शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

“समाजाला विसर पडतो, तेव्हा राहुल गांधी सावरकरांचा उल्लेख करतात”; फडणवीसांनी मानले आभार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2023 20:23 IST

Devendra Fadnavis: हे तुम्ही सत्य बोलता, त्याबद्दलही तुमचे आभार मानतो, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

Devendra Fadnavis: स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मुद्द्यावरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये अनेकदा आरोप-प्रत्यारोपांचा कलगीतुरा रंगताना पाहायला मिळाला आहे. राहुल गांधी यांनी सावरकरांवर केलेल्या विधानांमुळे देशभरात वाद निर्माण झालेला पाहायला मिळत आहेत. मात्र, यातच आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्यावर खोचक शब्दांत टीका केली आहे. समाजाला विसर पडतो, तेव्हा राहुल गांधी सावरकरांचा उल्लेख करतात, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. 

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावर लिहिलेल्या ‘मृत्युंजयाचा आत्मयज्ञ’ या कादंबरीचे प्रकाशन करण्यात आले. लेखक शुभांगी भडभडे लिखित या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली. राहुल गांधी जेव्हा ‘मी सावरकर नाही’ असे म्हणतात. तेव्हा नागपुरी भाषेत म्हणायची इच्छा होते की, सावरकर बनण्याची तुमची औकात नाही, म्हणजेच क्षमताही नाही. सोन्याचा चमचा घेऊन जे जन्माला आले, या शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी हल्लाबोल केला. 

राहुल गांधी यांचे आभार मानले पाहिजे

राहुल गांधी यांचे आभार मानले पाहिजे. कारण, जेव्हा समाजाला सावरकरांचा विसर पडतो, असे वाटते, तेव्हा राहुल गांधी सावरकरांचा उल्लेख करतात. त्यामुळे संपूर्ण समाज पेटून उठतो आणि पुन्हा एकदा सावरकरांचं विचार जनसामान्य आणि पुढील पिढीपर्यंत नेण्याची संधी आपल्याला मिळते, अशी खोचक टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली. याशिवाय, राहुल गांधी जन्मात सावरकर होऊ शकत नाहीत. त्यामुळे ‘मी सावरकर नाही’ हे तुम्ही सत्य बोलता, त्याबद्दलही तुमचे आभार मानतो, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

दरम्यान, ‘महापौर’ आणि ‘विधानमंडळ’ असे शब्द वीर सावरकरांनी दिले. एक विज्ञाननिष्ठ आणि आपल्या संस्कृतीला आव्हान देऊन चांगले स्वीकारण्याचा आग्रह धरणारा तेजस्वी नेता म्हणून आपण सावरकरांकडे पाहिले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांना आपल्याला पिढी दर पिढी पुढे पोहचवावे लागेल. कारण, काँग्रेसने सावरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, नेताजी बोस यांना नाकारण्याचे काम केल, असा घणाघात देवेंद्र फडणवीस यांनी केला. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसRahul Gandhiराहुल गांधीVinayak Damodar Savarkarविनायक दामोदर सावरकरnagpurनागपूर