शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
3
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
4
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
5
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
6
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
7
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
8
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
9
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
10
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
11
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
12
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
13
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
14
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
16
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
17
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
18
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
19
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
20
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला

Maharashtra Politics: “दर १५ दिवसांनी किंवा महिन्याभराने मुख्यमंत्री शिंदेंना दिल्लीला गेले पाहिजे”; भाजपचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2022 18:06 IST

जे जे प्रकल्प आणि योजना एकनाथ शिंदे मागतील आम्ही त्या देऊ, असे पंतप्रधान मोदींनी सांगितल्याची आठवण भाजपने विरोधकांना करुन दिली.

Maharashtra Politics: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ४० आमदार आणि १२ खासदारांनी केलेल्या बंडखोरीनंतर महाविकास आघाडीचे सरकार कोसळले आणि शिंदे-भाजप युतीचे नवे सरकार आले. यानंतर महाविकास आघाडीकडून सातत्याने नव्या सरकारवर विविध मुद्द्यांवरून टीका केली जात आहे. याला शिंदे गट आणि भाजपकडूनही जोरदार प्रत्युत्तर दिले जात आहे. यातच एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्लीवारीवरून राष्ट्रवादी काँग्रेसकडून निशाणा साधण्यात आला. यावर भाजपने पलटवार केला आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला जरी जात असले तरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशिवाय त्यांना दिल्लीत अपॉइमेंट मिळणे कठीण आहे, असा टोला लगावला होता. प्रसारमाध्यमांशी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांना यावर प्रतिक्रिया विचारण्यात आली. दर १५ दिवसांनी किंवा महिन्याभराने मुख्यमंत्री शिंदेंना दिल्लीला गेले पाहिजे, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. 

महाराष्ट्राचा विकास करायचा आहे आणि केंद्राची मदत लागेल

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना दिल्लीत प्रचंड वजन आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी केवळ आणि केवळ महाराष्ट्राच्या विकासासाठी बैठका घेतलेल्या आहेत. मोदींनी जे जे प्रकल्प आणि योजना एकनाथ शिंदे मागतील आम्ही त्या देऊ असे सांगितले आहे. यासंदर्भातील माहिती शिंदे आणि फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे. त्यामुळे प्रत्येक महिन्याला किंवा १५ दिवसाला माननीय मुख्यमंत्री दिल्लीला गेले पाहिजे. महाराष्ट्राचा विकास करायचा आहे आणि केंद्राची मदत लागेल. केंद्राच्या मदतीशिवाय कुठलंही राज्य पुढे जाऊ शकत नाही, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्टपणे सांगितले. 

अडीच वर्ष महाराष्ट्राची यांनी खराब केली

महाविकास आघाडीवर टीका करताना बावनकुळे म्हणाले की, केंद्राची मदत यांनी घेतली नाही. अडीच वर्ष महाराष्ट्राची यांनी खराब केली. अडीच वर्ष महाराष्ट्र विकासापासून यांनी वंचित ठेवला. केंद्र जोपर्यंत पूर्ण मदत करत नाही तोपर्यंत राज्य पुढे जाऊ शकत नाही. एकनाथ शिंदे हे विकासकामे करणारे मुख्यमंत्री आहेत. विकास मागणारा व्यक्ती जर मुख्यमंत्री पंतप्रधानांना, केंद्रीय नेतृत्वाला भेटत असेल तर यांना कुठे तोंड फुटलेय? अडीच वर्षात यांनी काय केले? मोदींनी त्यांना थांबवले होते का, असा टोलाही बावनकुळे यांनी लगावला आहे. 

दरम्यान, मी तर असे म्हणेन आम्हाला आनंद आहे की शिंदे आणि फडणवीस मोदींना भेटून महाराष्ट्राच्या विकासाची योजना तयार करत आहेत. मला वाटतं त्यांनी आता जरा शांत बसले पाहिजे. शिंदे आणि फडणवीस यांच्या विकासाच्या बुलेट ट्रेनचा आराखडा बघितला पाहिजे, असे आवाहन केले आहे. 

 

टॅग्स :Chandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस