शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

Chitra Wagh : "तुमचा पक्ष आणि आदित्य बाळाला सांभाळा…"; चित्रा वाघ यांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2023 10:40 IST

BJP Chitra Wagh And Uddhav Thackeray : भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून निशाणा साधला आहे.

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी "आपल्या सगळ्यांना शहाणे होण्याची वेळ आली आहे. नुसती वज्रमूठ करून उपयोग नाही. हा भगवा या वज्रमूठीत घट्ट धरायचा आहे. भगव्याला डाग लावण्याचा प्रयत्न केला जात आहे, तो साफ करून छत्रपती शिवरायांचा आणि हिंदुत्वाचा भगवा पुन्हा एकदा तेजाने उंच फडकवत ठेवायचा आहे. याची सुरुवात महापालिकेपासून करायची आहे. उद्या महापालिका, विधानसभा आणि लोकसभा निवडणुका एकत्र घेतल्या तरी तुम्हाला भुईसपाट केल्याशिवाय राहणार नाही" असा स्पष्ट इशारा दिला आहे. यावरून भाजपाने जोरदार हल्लाबोल केला आहे. 

"तुम्ही तुमचा पक्ष आणि आदित्य बाळाला सांभाळा" असं म्हणत उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) खोचक टोला लगावला आहे. भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ (BJP Chitra Wagh) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून निशाणा साधला आहे. "उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा मुंबई तोडण्याची जुनी कॅसेट वाजवायला सुरू केलीय. पण जनता सुज्ञ आहे. तुमच्या या भूलथापांना जनता भीक घालणार नाही. आणि तुम्ही म्हणजे मुंबई नाही… तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही उद्धव ठाकरे." 

"तुम्ही मुंबईची काळजी करू नका… मुंबई सांभाळण्यासाठी देवेंद्र फडणवीसजी आणि एकनाथ शिंदेजी सक्षम आहेत. तुम्ही तुमचा पक्ष आणि आदित्य बाळाला सांभाळा…" असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे. तसेच सबझूट_सभा आणि मोकळी_मूठ असे हॅशटॅग देखील वापरले आहेत. "उद्धव ठाकरे, तुम्ही जमीन दाखवण्याच्या वल्गना करू नका... भाजपा नेते केंद्रीय गृहमंत्री मा. अमित शाहजी यांनी तुम्हाला आधीच आसमान दाखवलंय.. चिखलात लोळवलंय अन् चीतपट केलंय" असं म्हणत चित्रा वाघ यांनी टीकास्त्र सोडलं आहे. 

महाविकास आघाडीचे सरकार असताना मराठी भाषा सक्तीची केली होती. मात्र, सरकार पाडले, गद्दारी केली आणि तो निर्णयही त्यांनी फिरवला. हेच का तुमचे बाळासाहेबांचे विचार, कुठे आहेत बाळासाहेबांचे विचार, हीच तुमची वृत्ती असेल, तुम्हीच असे मराठी भाषेचे धिंडवडे काढणार असाल तर मग मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देणार तरी कोण, असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला. २०१४ साली सांगितले होते की अच्छे दिन येणार, आले का अच्छे दिन? आतापर्यंत हजारो -लाखो लोकांना नोकऱ्या मिळायला हव्या होत्या, दिल्या का नोकऱ्या? सत्तेत आल्यानंतर जातीय दंगली घडवायच्या, जातीय तणाव निर्माण करायचे. तुमच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण करायचा. रक्त सांडायचे. निवडणुका आल्या की पुन्हा काहीतरी थाप ठोकायची. पुन्हा निवडून यायचे, यामध्ये देशाची वाट लागतेय, अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरे यांनी यावेळी बोलताना केली. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Chitra Waghचित्रा वाघUddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपाPoliticsराजकारण