शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

“समाजाला विसर पडतो, तेव्हा राहुल गांधी सावरकरांचा उल्लेख करतात”; फडणवीसांनी मानले आभार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2023 20:23 IST

Devendra Fadnavis: हे तुम्ही सत्य बोलता, त्याबद्दलही तुमचे आभार मानतो, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

Devendra Fadnavis: स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मुद्द्यावरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये अनेकदा आरोप-प्रत्यारोपांचा कलगीतुरा रंगताना पाहायला मिळाला आहे. राहुल गांधी यांनी सावरकरांवर केलेल्या विधानांमुळे देशभरात वाद निर्माण झालेला पाहायला मिळत आहेत. मात्र, यातच आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्यावर खोचक शब्दांत टीका केली आहे. समाजाला विसर पडतो, तेव्हा राहुल गांधी सावरकरांचा उल्लेख करतात, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. 

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावर लिहिलेल्या ‘मृत्युंजयाचा आत्मयज्ञ’ या कादंबरीचे प्रकाशन करण्यात आले. लेखक शुभांगी भडभडे लिखित या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली. राहुल गांधी जेव्हा ‘मी सावरकर नाही’ असे म्हणतात. तेव्हा नागपुरी भाषेत म्हणायची इच्छा होते की, सावरकर बनण्याची तुमची औकात नाही, म्हणजेच क्षमताही नाही. सोन्याचा चमचा घेऊन जे जन्माला आले, या शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी हल्लाबोल केला. 

राहुल गांधी यांचे आभार मानले पाहिजे

राहुल गांधी यांचे आभार मानले पाहिजे. कारण, जेव्हा समाजाला सावरकरांचा विसर पडतो, असे वाटते, तेव्हा राहुल गांधी सावरकरांचा उल्लेख करतात. त्यामुळे संपूर्ण समाज पेटून उठतो आणि पुन्हा एकदा सावरकरांचं विचार जनसामान्य आणि पुढील पिढीपर्यंत नेण्याची संधी आपल्याला मिळते, अशी खोचक टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली. याशिवाय, राहुल गांधी जन्मात सावरकर होऊ शकत नाहीत. त्यामुळे ‘मी सावरकर नाही’ हे तुम्ही सत्य बोलता, त्याबद्दलही तुमचे आभार मानतो, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

दरम्यान, ‘महापौर’ आणि ‘विधानमंडळ’ असे शब्द वीर सावरकरांनी दिले. एक विज्ञाननिष्ठ आणि आपल्या संस्कृतीला आव्हान देऊन चांगले स्वीकारण्याचा आग्रह धरणारा तेजस्वी नेता म्हणून आपण सावरकरांकडे पाहिले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांना आपल्याला पिढी दर पिढी पुढे पोहचवावे लागेल. कारण, काँग्रेसने सावरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, नेताजी बोस यांना नाकारण्याचे काम केल, असा घणाघात देवेंद्र फडणवीस यांनी केला. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसRahul Gandhiराहुल गांधीVinayak Damodar Savarkarविनायक दामोदर सावरकरnagpurनागपूर