शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

Maharashtra Politics: “दर १५ दिवसांनी किंवा महिन्याभराने मुख्यमंत्री शिंदेंना दिल्लीला गेले पाहिजे”; भाजपचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2022 18:06 IST

जे जे प्रकल्प आणि योजना एकनाथ शिंदे मागतील आम्ही त्या देऊ, असे पंतप्रधान मोदींनी सांगितल्याची आठवण भाजपने विरोधकांना करुन दिली.

Maharashtra Politics: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ४० आमदार आणि १२ खासदारांनी केलेल्या बंडखोरीनंतर महाविकास आघाडीचे सरकार कोसळले आणि शिंदे-भाजप युतीचे नवे सरकार आले. यानंतर महाविकास आघाडीकडून सातत्याने नव्या सरकारवर विविध मुद्द्यांवरून टीका केली जात आहे. याला शिंदे गट आणि भाजपकडूनही जोरदार प्रत्युत्तर दिले जात आहे. यातच एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्लीवारीवरून राष्ट्रवादी काँग्रेसकडून निशाणा साधण्यात आला. यावर भाजपने पलटवार केला आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला जरी जात असले तरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशिवाय त्यांना दिल्लीत अपॉइमेंट मिळणे कठीण आहे, असा टोला लगावला होता. प्रसारमाध्यमांशी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांना यावर प्रतिक्रिया विचारण्यात आली. दर १५ दिवसांनी किंवा महिन्याभराने मुख्यमंत्री शिंदेंना दिल्लीला गेले पाहिजे, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. 

महाराष्ट्राचा विकास करायचा आहे आणि केंद्राची मदत लागेल

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना दिल्लीत प्रचंड वजन आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी केवळ आणि केवळ महाराष्ट्राच्या विकासासाठी बैठका घेतलेल्या आहेत. मोदींनी जे जे प्रकल्प आणि योजना एकनाथ शिंदे मागतील आम्ही त्या देऊ असे सांगितले आहे. यासंदर्भातील माहिती शिंदे आणि फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे. त्यामुळे प्रत्येक महिन्याला किंवा १५ दिवसाला माननीय मुख्यमंत्री दिल्लीला गेले पाहिजे. महाराष्ट्राचा विकास करायचा आहे आणि केंद्राची मदत लागेल. केंद्राच्या मदतीशिवाय कुठलंही राज्य पुढे जाऊ शकत नाही, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्टपणे सांगितले. 

अडीच वर्ष महाराष्ट्राची यांनी खराब केली

महाविकास आघाडीवर टीका करताना बावनकुळे म्हणाले की, केंद्राची मदत यांनी घेतली नाही. अडीच वर्ष महाराष्ट्राची यांनी खराब केली. अडीच वर्ष महाराष्ट्र विकासापासून यांनी वंचित ठेवला. केंद्र जोपर्यंत पूर्ण मदत करत नाही तोपर्यंत राज्य पुढे जाऊ शकत नाही. एकनाथ शिंदे हे विकासकामे करणारे मुख्यमंत्री आहेत. विकास मागणारा व्यक्ती जर मुख्यमंत्री पंतप्रधानांना, केंद्रीय नेतृत्वाला भेटत असेल तर यांना कुठे तोंड फुटलेय? अडीच वर्षात यांनी काय केले? मोदींनी त्यांना थांबवले होते का, असा टोलाही बावनकुळे यांनी लगावला आहे. 

दरम्यान, मी तर असे म्हणेन आम्हाला आनंद आहे की शिंदे आणि फडणवीस मोदींना भेटून महाराष्ट्राच्या विकासाची योजना तयार करत आहेत. मला वाटतं त्यांनी आता जरा शांत बसले पाहिजे. शिंदे आणि फडणवीस यांच्या विकासाच्या बुलेट ट्रेनचा आराखडा बघितला पाहिजे, असे आवाहन केले आहे. 

 

टॅग्स :Chandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस