शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

Maharashtra Politics: “देवेंद्र फडणवीस हेच यापुढे राज्याचे मुख्यमंत्री राहिले पाहिजे”: चंद्रशेखर बावनकुळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2022 23:46 IST

Maharashtra Politics: सन २०३५ मध्ये भारत विश्वगुरू होईल, असा विश्वास चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.

Maharashtra Politics: आताच्या घडीला आगामी २०२४ लोकसभा निवडणुकांसह राज्यातील महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर भाजपने लक्ष्य केंद्रीत केले असून, त्या पार्श्वभूमीवर रणनीति आखायला सुरुवात केली आहे. यातच भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विविध ठिकाणी दौरे करण्यास सुरुवात केली असून, शिवसेनेसह महाविकास आघाडीवर सडकून टीका करताना पाहायला मिळत आहेत. तसेच देवेंद्र फडणवीस हेच यापुढे राज्याचे मुख्यमंत्री राहिले पाहिजे, असे बावनकुळे यांनी स्पष्टच सांगितले. 

नाशिकमध्ये बोलताना, या राज्याचे अष्टपैलू कर्तृत्वान व्यक्ती देवेंद्र फडणवीस हे लोकनेते आहेत. त्यांनी माझ्या पाठीमागे राहून मला प्रचंड शक्ती आणि ऊर्जा दिली. त्यामुळे या राज्याचे नेतृत्व देवेंद्र फडणवीस यांनी केले पाहिजे. देवेंद्र फडणवीस हेच यापुढे राज्याचे मुख्यमंत्री राहिले पाहिजे. जात धर्म, पंथाच्या बाहेर जाऊन निष्ठावंत कार्यकर्ते देवेंद्र फडणवीस आहेत. त्यांचे नेतृत्व आपण मानले पाहिजे. त्यांच्यामुळेच आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांना मंत्रिपदं मिळाली, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

फार दिवस तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राहू नका

यावेळी उपस्थित गजानन नाना शेलार यांना उद्देशून बोलताना बावनकुळे म्हणाले की, फार दिवस तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राहू नका. तुमची गरज आम्हाला आहे, असे सांगत शेलार यांना भाजपत येण्याची ऑफर दिल्याचे सांगितले जात आहे. तसेच १९९२ मध्ये शाखेचा अध्यक्ष झालो. त्यावेळी सगळीकडे काँग्रेस पक्षाला स्थान होते. भाजपला अत्यंत कमी मते मिळत होती. भाजपने मला आमदार, मंत्री तसेच आता राज्याचे अध्यक्षपद भूषविण्याची संधी दिली, असे बावनकुळे म्हणाले.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस हे उंचीवरील नेते आहेत. माझे तिकीट कापले गेले. तेव्हा मला वाटले नव्हते की, मी पुन्हा आमदार होईन. राज्याचा नेता होईन. पण वरिष्ठ नेत्यांनी मला संधी दिली. भारतीय जनता पक्ष जगातील सर्वांत मोठा पक्ष आहे. सन २०३५ मध्ये जगातील सर्वांत तरुण पिढी भारतात असेल. सन २०२५ मध्ये भारत विश्वगुरू होईल, असा विश्वासही बावनकुळे यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Chandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपा