शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

भाजप महासागर! ज्या ज्या नेत्यांना यायचे आहे, त्यांना विनंती...; बावनकुळेंचे इनकमिंगवर आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2023 16:33 IST

केंद्राचे अनेक नेते अभियानात महाराष्ट्रात येणार आहेत. महाराष्ट्रातील नेते प्रत्येक मतदारसंघात जाऊन संपर्क साधणार आहेत.

भाजपने २०२४ ची तयारी सुरु केली आहे. मोदी सरकारला ९ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने भाजपाने वेगवेगळ्या मोहिमा सुरु केल्या आहेत. यापैकी एक असलेल्या पक्ष विस्ताराच्या मोहिमेवर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपा महासागर असल्याचे म्हटले आहे. 

30 मे ते 30 जून याकाळात आम्ही जनसंपर्क अभियान चालवत आहोत. केंद्राचे अनेक नेते अभियानात महाराष्ट्रात येणार आहेत. महाराष्ट्रातील नेते प्रत्येक मतदारसंघात जाऊन संपर्क साधणार आहेत. या अभियानाच्या माध्यमातून आम्ही राज्यातील तीन कोटी कुटुंबांना संपर्क करणार आहोत. हे आमचे घर चलो अभियान आहे, असे बावनकुळे म्हणाले. 

आमचा पक्ष महासागर आहे, अरबी समुद्रासारखा आहे. या महासागरामध्ये कितीही लहान, कितीही मोठा, कोणत्याही पक्षातले नेतृत्व आले तरी आमच्याकडे खूप जागा आहे. आमच्याकडे समाजातील प्रत्येक घटकासाठी वेगवेगळे सेल आहेत. पस्तीस प्रकोष्ठ आहे. किसान आघाडी, महिला आघाडी सारख्या नऊ आघाड्या आहेत. 48 लोकसभेच्या आणि विधानसभेच्या 288 जागा युती म्हणून लढायच्या आहेत. त्यामुळे कोणीही पक्षात आला तरी त्याच्या क्षमतेप्रमाणे त्याला काम देण्यासाठी आमच्याकडे चांगली स्पेस आहे. ज्या ज्या पक्षातील ज्या ज्या नेत्यांना भाजपमध्ये यायचे असेल, माझी त्यांना विनंती आहे, त्यांनी भाजपमध्ये यावे, आम्ही महासागर सारखे त्यांना सामावून घेऊ, असे आवाहन बावनकुळे यांनी केले. 

पंकजा मुंडेंच्या नाराजीवर भाष्यपंकजा मुंडे यांच्या वक्तव्याचा संपूर्ण विपर्यास केलेला आहे. मी त्यांचा संपूर्ण भाषण ऐकलेला आहे. पंकजा यांनी भाजप बद्दल बोलताना पक्ष माझ्या पाठीशी आहे असे वक्तव्य केले आहे. त्या भाजपच्या नेत्या आहेत. त्यांच्या बोलण्याचा नेहमीच विपर्यास केला जातो. त्या ज्या पद्धतीने महाराष्ट्रात फिरत आहेत. पक्षाच्या जनसंपर्क अभियानात त्या सहभागी झाल्या आहेत. मध्यप्रदेशात त्यांच्या अनेक सभा होत आहेत. त्यामुळे कोणत्याही विषयाला धरून त्यांच्याबद्दल महाराष्ट्रात संभ्रम निर्माण करणे चूक आहे. मी आणि देवेंद्र फडणवीस त्यांच्याशी नेहमी संपर्कात असतो. त्या थोडही बोलल्या तर त्याचा विपर्यास केला जातो असं मला वाटते, असे बावनकुळे म्हणाले. 

सत्तेत असताना राष्ट्रवादी काँग्रेसने ओबीसींसाठी काहीही केलेले नाही. म्हणून आज त्यांना ओबीसी मेळावे घ्यावे लागत आहेत. मोदी यांच्यामुळे राष्ट्रीय ओबीसी आयोगाला संविधानिक दर्जा मिळाला. देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे राज्यात ओबीसी मंत्रालय आणि महाज्योती निर्माण झाले. देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे ओबीसी यांच्या आरक्षणाचा तिढा सुटला. अजित पवारांनी तर त्या संदर्भातील निधीची फाईल फेकून दिली होती, अशी टीका बावनकुळे यांनी केली. 

टॅग्स :Chandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेBJPभाजपा