शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

Maharashtra Politics: “आजारपणामुळे मुक्ता टिळकांचा राजकीय संपर्क तुटला, म्हणून कुटुंबीयांना तिकीट दिले नाही”

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2023 13:41 IST

Maharashtra News: चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या विधानावर टिकळ कुटुंबीयांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

Maharashtra Politics: कसबा मतदारसंघ पोटनिवडणुकीत भाजपचा मोठा पराभव झाला. जवळपास २५ वर्षांहून अधिक काळ भाजपचे या ठिकाणी वर्चस्व होते. मात्र, महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी बाजी मारत भाजपला मोठा धक्का दिला. मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक लागली होती. टिळक कुटुंबीयांना तिकीट न दिल्यावरून भाजपवर टीकाही करण्यात आली होती. मात्र, यातच आता चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या एका विधानामुळे पुन्हा एकदा यावरून राजकीय वर्तुळात चर्चेला सुरुवात झाली असून, टिळक कुटुंबीयांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. 

प्रसारमाध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, मुक्ता टिळक यांच्या आजारपणामुळे टिळक कुटुंबाचा मतदारांशी राजकीय संपर्क तुटला होता. आजारपणामुळे मुक्ताताईंचे मतदारसंघातील दिसणे, असणे, अस्तित्व हे संपले होते. त्यांचे पती आणि त्यांचा मुलगा यांना मुक्ताताईंच्या सेवेत इतका वेळ द्यावा लागला, त्यामुळे त्यांचा राजकीय आणि सामाजिक एक्जिस्टन्सही कमी झाला होता. त्यामुळे टिळक कुटुंबात उमेदवारी दिली नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले. यावर मुक्ता टिळक यांचे पुत्र कुणाल टिळक यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 

चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याशी सहमत नाही

पुण्यात पक्ष कुठे नसताना पक्ष वाढवण्यासाठी मुक्ता टिळक फिरल्या. त्यांच्या कामाचा मान त्यांनी राखायला हवा होता. आम्ही चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याशी सहमत नाही, असे कुणाल टिळक यांनी स्पष्टपणे सांगितले. तसेच चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यला महत्त्व आहे. त्यांना कोण चुकीची माहिती देते आहे, असा प्रश्न पडला आहे. मुक्ता टिळक यांचे काम होते त्यामुळे सहानुभूतीची लाट होती. मुक्ताताई आजारी असतानाही मतदारसंघात ते कार्यक्रम घेत होते. त्यांचे २० ते २५ वर्ष काम होते आणि त्या कामामुळे लोकांचा संपर्क कायम होता, असे कुणाल टिळक यांनी सांगितले. 

दरम्यान, भाजपत आता कोणतीही मरगळ नाही. पुणे महापालिकेत १०० पेक्षा जास्त नगरसेवक निवडून येतील. तसेच पुढच्या वेळेस कसब्यात वेगळे चित्र दिसेल, असा दावा कुणाल टिळक यांनी केला. कसबा पेठेत उमेदवार निवडताना आमची चूक झाल्याचे संजय काकडे यांनी मान्य केले होते. आमचे उमेदवार हेमंत रासने यांनीही हे मान्य केल्याचे त्यांनी सांगितले होते. पुढील विधानसभा निवडणुकीत रवींद्र धंगेकर यांना टक्कर देणारा उमेदवार देऊ अन् पुन्हा हा गड भाजपकडे येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलBJPभाजपा