शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
3
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
4
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
5
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
6
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
8
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
9
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
10
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
11
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
12
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
13
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
14
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
15
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
16
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
17
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
18
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
19
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
20
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."

"लखीमपूरवरून इथे बंद करणाऱ्या ठाकरे सरकारला लातूरच्या शेतकऱ्यांची दखल घ्यावी वाटत नाही" 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2021 16:02 IST

BJP Keshav Upadhye Slams Thackeray Government : एका शेतकऱ्यांची तब्येत बिघडली असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यावरून भाजपाने ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

मुंबई - लातूर येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीकडे लक्ष वेधण्यासाठी शेतकऱ्यांचं 72 तासांपासून अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. यामध्ये एका शेतकऱ्यांची तब्येत बिघडली असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यावरून भाजपाने ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. "लखीमपूरवरून इथे बंद करणाऱ्या ठाकरे सरकारला मात्र अद्याप लातूरच्या शेतकऱ्यांची दखल घ्यावी वाटत नाही" असं म्हणत निशाणा साधला आहे. 

भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये (BJP Keshav Upadhye) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ठाकरे सरकारवर टीका केली आहे. "अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीकडे लक्ष वेधण्यासाठी लातूर येथे 72 तास अन्नत्याग आंदोलन सुरू केलेल्या शेतकऱ्यांपैकी १ शेतकऱ्यांची तब्येत बिघडली असून त्याला ॲडमिट केले आहे. लखीमपूरवरून इथे बंद करणाऱ्या ठाकरे सरकारला मात्र अद्याप या शेतकऱ्यांची दखल घ्यावी वाटत नाही" असं म्हणत केशव उपाध्ये यांनी टीकास्त्र सोडलं आहे. 

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी (Lakhimpur Kheri Violence) येथे एका वेगवान कारने शेतकऱ्यांना चिरडण्याचा संतापजनक प्रकार घडला होता. या घटनेचा निषेधार्थ महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची (Maharashtra Bandh) हाक दिली होती. महाविकास आघाडी म्हणजेच शिवसेना (Shivsena), काँग्रेस (Congress), राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) राज्यभरात हा बंद पुकारला आहे. बंदच्या पार्श्वभूमीवर सर्व कार्यकर्त्यांना शांततेत बंद करावा असं आवाहन करण्यात आले होते. अनेकांनी या बंदवरून ठाकरे सरकारवर (Thackeray Government) टीकास्त्र सोडलं. मनसेने (MNS) देखील "मुंबईचे अनभिषिक्त 'बंदसम्राट'" असं म्हणत जोरदार निशाणा साधला होता. 

"वाघनखं गमावलेल्या पक्षाचा 'राज्य सरकार पुरस्कृत' बंद मुंबई- महाराष्ट्रात अयशस्वी ठरला"

महाराष्ट्र नवनिर्माण सेनचे सरचिटणीस कीर्तिकुमार शिंदे (MNS Kirtikumar Shinde) यांनी ठाकरे सरकारला महाराष्ट्र बंदवरून सणसणीत टोला लगावला आहे. "मुंबईचे अनभिषिक्त 'बंदसम्राट'- कामगार नेते जॉर्ज फर्नांडिस यांच्या नंतरचे खरे राजकीय 'बंदसम्राट' म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेच. त्या काळी शिवसेनेच्या वाघाने एक डरकाळी फोडली की, कडकडीत बंद पाळला जायचा. आताच्या शिवसेना कार्यप्रमुखांना- स्वतः मुख्यमंत्री असूनही- पोलिसांच्या गराड्यात दुकानदारांना 'बंद करा' 'बंद करा' असं सांगत 'म्याव म्याव' आवाहन करावं लागतं! वाघनखं गमावलेल्या पक्षाचा 'राज्य सरकार पुरस्कृत' बंद मुंबई- महाराष्ट्रात अयशस्वी ठरला यात आश्चर्य नाही. काय वाटलं असेल आज वंदनीय बाळासाहेबांना?" असं म्हणत जोरदार टीका केली आहे.  

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेFarmerशेतकरीlaturलातूर