शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

Maharashtra Politics: “आधी १८ महिने मंत्रालयाने मुख्यमंत्री पाहिले नव्हते, आता १८ तास शिंदे-फडणवीस काम करतात”

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2023 14:40 IST

Maharashtra News: एक काळ होता की, फक्त जेव्हा फेसबुकवर सरकार चालू होते. मात्र, आता जनतेच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहणारे सरकार सत्तेत आले आहे, असे भाजप नेत्याने म्हटले आहे.

Maharashtra Politics: आताच्या घडीला राज्यात अनेकविध विषयांवरून राजकीय वातावरण तापल्याचे पाहायला मिळत आहे. तर, दुसरीकडे आगामी महापालिका, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने जय्यत तयारी सुरू केली असून, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा हे महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. तसेच राज्यातील भाजप नेतेही अनेक ठिकाणी जाऊन गाठीभेटी घेत आहेत. यातच आता भाजपकडून पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर टीका करण्यात आली आहे. 

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे शिंदे-फडणवीस सरकारचे कौतुक करताना उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात सरकार १८ तास काम करते. एक काळ होता की, फक्त जेव्हा फेसबुकवर सरकार चालू होते. १८ महिने मंत्रालयाने मुख्यमंत्री पाहिले नव्हते, अशा शब्दात चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला. एकीकडे डबल इंजिन सरकार आणि दुसरीकडे संघटनात्मक बांधणी सुरू आहे. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस हे जनतेचे सरकार आहे. लोकांची कामे केली जात आहेत. मागच्या सरकारमध्ये फोडाफोडी करून सरपंच केले जात होते. आता थेट सरपंचपदाचा निर्णय घेताच भाजप आणि शिंदे गटाचे सरपंच निवडून आले, असे बावनकुळे यांनी सांगितले.

जिथे शिंदेंचे उमेदवार असतील तिथे आम्ही ताकदीने मदत करू

आमदारांच्या पत्रांवरही मुख्यमंत्री सह्या करत नव्हते. निर्णयांमध्ये सुसूत्रता नव्हती. दहीहंडीसाठी कोरोना होता, पण आयपीएलसाठी नव्हता. नागपूर अधिवेशनासाठी कोरोना होता, असेही सरकार महाराष्ट्राने पाहिले आहे. आता मात्र जनतेच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहणारे सरकार सत्तेत आले आहे, असे बावनकुळे यांनी सांगितले. तसेच एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली लोकसभेपासून ग्रामपंचायतीपर्यंत महाराष्ट्रातली प्रत्येक निवडणूक आम्ही एकत्र लढू आणि जिंकूही. जिथे शिंदेंचे उमेदवार असतील तिथे आम्ही ताकदीने मदत करू. जिथे भाजपचे उमेदवार असतील तिथे शिंदे गट आमच्या पाठिशी उभा असेल, अशी ग्वाही चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

दरम्यान, राज्याचा ८० टक्के दौरा पूर्ण झाला आहे. जानेवारी अखेरपर्यंत उर्वरित दौरा पूर्ण होईल. आत्तापर्यंत ४५ जिल्ह्यांचा प्रवास केला. राज्यात २५ लाख युवा वॉरिअर्स काम करणार आहेत. महाराष्ट्रात केंद्राचे ७ कोटी लाभार्थी असून त्यापैकी २ कोटी लाभार्थी पंतप्रधान मोदी यांना धन्यवाद म्हणून पत्र देणार आहेत. आत्तापर्यंत ३५ लाख महिलांनी पत्रे दिली आहेत, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी बोलताना सांगितले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Chandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेUddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस