शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात त्यांनी घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
4
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
5
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
6
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
7
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
8
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
9
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
10
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
11
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
12
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
13
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
14
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
15
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
16
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'
17
खळबळजनक! एकतर्फी प्रेमात वेडा झाला तरुण, १५ वर्षांच्या मुलीवर दिवसाढवळ्या झाडल्या गोळ्या
18
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
19
'दीवार'मधला चिमुकला आहे 'या' मराठी अभिनेत्रीचा मोठा भाऊ, कुटुंबासोबत परदेशात झाला स्थायिक
20
FD की सोने? गुंतवणुकीचा राजा कोण? बहुतेकांना यातील फायदे तोटे माहिती नाही, कशी करायची योग्य निवड?

Maharashtra Politics: “देवेंद्र फडणवीस हेच यापुढे राज्याचे मुख्यमंत्री राहिले पाहिजे”: चंद्रशेखर बावनकुळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2022 23:46 IST

Maharashtra Politics: सन २०३५ मध्ये भारत विश्वगुरू होईल, असा विश्वास चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.

Maharashtra Politics: आताच्या घडीला आगामी २०२४ लोकसभा निवडणुकांसह राज्यातील महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर भाजपने लक्ष्य केंद्रीत केले असून, त्या पार्श्वभूमीवर रणनीति आखायला सुरुवात केली आहे. यातच भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विविध ठिकाणी दौरे करण्यास सुरुवात केली असून, शिवसेनेसह महाविकास आघाडीवर सडकून टीका करताना पाहायला मिळत आहेत. तसेच देवेंद्र फडणवीस हेच यापुढे राज्याचे मुख्यमंत्री राहिले पाहिजे, असे बावनकुळे यांनी स्पष्टच सांगितले. 

नाशिकमध्ये बोलताना, या राज्याचे अष्टपैलू कर्तृत्वान व्यक्ती देवेंद्र फडणवीस हे लोकनेते आहेत. त्यांनी माझ्या पाठीमागे राहून मला प्रचंड शक्ती आणि ऊर्जा दिली. त्यामुळे या राज्याचे नेतृत्व देवेंद्र फडणवीस यांनी केले पाहिजे. देवेंद्र फडणवीस हेच यापुढे राज्याचे मुख्यमंत्री राहिले पाहिजे. जात धर्म, पंथाच्या बाहेर जाऊन निष्ठावंत कार्यकर्ते देवेंद्र फडणवीस आहेत. त्यांचे नेतृत्व आपण मानले पाहिजे. त्यांच्यामुळेच आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांना मंत्रिपदं मिळाली, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

फार दिवस तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राहू नका

यावेळी उपस्थित गजानन नाना शेलार यांना उद्देशून बोलताना बावनकुळे म्हणाले की, फार दिवस तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राहू नका. तुमची गरज आम्हाला आहे, असे सांगत शेलार यांना भाजपत येण्याची ऑफर दिल्याचे सांगितले जात आहे. तसेच १९९२ मध्ये शाखेचा अध्यक्ष झालो. त्यावेळी सगळीकडे काँग्रेस पक्षाला स्थान होते. भाजपला अत्यंत कमी मते मिळत होती. भाजपने मला आमदार, मंत्री तसेच आता राज्याचे अध्यक्षपद भूषविण्याची संधी दिली, असे बावनकुळे म्हणाले.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस हे उंचीवरील नेते आहेत. माझे तिकीट कापले गेले. तेव्हा मला वाटले नव्हते की, मी पुन्हा आमदार होईन. राज्याचा नेता होईन. पण वरिष्ठ नेत्यांनी मला संधी दिली. भारतीय जनता पक्ष जगातील सर्वांत मोठा पक्ष आहे. सन २०३५ मध्ये जगातील सर्वांत तरुण पिढी भारतात असेल. सन २०२५ मध्ये भारत विश्वगुरू होईल, असा विश्वासही बावनकुळे यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Chandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपा