शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

“सणासुदीला एकत्र येणे पवार कुटुंबाचे वैशिष्ट्य, पण ते मागचे मतभेद विसरलेले नाहीत”

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2023 14:51 IST

BJP Chandrakant Patil News: अजित पवार आणि शरद पवार यांच्या डोक्यात काय सुरू आहे, हे घटना घडल्याशिवाय कळत नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

BJP Chandrakant Patil News: अजित पवार यांनी बंडखोरी केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही दोन गट पडले. दोन्ही गट एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. अजित पवारांनी तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर दावा केला असून, याप्रकरणी केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणी सुरू आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयातही सुनावणी सुरू आहे. मात्र, यातच दिवाळीच्या सणानिमित्त अजित पवार कुटुंबाच्या कार्यक्रमात सहभाग घेणार की नाही, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा झाल्याचे दिसले. मात्र, अखेरीस अजित पवार कुटुंबाच्या कार्यक्रमात सहभागी झाल्याचे म्हटले जात आहे. यावरून भाजप नेते आणि आमदार चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

दिवाळी पाडव्यानिमित्ताने संपूर्ण पवार कुटुंब एकत्र आले होते. बारामतीतील राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या गोविंदबाग या निवासस्थानी दिवाळी पाडवा साजरा करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार की नाही यावर जोरदार चर्चा होती. मात्र, संध्याकाळी उशिरा अजितदादा गोविंदबागेत गेल्याचे सांगितले जाते. शरद पवार आणि अजित पवार यांच्या राजकीय चुली वेगळ्या असल्या तरी पवार कुटुंब एकत्र असल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे, असे म्हटले जात आहे. यावर चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केले.

सणासुदीला एकत्र येणे पवार कुटुंबाचे वैशिष्ट्य, पण...

कितीही मतभेद झाले तरी सणासुदीला एकत्र येणे हेच पवार कुटुंबाचे वैशिष्ट्य आहे. मतभेदानंतर पवार कुटुंब वेगळे होते. पण अशा कार्यक्रमाला नक्की एकत्र येतात. पवार कुटुंब एकत्रित आले म्हणून मागचे मतभेद विसरले असे नाही. मतभेद अजूनही तसेच आहेत. अजित पवार गोविंद बागेत जाणारच असतात. ते जातात. दोन मोठे पवार जे आहेत अजित पवार आणि शरद पवार त्यांच्या डोक्यात काय सुरू आहे, हे घटना घडल्याशिवाय कळत नाही, असे विधान चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. 

दरम्यान, मराठा आरक्षण लढ्याचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील यांचा तिसऱ्या टप्प्यातील राज्यव्यापी दौरा करत आहेत. यावर बोलताना, आरक्षण उपसमितीचा अध्यक्ष असताना अनेक वेळा बैठकीमध्ये मनोज जरांगे पाटील भेटले आहेत. सध्या अनेक समाजाच्या मनात तिरस्कार निर्माण होत आहे. सर्व समाजाच्या नेत्यांनी बोलताना काळजी घेतली पाहिजे. समाजामध्ये तेढ निर्माण करणे आपले काम नाही. मराठा समाजाला तीन टप्प्यात आरक्षण मिळण्याची प्रोसेस सुरू आहे, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

 

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलSharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवारMaratha Reservationमराठा आरक्षण