शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
4
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
5
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
6
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
7
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
8
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
9
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
10
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
11
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
12
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
13
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
14
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
15
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
16
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
17
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
18
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
19
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
20
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा

Maharashtra Politics: “आधी १८ महिने मंत्रालयाने मुख्यमंत्री पाहिले नव्हते, आता १८ तास शिंदे-फडणवीस काम करतात”

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2023 14:40 IST

Maharashtra News: एक काळ होता की, फक्त जेव्हा फेसबुकवर सरकार चालू होते. मात्र, आता जनतेच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहणारे सरकार सत्तेत आले आहे, असे भाजप नेत्याने म्हटले आहे.

Maharashtra Politics: आताच्या घडीला राज्यात अनेकविध विषयांवरून राजकीय वातावरण तापल्याचे पाहायला मिळत आहे. तर, दुसरीकडे आगामी महापालिका, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने जय्यत तयारी सुरू केली असून, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा हे महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. तसेच राज्यातील भाजप नेतेही अनेक ठिकाणी जाऊन गाठीभेटी घेत आहेत. यातच आता भाजपकडून पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर टीका करण्यात आली आहे. 

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे शिंदे-फडणवीस सरकारचे कौतुक करताना उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात सरकार १८ तास काम करते. एक काळ होता की, फक्त जेव्हा फेसबुकवर सरकार चालू होते. १८ महिने मंत्रालयाने मुख्यमंत्री पाहिले नव्हते, अशा शब्दात चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला. एकीकडे डबल इंजिन सरकार आणि दुसरीकडे संघटनात्मक बांधणी सुरू आहे. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस हे जनतेचे सरकार आहे. लोकांची कामे केली जात आहेत. मागच्या सरकारमध्ये फोडाफोडी करून सरपंच केले जात होते. आता थेट सरपंचपदाचा निर्णय घेताच भाजप आणि शिंदे गटाचे सरपंच निवडून आले, असे बावनकुळे यांनी सांगितले.

जिथे शिंदेंचे उमेदवार असतील तिथे आम्ही ताकदीने मदत करू

आमदारांच्या पत्रांवरही मुख्यमंत्री सह्या करत नव्हते. निर्णयांमध्ये सुसूत्रता नव्हती. दहीहंडीसाठी कोरोना होता, पण आयपीएलसाठी नव्हता. नागपूर अधिवेशनासाठी कोरोना होता, असेही सरकार महाराष्ट्राने पाहिले आहे. आता मात्र जनतेच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहणारे सरकार सत्तेत आले आहे, असे बावनकुळे यांनी सांगितले. तसेच एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली लोकसभेपासून ग्रामपंचायतीपर्यंत महाराष्ट्रातली प्रत्येक निवडणूक आम्ही एकत्र लढू आणि जिंकूही. जिथे शिंदेंचे उमेदवार असतील तिथे आम्ही ताकदीने मदत करू. जिथे भाजपचे उमेदवार असतील तिथे शिंदे गट आमच्या पाठिशी उभा असेल, अशी ग्वाही चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

दरम्यान, राज्याचा ८० टक्के दौरा पूर्ण झाला आहे. जानेवारी अखेरपर्यंत उर्वरित दौरा पूर्ण होईल. आत्तापर्यंत ४५ जिल्ह्यांचा प्रवास केला. राज्यात २५ लाख युवा वॉरिअर्स काम करणार आहेत. महाराष्ट्रात केंद्राचे ७ कोटी लाभार्थी असून त्यापैकी २ कोटी लाभार्थी पंतप्रधान मोदी यांना धन्यवाद म्हणून पत्र देणार आहेत. आत्तापर्यंत ३५ लाख महिलांनी पत्रे दिली आहेत, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी बोलताना सांगितले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Chandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेUddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस