शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

अजून तरी ती पातळी भाजपाने गाठलेली नाही; राहुल गांधींवरून पृथ्वीराज चव्हाणांनी व्यक्त केली शंका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2023 11:14 IST

आजवर मोदी राहुल गांधींना विरोधात पुढे करून निवडणुका लढवत होते. परंतू आता त्यांच्यासमोर राहुल गांधी नसतील. मग विरोधकांमधील कोण चेहरा असेल, या प्रश्नावर पृथ्वीराज चव्हाण यांनी भाष्य केले. 

राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा झाल्याने त्यांची खासदारकी रद्द झाली. यामुळे ते पुढील आठ वर्षे निवडणूक लढवू शकणार नाहीएत. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर कोणता चेहरा असेल, राहुल गांधी या काळात काय करतील, या साऱ्या राजकीय प्रश्नांवर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आपले मत व्यक्त केले आहे. राहुल गांधी स्वत: निवडणूक लढवू शकले नाहीत. मला वाटते त्यांना निवडणूक लढविता येईल. कारण कोर्टातून निश्चितच त्यांना या निर्णयाला स्थगिती मिळेल. राहुल गांधींना त्यांची खासदारकी बहाल होईल. याबद्दल काहीच शंका माझ्या मनात नाहीय, असे मत  पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले आहे. 

पृथ्वीराज चव्हाण यांनी 'लोकमत'ला प्रदीर्घ मुलाखत दिली. यावेळी त्यांनी राज्यातील सत्ता संघर्षावरही भाष्य केले आहे. आजवर मोदी राहुल गांधींना विरोधात पुढे करून निवडणुका लढवत होते. परंतू आता त्यांच्यासमोर राहुल गांधी नसतील. मग विरोधकांमधील कोण चेहरा असेल, या प्रश्नावर पृथ्वीराज चव्हाण यांनी भाष्य केले. 

मुळात राहुल गांधींचे भाषण झाले कोलारमध्ये, गांधी राहतात दिल्लीमध्ये. किती कलमांचे उल्लंघन झाले आहे, हे पाहिले जाईल. सुरतच्या न्यायाधीशाला हा खटला चालविण्याचा अधिकार होता का? पूर्व चौकशी करायला हवी होती, ती केलेली नाही. अशा अनेक कायदेशीर बाबी आहेत त्याचा आम्ही वापर करू. काही क्षणांसाठी राहुल गांधी यांना आठ वर्षे निवडणूक लढविता येणार नाही हे धरून चालू. परंतू राहुल गांधींचे दौरे, जाहीर सभा हे कोण थांबविणार आहे का? अजून तरी ती पातळी भाजपाने गाठलेली नाही. तसे आता काही नवीन कारस्थान सुरु झाले असेल तर माहिती नाही. त्यांचे नागरिकत्व रद्द करायचे, त्यांना देशाबाहेर घालवायचे असे काही घाटत असेल तर माहिती नाही, अशी शंका चव्हाण यांनी व्यक्त केली. 

पंतप्रधान पदाच्या उमेदवारावर बोलताना चव्हाण म्हणाले, १९७७ ला पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण होता. जयप्रकाश नारायण यांनी उमेदवार न देता इंदिरा गांधींना पराभूत करण्याच्या उद्देशाने निवडणूक लढविली आणि जिंकली. आजही मोदींविरोधात तशीच निवडणूक लढवावी लागणार आहे. पंतप्रधान पदाचा उमेदवार घोषित करू नये, सर्व पक्षांनी एकत्र यावे. राहुल यांच्या घटनेनंतर विरोधी पक्ष एकत्र आले आहेत. स्थानिक पातळीवर मतभेद आहेत. दिल्लीत आप, प. बंगालमध्ये तृणमूलसोबत. परंतू हे पक्ष एकत्र येतील. परंतू जे राहुल गांधी करू शकले नाहीत ते मोदींनी करून दाखविले याबद्दल त्यांचे धन्यवाद, असा टोलाही चव्हाण यांनी लगावला.

टॅग्स :Prithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणRahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेस