शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

आता दिल्लीकडूनच फडणवीसांना अधिकार; वरून काहीही लादले जाणार नसल्याची दिली हमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2024 12:15 IST

कोअर कमिटीत शिक्कामोर्तब, आधी दिल्लीतूनच यायच्या सूचना

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : लोकसभा निवडणुकीत उमेदवार ठरविण्यापासून भाजपचे अनेक निर्णय दिल्लीहून झाले, त्याचा मोठा फटका बसला ही बाब समोर आलेली असताना, आता आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील भाजपच्या नेत्यांशी चर्चा करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्णय घ्यावेत, अशी भूमिका राष्ट्रीय नेतृत्वाने घेतली असल्याचे चित्र आहे.

भाजपच्या प्रदेश कोअर कमिटीची बैठक रविवारी रात्री मुंबईत झाली. केंद्रीय मंत्री आणि विधानसभा निवडणुकीसाठीचे महाराष्ट्राचे प्रभारी भूपेंद्र यादव यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत फडणवीस यांना हे अधिकार देण्यात आले. तुम्हाला निर्णय स्वातंत्र्य असेल, पण मग दमदार यशाची खात्रीही तुम्हाला द्यावी लागेल, या शब्दांत भूपेंद्र यादव यांनी यावेळी दिल्लीहून काहीही लादले जाणार नाही, याची शाश्वती दिल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली.

कोअर कमिटीत शिक्कामोर्तब

फडणवीस यांनी पक्षाचे उमदेवार महाराष्ट्रातच चार-पाच नेत्यांशी चर्चा करून ठरवावेत आणि  त्या नावांना केंद्रीय नेतृत्वाची मंजुरी घ्यावी, अशी मोकळीक दिली आहे. महायुती जागावाटपाचा फॉर्म्युला आदी अधिकार फडणवीस यांना कोअर कमिटीने दिले आहेत, अशी माहिती मुंबई भाजपचे अध्यक्ष आ. आशिष शेलार यांनी दिली.

दिल्लीतूनच यायच्या सूचना

सूत्रांनी सांगितले की, लोकसभेला प्रचाराची यंत्रणा राबविण्याबाबतच्या सूचना देखील दिल्लीहूनच यायच्या. पराभवाची कारणे जेव्हा जाणून घेतली गेली, तेव्हा हे सगळे समोर आले होते. रा. स्व. संघाच्या प्रत्येक जिल्ह्यातील यंत्रणेशी समन्वय योग्य पद्धतीने साधला गेला नाही, अशाही तक्रारी होत्या.

स्थानिक नेत्यांना डावलले...

  1. लोकसभा निवडणुकीच्या वेळी  राज्यातील नेत्यांनी काही उमेदवारांची नावे सुचविली होती, पण त्यांची दखल न घेता वरून उमेदवार देण्यात आले, त्याचा फटका बसला, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
  2. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थानिक पण अत्यंत महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांनीही काही नावांना विरोध दर्शविला होता, पण कोणाचेही ऐकले गेले नाही आणि उमेदवार दिले गेले.
  3. तीन पक्षांमधील जागावाटप, मतदारसंघ निश्चित करणे, उमदेवार ठरविणे याबाबतही वरूनच सूचना येत होत्या, त्यामुळे जागावाटप रखडले होते. 
टॅग्स :vidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूक 2024Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपा