शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
4
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
5
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
6
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
7
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
8
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
9
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
10
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
11
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
12
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
13
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
14
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
15
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
16
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
17
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
18
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
19
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
20
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन

Maharashtra Politics: “अनिल देशमुखांनी बोलताना थोडा संयम ठेवावा, मी बोललो तर पाय आणखी खोलात जाईल”

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2023 16:52 IST

Maharashtra News: आम्हाला अनिल देशमुखांची काहीच गरज नव्हती. पण त्यांना भाजपची काय गरज होती ते वेळ आल्यावर सांगू, असा इशारा देण्यात आला आहे.

Maharashtra Politics: राज्यातील राजकारणात विविध मुद्द्यांवरून दावे-प्रतिदावे केले जात आहे. यावरून आरोप-प्रत्यारोपही होताना दिसत आहेत. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री अनिल देशमुख यांनी, भाजपने पक्षात येण्याची ऑफर दिली होती. ही ऑफर घेतली असती तर महाविकास आघाडी सरकार कधीच पडले असते, असे दावा करण्यात आला. यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत असून, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेअनिल देशमुख यांच्यावर पलटवार केला आहे. 

अनिल देशमुखांनी बोलताना थोडा संयम ठेवावा. न्यायालयाने त्यांना केवळ जामीन दिला आहे. क्लीन चीट दिलेली नाही. त्यामुळे त्यांनी विचारपूर्वक आणि संयमाने बोलावे. मी त्यांना विनंती करेन की, त्यांना कोर्टाने जामीन देताना सांगितलेल्या अटी आणि शर्थींचे त्यांनी पालन करावे. ते भाजपवर टीका करतील, चुकीचे बोलतील तर आम्हालाही उत्तर द्यावे लागेल, असा इशारा चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे. 

मी तोंड उघडले तर देशमुखांना काही उत्तर देता येणार नाही

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या दोन दिवस आधी नागपुरात काय झाले होते, ते जर मी बोललो तर देशमुख अडचणीत येतील. त्यांचे पाय आणखी खोलात जातील. बावनकुळे एवढ्यावरच थांबले नाहीत, तर ते म्हणाले की, अनिल देशमुख हे जामीनावर तुरुंगाबाहेर आले आहेत. ते काही निर्दोष सिद्ध झाले नाहीत, असे सूचक विधान बावनकुळे यांनी केले. तसेच आम्हाला अनिल देशमुखांची काहीच गरज नव्हती. पण अनिल देशमुखांना भाजपची काय गरज होती ते आम्ही वेळ आल्यावर सांगू, असा इशाराही बावनकुळे यांनी दिला.

दरम्यान, अनिल देशमुख यांना तुरुंगात जाण्याआधी भाजपाकडून पक्षप्रवेशाची ऑफर होती. या देशमुखांच्या दाव्याला राष्ट्रवाधी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दुजोरा दिला. भाजपकडून अनिल देशमुखांना सांगितले जात होते की, तुम्ही तुम्ही पक्ष बदला, विचार बदला आणि नेतृत्त्व बदला. परंतु देशमुख यांनी तुरुंगात जाण्याची तयारी दाखवली आणि पक्षाची साथ सोडणार नाही हे देखील ठणकावले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Chandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेAnil Deshmukhअनिल देशमुख