्धी’ वाल्यांचा बुद्धिबळाचा डाव,प्यादी निघून गेल्याचा सहनच होईना घाव!इथे सरळ चालतो उंट अन् हत्ती तिरका,आता, फक्त राजाच शिल्लक आहे बरं का !

सत्तेच्या मस्तीत ‘राजा’ची गुंग होती मती,मुलाखत म्हणजे हास्यजत्रेच्या करामती !प्रत्येक प्रश्नावर नुसत्या तोंडच्याच वाफातीच जुनी कॅसेट आणि नुसत्याच थापा !

‘वजीर’ देतो शिव्या, राखण्या राजाची मर्जी,सारीपाटावर दोघांना मोहऱ्यांची एलर्जी,घरातनं बाहेर न पडलेला पाहिलाय 'राजा'शेवटी, चेकमेट झाला अन् उडाला बँडबाजा!" असं केशव उपाध्ये यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

उद्धव ठाकरेंनी "माझ्याविरोधात अख्खा भाजपा आहे. कोणताही नेता आला तरी उद्धव ठाकरेंशिवाय दुसरे बोलत नाही. शिवसेना चोरली आहे. चिन्ह चोरलं. माझे वडील चोरण्याचा प्रयत्न करत आहात. तरीदेखील उद्धव ठाकरेंची भीती वाटते. उद्धव ठाकरे ही व्यक्ती नव्हे तर बाळासाहेबांचे विचार आहेत. मोदींच्याविरोधात ही लढाई नाही तर हुकुमशाहीच्या विरोधात आहे. मला भाजपाची चिंता नाही. पण भाजपा पाडत असलेला पायंडा देशाला घातक ठरणारा आहे. तो पायंडा म्हणजे, तुम्ही मत कोणालाही द्या, सरकार माझेच बनणार असं जर चालू राहिलं तर कठीण आहे. उद्या खोके येतील, बंदुका घेऊन येतील आणि कोणीही देशाचा पंतप्रधान आणि राज्याचा मुख्यमंत्री होईल" असंही म्हटलं आहे. 

टॅग्स :BJPभाजपाUddhav Thackerayउद्धव ठाकरेPoliticsराजकारण