शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
3
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
4
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
5
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
6
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
7
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
8
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
9
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
10
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
11
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
12
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
13
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
14
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
15
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
16
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
17
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
18
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...
19
Smartphones: २४ जीबी रॅम, ७५०० mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; जबरदस्त फोन लॉन्च!
20
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले

“समाजाला विसर पडतो, तेव्हा राहुल गांधी सावरकरांचा उल्लेख करतात”; फडणवीसांनी मानले आभार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2023 20:23 IST

Devendra Fadnavis: हे तुम्ही सत्य बोलता, त्याबद्दलही तुमचे आभार मानतो, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

Devendra Fadnavis: स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मुद्द्यावरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये अनेकदा आरोप-प्रत्यारोपांचा कलगीतुरा रंगताना पाहायला मिळाला आहे. राहुल गांधी यांनी सावरकरांवर केलेल्या विधानांमुळे देशभरात वाद निर्माण झालेला पाहायला मिळत आहेत. मात्र, यातच आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्यावर खोचक शब्दांत टीका केली आहे. समाजाला विसर पडतो, तेव्हा राहुल गांधी सावरकरांचा उल्लेख करतात, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. 

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावर लिहिलेल्या ‘मृत्युंजयाचा आत्मयज्ञ’ या कादंबरीचे प्रकाशन करण्यात आले. लेखक शुभांगी भडभडे लिखित या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली. राहुल गांधी जेव्हा ‘मी सावरकर नाही’ असे म्हणतात. तेव्हा नागपुरी भाषेत म्हणायची इच्छा होते की, सावरकर बनण्याची तुमची औकात नाही, म्हणजेच क्षमताही नाही. सोन्याचा चमचा घेऊन जे जन्माला आले, या शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी हल्लाबोल केला. 

राहुल गांधी यांचे आभार मानले पाहिजे

राहुल गांधी यांचे आभार मानले पाहिजे. कारण, जेव्हा समाजाला सावरकरांचा विसर पडतो, असे वाटते, तेव्हा राहुल गांधी सावरकरांचा उल्लेख करतात. त्यामुळे संपूर्ण समाज पेटून उठतो आणि पुन्हा एकदा सावरकरांचं विचार जनसामान्य आणि पुढील पिढीपर्यंत नेण्याची संधी आपल्याला मिळते, अशी खोचक टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली. याशिवाय, राहुल गांधी जन्मात सावरकर होऊ शकत नाहीत. त्यामुळे ‘मी सावरकर नाही’ हे तुम्ही सत्य बोलता, त्याबद्दलही तुमचे आभार मानतो, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

दरम्यान, ‘महापौर’ आणि ‘विधानमंडळ’ असे शब्द वीर सावरकरांनी दिले. एक विज्ञाननिष्ठ आणि आपल्या संस्कृतीला आव्हान देऊन चांगले स्वीकारण्याचा आग्रह धरणारा तेजस्वी नेता म्हणून आपण सावरकरांकडे पाहिले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांना आपल्याला पिढी दर पिढी पुढे पोहचवावे लागेल. कारण, काँग्रेसने सावरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, नेताजी बोस यांना नाकारण्याचे काम केल, असा घणाघात देवेंद्र फडणवीस यांनी केला. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसRahul Gandhiराहुल गांधीVinayak Damodar Savarkarविनायक दामोदर सावरकरnagpurनागपूर