शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

अजून तरी ती पातळी भाजपाने गाठलेली नाही; राहुल गांधींवरून पृथ्वीराज चव्हाणांनी व्यक्त केली शंका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2023 11:14 IST

आजवर मोदी राहुल गांधींना विरोधात पुढे करून निवडणुका लढवत होते. परंतू आता त्यांच्यासमोर राहुल गांधी नसतील. मग विरोधकांमधील कोण चेहरा असेल, या प्रश्नावर पृथ्वीराज चव्हाण यांनी भाष्य केले. 

राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा झाल्याने त्यांची खासदारकी रद्द झाली. यामुळे ते पुढील आठ वर्षे निवडणूक लढवू शकणार नाहीएत. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर कोणता चेहरा असेल, राहुल गांधी या काळात काय करतील, या साऱ्या राजकीय प्रश्नांवर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आपले मत व्यक्त केले आहे. राहुल गांधी स्वत: निवडणूक लढवू शकले नाहीत. मला वाटते त्यांना निवडणूक लढविता येईल. कारण कोर्टातून निश्चितच त्यांना या निर्णयाला स्थगिती मिळेल. राहुल गांधींना त्यांची खासदारकी बहाल होईल. याबद्दल काहीच शंका माझ्या मनात नाहीय, असे मत  पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले आहे. 

पृथ्वीराज चव्हाण यांनी 'लोकमत'ला प्रदीर्घ मुलाखत दिली. यावेळी त्यांनी राज्यातील सत्ता संघर्षावरही भाष्य केले आहे. आजवर मोदी राहुल गांधींना विरोधात पुढे करून निवडणुका लढवत होते. परंतू आता त्यांच्यासमोर राहुल गांधी नसतील. मग विरोधकांमधील कोण चेहरा असेल, या प्रश्नावर पृथ्वीराज चव्हाण यांनी भाष्य केले. 

मुळात राहुल गांधींचे भाषण झाले कोलारमध्ये, गांधी राहतात दिल्लीमध्ये. किती कलमांचे उल्लंघन झाले आहे, हे पाहिले जाईल. सुरतच्या न्यायाधीशाला हा खटला चालविण्याचा अधिकार होता का? पूर्व चौकशी करायला हवी होती, ती केलेली नाही. अशा अनेक कायदेशीर बाबी आहेत त्याचा आम्ही वापर करू. काही क्षणांसाठी राहुल गांधी यांना आठ वर्षे निवडणूक लढविता येणार नाही हे धरून चालू. परंतू राहुल गांधींचे दौरे, जाहीर सभा हे कोण थांबविणार आहे का? अजून तरी ती पातळी भाजपाने गाठलेली नाही. तसे आता काही नवीन कारस्थान सुरु झाले असेल तर माहिती नाही. त्यांचे नागरिकत्व रद्द करायचे, त्यांना देशाबाहेर घालवायचे असे काही घाटत असेल तर माहिती नाही, अशी शंका चव्हाण यांनी व्यक्त केली. 

पंतप्रधान पदाच्या उमेदवारावर बोलताना चव्हाण म्हणाले, १९७७ ला पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण होता. जयप्रकाश नारायण यांनी उमेदवार न देता इंदिरा गांधींना पराभूत करण्याच्या उद्देशाने निवडणूक लढविली आणि जिंकली. आजही मोदींविरोधात तशीच निवडणूक लढवावी लागणार आहे. पंतप्रधान पदाचा उमेदवार घोषित करू नये, सर्व पक्षांनी एकत्र यावे. राहुल यांच्या घटनेनंतर विरोधी पक्ष एकत्र आले आहेत. स्थानिक पातळीवर मतभेद आहेत. दिल्लीत आप, प. बंगालमध्ये तृणमूलसोबत. परंतू हे पक्ष एकत्र येतील. परंतू जे राहुल गांधी करू शकले नाहीत ते मोदींनी करून दाखविले याबद्दल त्यांचे धन्यवाद, असा टोलाही चव्हाण यांनी लगावला.

टॅग्स :Prithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणRahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेस