शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

“सणासुदीला एकत्र येणे पवार कुटुंबाचे वैशिष्ट्य, पण ते मागचे मतभेद विसरलेले नाहीत”

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2023 14:51 IST

BJP Chandrakant Patil News: अजित पवार आणि शरद पवार यांच्या डोक्यात काय सुरू आहे, हे घटना घडल्याशिवाय कळत नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

BJP Chandrakant Patil News: अजित पवार यांनी बंडखोरी केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही दोन गट पडले. दोन्ही गट एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. अजित पवारांनी तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर दावा केला असून, याप्रकरणी केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणी सुरू आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयातही सुनावणी सुरू आहे. मात्र, यातच दिवाळीच्या सणानिमित्त अजित पवार कुटुंबाच्या कार्यक्रमात सहभाग घेणार की नाही, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा झाल्याचे दिसले. मात्र, अखेरीस अजित पवार कुटुंबाच्या कार्यक्रमात सहभागी झाल्याचे म्हटले जात आहे. यावरून भाजप नेते आणि आमदार चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

दिवाळी पाडव्यानिमित्ताने संपूर्ण पवार कुटुंब एकत्र आले होते. बारामतीतील राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या गोविंदबाग या निवासस्थानी दिवाळी पाडवा साजरा करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार की नाही यावर जोरदार चर्चा होती. मात्र, संध्याकाळी उशिरा अजितदादा गोविंदबागेत गेल्याचे सांगितले जाते. शरद पवार आणि अजित पवार यांच्या राजकीय चुली वेगळ्या असल्या तरी पवार कुटुंब एकत्र असल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे, असे म्हटले जात आहे. यावर चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केले.

सणासुदीला एकत्र येणे पवार कुटुंबाचे वैशिष्ट्य, पण...

कितीही मतभेद झाले तरी सणासुदीला एकत्र येणे हेच पवार कुटुंबाचे वैशिष्ट्य आहे. मतभेदानंतर पवार कुटुंब वेगळे होते. पण अशा कार्यक्रमाला नक्की एकत्र येतात. पवार कुटुंब एकत्रित आले म्हणून मागचे मतभेद विसरले असे नाही. मतभेद अजूनही तसेच आहेत. अजित पवार गोविंद बागेत जाणारच असतात. ते जातात. दोन मोठे पवार जे आहेत अजित पवार आणि शरद पवार त्यांच्या डोक्यात काय सुरू आहे, हे घटना घडल्याशिवाय कळत नाही, असे विधान चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. 

दरम्यान, मराठा आरक्षण लढ्याचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील यांचा तिसऱ्या टप्प्यातील राज्यव्यापी दौरा करत आहेत. यावर बोलताना, आरक्षण उपसमितीचा अध्यक्ष असताना अनेक वेळा बैठकीमध्ये मनोज जरांगे पाटील भेटले आहेत. सध्या अनेक समाजाच्या मनात तिरस्कार निर्माण होत आहे. सर्व समाजाच्या नेत्यांनी बोलताना काळजी घेतली पाहिजे. समाजामध्ये तेढ निर्माण करणे आपले काम नाही. मराठा समाजाला तीन टप्प्यात आरक्षण मिळण्याची प्रोसेस सुरू आहे, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

 

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलSharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवारMaratha Reservationमराठा आरक्षण