शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
4
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
5
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
6
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
7
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
8
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
9
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
10
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
11
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
12
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
13
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
14
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
15
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
16
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
17
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
18
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
19
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
20
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?

Chitra Wagh : "मविआ काळात घडलेलं भंडारा अग्निकांड विसरलात का हो ताई?"; चित्रा वाघ यांचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2023 16:51 IST

BJP Chitra Wagh Slams NCP Supriya Sule : भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी सुप्रिया सुळेंवर टीकास्त्र सोडलं आहे.

नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयांत रुग्णांच्या झालेल्या मृत्यूने सर्वत्र खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. "गरीब जनतेला दर्जेदार आरोग्य सुविधा पुरविणे ही शासनाची जबाबदारी आहे. या जबाबदारीचा सरकारने त्याग केला आहे का? गोरगरिबांच्या जीवाचं सरकारला काहीच मोल वाटत नाही का? असा संतप्त सवाल विचारला आहे. 

भाजपाने आता सुप्रिया सुळेंना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. "मविआ काळात घडलेलं भंडारा अग्निकांड विसरलात का हो तुम्ही ताई?, ११ नवजात बालकं पुर्णपणे जळून खाक झाली त्यावेळी त्यांच्या मातांचा आक्रोश नाही का ऐकू आला आपल्याला?" असं म्हणत हल्लाबोल केला आहे. भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी सुप्रिया सुळेंवर टीकास्त्र सोडलं आहे. "कसं सोयींचं छान राजकारण करता येत हो मोठ्ठ्या ताई तुम्हाला" असं म्हणत निशाणा साधला आहे. चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. 

"कसं सोयींचं छान राजकारण करता येत हो मोठ्ठ्या ताई"

"राज्याच्या “मोठ्ठ्या ताई” २ दिवसापासून राज्यसरकारवर टीवटीव करतांना दिसताहेत.. कसं सोयींचं छान राजकारण करता येत हो मोठ्ठ्या ताई तुम्हाला … @supriya_sule झालेली घटना दुदैवी आणि वाईटचं यात हलगर्जीपणा करणाऱ्यांना सोडलं जाणार नाहीच याबाबत आपण निश्चींत रहा…राज्यातील प्रत्येकाचा जीव आमच्या साठी महत्वाचा आणि राज्यसरकार मजबुतीने ठाम पणे पिडीत परीवारांच्या सोबत उभं आहे शिवाय पुढे असे प्रकार होऊ नयेत यासाठी ही उपाययोजना केली जाईल."

"आरोग्यमंत्र्याचा राजीनामा तुम्ही का नाही घेतलात ताई?"

"मविआ काळात घडलेलं भंडारा अग्नीकांड विसरलात का हो तुम्ही ताई??? ११ नवजात बालकं पुर्णपणे जळून खाक झाली त्यावेळी त्यांच्या मातांचा आक्रोश नाही का ऐकू आला आपल्याला??? त्या तुमच्या मविआ काळात राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी अग्नीकांड झाले ज्यात कित्येक माणसं दगावलीत. तरी ही त्यावेळच्या तुमच्या पक्षाच्या आरोग्यमंत्र्याचा राजीनामा तुम्ही का नाही घेतलात ताई??? तिथं ना स्मोक डिटेक्टर बसवले होते, ना अग्निरोधक यंत्रणा. तेव्हा तोंडदेखली मलमपट्टी म्हणून तुम्ही राज्यातल्या सगळ्याचं हॉस्पिटल चे ऑडीट करण्याचे आदेश दिले पण, तुमच्या इतर आश्वासनांसारखं ऑडिटही हवेतच विरून गेलं."

"तुमच्या मविआ आघाडी सारखं फेसबुकवरचं सरकार नाही"

"टीका करणं हा तुमचा अधिकार आहे पण आताचं महाराष्ट्रातील महायुतीच सरकार action mode मधलं सरकार आहे ताई. ते तुमच्या मविआ आघाडी सारखं फेसबुकवरचं सरकार नाही. नांदेड आणि छत्रपती संभाजीनगरच्या दुर्घटनेला जबाबदार दोषींवर कठोर कारवाई करणार असल्याचा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिलाय ताई...आरोग्य यंत्रणेचा आढावा घेऊन उपाययोजनाही केल्या जाताहेत  पण, तरीही तुमचे राज्य सरकारवर बेछूट आरोप सुरूच आहेत...कारण, कोमात गेलेल्या तुमच्या राजकारणाला जिवंत ठेवण्यासाठी या घटनेतूनच सलाईन मिळतंय…खरयं ना." 

"कोरोना काळात ऑक्सिजन आणि औषधांअभावी रूग्ण तडफडत असताना तुम्ही मात्र नाकर्त्यासारखे सत्तेच्या गादीला जळवांसारखे चिकटून होतात. आणि, तत्कालीन मुख्यमंत्री पालीसारखे मातोश्रीच्या भिंतींना चिकटून होते. ते घराबाहेर पडलेच नाहीत कधी. राज्याची आरोग्ययंत्रणा कार्यक्षम बनवण्याचा तुमचा राजकारणी वादा हवेतचं विरला. राजकारण आपल्या जागी आहे, पण तुमचा कळवळा तरी खरा असू द्या. ‘ऐसी कळवळ्याची जाती, लाभाविण करी प्रीती..’ हे तुकोबांचं वचन लक्षात ठेवा आणि मग राजकारण करा….मोठ्ठ्या ताई" असं चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.  

टॅग्स :Chitra Waghचित्रा वाघSupriya Suleसुप्रिया सुळेBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस