शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
3
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
4
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
5
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
7
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
8
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
9
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
10
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
11
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
12
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
13
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
14
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
15
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
16
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
17
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
18
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
19
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
Daily Top 2Weekly Top 5

"धनंजय मुंडेंना सहआरोपी करा ही भाजपचीच मागणी"; जितेंद्र आव्हाड म्हणाले, "प्रकरण सुरु झालं..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 14:58 IST

शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी धनंजय मुडेंबाबत मोठा दावा केला आहे.

Jitendra Awhad On Dhananjay Munde Resignation: बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्यावर झालेल्या अत्याचाराचे फोटो समोर आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. दुसरीकडे, या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी सातत्याने होत होती. अखेर मंगळवारी धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिला. मुंडेंच्या राजीनाम्यावरुन विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं आहे. तसेच आता मुंडेंच्या आमदारकीच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही धनंजय मुंडेंबाबत बोलताना मोठा दावा केला आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मीक कराडचे नाव आल्याने धनंजय मुंडे हे चांगलेच अडचणीत सापडले होते. भाजपसह विरोधीपक्षाकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी तब्येतीच्या कारणास्तव राजीनामा देत असल्याचे सांगितले. धनंजय मुंडे यांचा विधीमंडळ सदस्य पदाचा राजीनामा घ्या, अशी मागणी  करण्यात येत आहे. तसेच संतोष देशमुख प्रकरणात मुंडेंनाही सहआरोपी करण्यात यावं असं म्हटलं जात आहे. यावर बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी ही भाजपचीच मागणी असल्याचे म्हटलं आहे.

"जेव्हा मुख्यमंत्री फडणवीसांना कळलं की अख्खा महाराष्ट्र अंगावर येतोय तेव्हा त्यांनी त्यांना राजीनाम्यासंदर्भात समजवलं. मला वाटतं दोष राष्ट्रवादी काँग्रेसचा असून, त्यांनी आधी हा निर्णय घेणं अपेक्षित होतं. यात मुख्यमंत्र्यांनी आधीच निर्णय घेतला होता हे आता स्पष्ट होत आहे," असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

यावेळी आव्हाड यांनी धनंजय मुंडे यांना सहआरोपी करण्याच्या मागणीबाबत प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना ही भाजपची सुद्धा मागणी असल्याचे आव्हाड म्हणाले. "धनंजय मुंडेंना सहआरोपी करा ही सगळ्यांचीच मागणी आहे. कारण ज्यातून हे प्रकरण सुरु झालं ते खंडणीचे प्रकरण होतं. धनंजय मुंडेंना सहआरोपी करा ही भाजपची मागणी आहे. या मागणीसाठी भाजपला आमचे समर्थन आहे," असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

'कृष्णा आंधळेची हत्या झालीये'

दरम्यान, या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे याची हत्या झाल्याचा दावाही जितेंद्र आव्हाड यांनी केला. कृष्णा आंधळे जिवंत नाही, त्याची हत्या झालेली आहे, असं जितेंद्र आव्हाडांनी म्हटलं. 

टॅग्स :beed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरणDhananjay Mundeधनंजय मुंडेJitendra Awhadजितेंद्र आव्हाडSantosh Deshmukhसंतोष देशमुख हत्या प्रकरण