शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

“महाराष्ट्राला अनेक गोष्टी मिळाल्या आहे, विरोधकांनी राजकारण करू नये”: देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2024 15:42 IST

BJP DCM Devendra Fadnavis Reaction On Union Budget 2024: देशातील युवा, गरीब आणि शेतकऱ्यांना डोळ्यासमोर ठेवून बनवण्यात आलेला संतुलित अर्थसंकल्प आहे. विरोधकांनी राजकारण करू नये, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

BJP DCM Devendra Fadnavis Reaction On Union Budget 2024: विनाकारण नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न होतो, ते तुमच्या समोर आहे. माझा विरोधकांना सल्ला आहे की, फक्त नरेटिव्ह सेट करण्यासाठी राजकारण करू नका.  महाराष्ट्राला देखील अनेक गोष्टी मिळाल्या आहे. मध्यमवर्गाला फायदा देत भविष्याचा वेध घेणारा अर्थसंकल्प आहे, या शब्दांत महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे. 

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये विद्यार्थी वर्ग, तरुण, शेतकरी, महिला, स्टार्टअप यांसाठी अनेकविध योजना घोषित केल्या. तसेच काही गोष्टी स्वस्त झाल्या आहेत. कररचनेत बदल करण्यात आला आहे. बिहार आणि आंध्र प्रदेश या राज्यांसाठी विशेष तसेच मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. या अर्थसंकल्पावरून आता संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. विरोधकांकडून या अर्थसंकल्पावर टीका करण्यात येत असून, एनडीएतील पक्षांकडून या अर्थसंकल्पाचे स्वागत करण्यात येत आहे. विरोधकांकडून होत असलेल्या टीकेचा देवेंद्र फडणवीस यांनी खरपूस शब्दांत समाचार घेतला.

इन्कम टॅक्समध्ये मध्यमवर्गीय कुटुबांना फायदा होणार

इन्कम टॅक्समध्ये मध्यमवर्गीय कुटुबांना फायदा होणार आहे. केवळ घोषणा न करता भविष्याचा वेध घेत ही घोषणा करण्यात आली आहे. पायाभूत सुविधांसाठी ११ लाख कोटींची गुंतवणूक करण्यात आली आहे. मुद्रा लोन १० लाख वरून आता २० लाख पर्यंत वाढवण्यात आले आहे. सामाजिक कल्याणच्या विकासाचा दर महागाई दरापेक्षा जास्त आहे. आरोग्य क्षेत्रातला खर्च दुप्पट झालं आहे. या दोन्ही महत्त्वाच्या  क्षेत्रातील गुंतवणूक दुप्पट केली आहे. मोठी गुंतवणूक करणारा हा अर्थसंकल्प आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. 

शेतकऱ्यांसाठी नवीन योजना जाहीर करण्यात आली

शेतकऱ्यांसाठी नवीन योजना जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या धर्तीवर केंद्र सरकारने अप्रेंटिशिप स्कीमची योजना घोषणा केली. रोजगाराची निर्मिती मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. ग्रामविकास क्षेत्रात मोठी गुंतवणूक करण्यात येणार आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

दरम्यान,  मध्यमवर्गाला फायदा देत भविष्याचा वेध घेणारा अर्थसंकल्प आहे. देशाचा अर्थसंकल्प संतुलित असून देशातील युवा, गरीब आणि शेतकऱ्यांना डोळ्यासमोर ठेवून बनवण्यात आलेला संतुलित अर्थसंकल्प आहे, असेही देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले. 

टॅग्स :Budgetअर्थसंकल्प 2024Union Budgetकेंद्रीय अर्थसंकल्प 2019Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसnirmala sitharamanनिर्मला सीतारामनNirmala Sitaramanनिर्मला सीतारामन