शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

'बोहल्यावर चढण्यापूर्वीच नवरदेव मंडपातून पसार', गिरीश बापट यांचा शिवसेनेला टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2020 13:30 IST

मंत्रिमंडळ विस्तारानंतर शिवसेनेला पहिला धक्का बसला आहे.

ठळक मुद्देमंत्रिमंडळ विस्तारानंतर शिवसेनेला पहिला धक्का बसला आहे. गिरीश बापट यांनी सत्तार यांच्या राजीनाम्यावर आपली प्रतिक्रिया दिली.लग्नासाठी बोहल्यावर चढण्यापूर्वीच नवरदेव मंडपातून पळून गेला असं म्हणत बापट यांनी शिवसेनेला टोला लगावला.

मुंबई - मंत्रिमंडळ विस्तारानंतर शिवसेनेला पहिला धक्का बसला आहे. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर महाविकास आघाडीमधील शिवसेना, राष्ट्रावादी काँग्रेस आणि काँग्रेस या घटकपक्षामधील अनेक नेत्यांची नाराजी समोर आली होती.  मंत्रिमंडळात स्थान मिळूनही केवळ राज्यमंत्रिपद मिळाल्याने शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. भाजपाचे गिरीश बापट यांनी सत्तार यांच्या राजीनाम्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. लग्नासाठी बोहल्यावर चढण्यापूर्वीच नवरदेव मंडपातून पळून गेला असं म्हणत बापट यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे.

'सरकारने अद्याप खातेवाटप केलेले नाही. अब्दुल सत्तार यांनी राजीनामा का दिला हे माहीत नाही. मी अशी कोणतीही बातमी ऐकलेली नाही. लग्नासाठी बोहल्यावर चढण्यापूर्वीच नवरदेव मंडपातून पळून गेला अशी परिस्थिती उद्भवली आहे' असं गिरीश बापट यांनी म्हटलं आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज दिवसभरात अशा बऱ्याच बातम्या येतील, असे म्हटले आहे. तर, भाजपा नेते आणि माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडेंनीही, महाविकास आघाडीत नाराजी असल्याचं उघड झाल्याचं म्हटलं आहे.

अब्दुल सत्तार हे आमदारकीचा राजीनामा देऊन काँग्रेसमधून शिवसेनेत आले होते. त्यानंतर त्यांनी शिवसेनेच्या तिकिटावर सिल्लोड मतदारसंघातून निवडून आले होते. त्यानंतर मंत्रिमंडळात आपल्याला स्थान मिळेल अशी सत्तार यांना अपेक्षा होती. त्यानुसार शिवसेनेने सत्तार यांना राज्यमंत्रिपद दिले. तर औरंगाबादमधून पैठणचे आमदार संदीपान भुमरे यांना कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले. मात्र कॅबिनेट मंत्रिपद न मिळाल्याने सत्तार नाराज झाले. अखेर आज त्यांनी खातेवाटप जाहीर होण्यापूर्वीच मंत्रिपदाचा राजीनामा दिला.  

दरम्यान,  सत्तार यांची नाराजी दूर करण्यासाठी माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्यावर जबाबदारी देण्यात आली असून, खोतकर यांनी शुक्रवारी मध्यरात्री औरंगाबादेत अब्दुल सत्तार यांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये रात्री दीड वाजेपर्यंत चर्चा झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर याचवेळी खोतकर यांनी शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांचे सत्तार यांच्यासोबत फोनवरून बोलणं करून दिले असल्याची ही बोलले जात आहे. त्यामुळे आता अब्दुल सत्तार काय निर्णय घेणार हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

अब्दुल सत्तार यांचा मंत्रिपदाचा राजीनामा, मंत्रिमंडळ विस्तारानंतर शिवसेनेला पहिला धक्का

आज अशा बऱ्याच बातम्या मिळतील; अब्दुल सत्तार राजीनाम्यानंतर चंद्रकांतदादांचा चिमटा

अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याबाबत संजय राऊत यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...  

टॅग्स :girish bapatगिरीष बापटAbdul Sattarअब्दुल सत्तारBJPभाजपाShiv Senaशिवसेना