शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
2
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
3
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
4
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
5
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
6
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
7
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
8
फैजल खानचं आमिरला DNA चाचणी करण्याचं आव्हान, म्हणाला, "रीनाशी लग्न केलं तेव्हाच..."
9
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
10
नोकरीची उत्तम संधी! एलआयसीमध्ये विविध पदांची भरती, पगार एक लाखापेक्षा अधिक
11
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!
12
Smallest Countries : जगातील सगळ्यात लहान ५ देश; दुसऱ्या क्रमांकाच्या देशात तर अवघ्या एका दिवसात फिरून होईल!
13
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
14
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना टक्कर देणार भाजपाचे 'जय-वीरू'; आशिष शेलारांनी डिवचलं, म्हणाले...
15
शेअर आहे की पैशांचं झाड...? ५ महिन्यांत २००%, तर आतापर्यंत दिलाय ५१३१२% चा छप्परफाड परतावा; गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
16
अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी...
17
उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराचे नामांतर, नवे नाव असणार 'परशुरामपुरी'
18
बेस्ट निवडणूक २०२५: CM फडणवीसांची मदत, ठाकरेंचा पराभव; शशांक राव यांनी सांगितली Inside Story
19
ICC ODI Rankings : केशव महाराज नंबर वन बॉलर! बॅटरच्या यादीतून रोहित-विराटचं नाव 'गायब'; कारण...
20
Astro Tips: हा हळदीचा ट्रेंड नाही तर आयुष्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे गुरुवारचा उपाय!

भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी बाजुला; मनसेच्या रडारवर पुन्हा शिवसेनाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2020 15:31 IST

काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जावून शिवसेने हिंदुत्वाचा त्याग केल्याची टीका होत असताना मनसे हिंदुत्वाचा मुद्दा पुढे रेटणार असं दिसत आहे. त्यामुळे भविष्यात मनसेचा मुख्य शत्रु भाजप, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस नव्हे तर पुन्हा एकदा शिवसेना असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

मुंबई - लोकसभा निवडणुकीत भाजपविरोधी भूमिका घेत नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर टीका करणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे पुन्हा एकदा आक्रमक भूमिकेसह राज्याच्या राजकारणात  पुनरागमन करण्यास सज्ज झाले आहेत. मात्र यावेळी त्यांच्या रडारवर भाजपऐवजी पुन्हा एकदा शिवसेनाच दिसत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात येत असलेल्या टीकेवरून हे स्पष्ट होत आहे. 

शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर राज ठाकरे यांनी मनसेची स्थापना केली होती. त्यावेळी शिवसेनेतील अनेक नेते त्यांच्यासोबत आले होते. राज ठाकरे यांनी देखील पहिल्याच निवडणूकीत 14 आमदार विधानसभेत पाठवले. त्यावेळी राज ठाकरे यांनी शिवसेनेवर टीका करतच आपली राजकीय वाटचाल सुरू केली होती. राज यांच्यामुळे शिवसेनेचे देखील नुकसान झाले होते. 

आघाडी सरकारच्या काळात राज ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर कडाडून टीका केली होती. मात्र 2014 येईपर्यंत राज ठाकरे यांचा करिष्मा कमी झाला. तर शिवसेना आणि भाजप सत्तेत आले. या काळात राज ठाकरे यांचा शिवसेनेवर राग कमी झालेला दिसून आला. तसेच 2019 येईपर्यंत राज ठाकरे भाजप आणि मोदी-शाह यांचा प्रखर विरोध करू लागले. लोकसभा निवडणुकीत उमेदवार न देता राज ठाकरे यांनी भाजपला शिंगावर घेतले होते. त्यावेळी शिवसेनेविषयी ते फारसे बोलतान दिसले नाही. 

दरम्यान विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेस-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आले आहे. तर राज ठाकरे यांचा एकच आमदार विधानसभेत आहे. आता राज यांनी पुन्हा एकदा पक्ष बांधणीकडे लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. मात्र याआधीच मनसे नेत्यांकडून शिवसेनेला लक्ष्य करण्यात येत आहे. अमेय वाघ, संदीप देशपांडे यांनी शिवसेनेविरुद्ध वक्तव्य करण्यास सुरुवात केली आहे. उद्या मनसेचे अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जावून शिवसेने हिंदुत्वाचा त्याग केल्याची टीका होत असताना मनसे हिंदुत्वाचा मुद्दा पुढे रेटणार असं दिसत आहे. त्यामुळे भविष्यात मनसेचा मुख्य शत्रु भाजप, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस नव्हे तर पुन्हा एकदा शिवसेना असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.