मनसेचा आराखडा राबवतेय भाजप सरकार : राज ठाकरे
By Admin | Updated: June 28, 2015 23:32 IST2015-06-28T23:32:11+5:302015-06-28T23:32:11+5:30
कोणाच्या फायद्यासाठी?

मनसेचा आराखडा राबवतेय भाजप सरकार : राज ठाकरे
सावंतवाडी : राज्यात मध्यवर्ती निवडणुका होतील का? हे सांगण्यासाठी मी काय ज्योतिषी नाही, असा टोला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना हाणला. तसेच भाजप सरकार मी मांडलेला आराखडाच राबवत असल्याची टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर करीत, काँग्रेसप्रमाणेच भाजप सरकारही घोषणाबाज सरकार असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला.कोकण दौैऱ्यावर आलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी सावंतवाडीत पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी मनसे कोकण संघटक परशुराम उपरकर, अनिल शिदोरे, धीरज परब, शैलेश भोगले, आदी उपस्थित होते.मुख्यमंत्री घोषणाबाज आहेत. ते कोकण नंबर वन करणार म्हणजे नेमके काय करणार? त्यांच्याकडे काय आहे? माझ्या हातात जर सत्ता दिली असती, तर या सुजलाम्, सुफलाम् कोकणचे सोने केले असते. कोकणसारखा प्रदेश असणे हे आपले भाग्य आहे, पण त्याला योग्य दिशा मिळत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)
कोणाच्या फायद्यासाठी?
रेल्वे टर्मिनस हे नुसते नाटक असून आता टर्मिनस झाले. मग पुढे रेल्वे जाणार ती कोणाच्या फायद्यासाठी? सावंतवाडीतच रेल्वे का थांबणार नाही? हे सर्व चालले आहे ते परप्रांतीयांसाठी. आम्ही फक्त बघत बसायचे, असा आरोपही यावेळी राज ठाकरे यांनी केला.