शहरं
Join us  
Trending Stories
1
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
2
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
3
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
4
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
5
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
6
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
7
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
8
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
9
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
10
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
11
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
12
२ तासांचा हायव्हॉल्टेज ड्रामा, गर्लफ्रेंडच्या मिठीत सापडला नेता; पत्नीला पाहून पती पळाला, पण...
13
आकाश 'वाणी'! वैभव सूर्यवंशीमुळे स्टार विकेट किपर बॅटर संजूवर आलीये संघ सोडण्याची वेळ!
14
भारतीयांसाठी कॅनडा ठरतोय मृत्युचं घर; गेल्या ५ वर्षातील आकडे चिंताजनक!
15
प्राजक्ता माळीने वाढदिवशी घेतलं भीमाशंकरचं दर्शन; म्हणाली, "१२ ज्योतिर्लिंग यात्रा पूर्ण..."
16
चालत्या बसवर झाड कोसळलं, ५ जणांचा मृत्यू; महिला म्हणते, "आयुष्याचा प्रश्न, तुम्ही Video बनवताय"
17
BCCI: बीसीसीआय नव्या प्रशिक्षकाच्या शोधात, अर्जही मागवले! जाणून घ्या पात्रता
18
धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वप्नातही पाहू नये, पुन्हा घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल: जरांगे
19
Video: हृदयस्पर्शी! हत्तीच्या पिंजऱ्यात पडला चिमुकला; गजराजाने जे केले त्यानं सर्वांचीच मने जिंकली
20
काय आहे युनिव्हर्सल बँकिंग? ११ वर्षांत पहिल्यांदाच RBI नं कोणत्या बँकेला दिला असा लायसन्स

“उद्धव ठाकरेंनी अर्धीच गोष्ट सांगितली, माझे वडील अयोध्येला गेले होते पण...”; अतुल सावेंचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2022 13:54 IST

शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या बाबरी मशिदीसंदर्भातील दाव्यावर अतुल सावे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आपल्या औरंगाबाद येथील सभेत भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. बाबरी मशिदीचे पतन, काश्मिरी पंडित, भाजप प्रवक्त्यांनी प्रेषितासंदर्भात केलेले आक्षेपार्ह विधान, महागाई यांसारख्या अनेक मुद्द्यांवरून केंद्रातील मोदी सरकारवरही निशाणा साधला. बाबरीच्या मुद्द्यावर बोलताना दिवंगत मोरेश्वर सावे यांच्यासह आमचे शिवसैनिक अयोध्येत गेले होते. त्यांच्या मुलाने खरे-खोटे सांगावे, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. याला मोरेश्वर सावे यांचे सुपुत्र आणि भाजप आमदार अतुल सावे (Atul Save) यांनी प्रत्युत्तर दिले असून, उद्धव ठाकरे यांनी अर्धीच गोष्ट सांगितल्याचे म्हटले आहे. 

बाबरी मशीद पाडण्यात आली तेव्हा अयोध्येत एकही शिवसैनिक नव्हता असा दावा करणाऱ्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना उद्धव ठाकरे यांनी भाजप आमदारालाच पुढे करून कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. शिवसेनेचे मोरेश्वर सावे १९९२ साली शिवसैनिकांसह अयोध्येला गेले होते. खरे वाटत नसेल तर आता भाजपमध्ये असलेले त्यांचे पुत्र अतुल सावे यांनाच देवेंद्र फडणवीस यांनी विचारावे. ते तुम्हाला खरे-खोटे सांगतील, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते. यावर प्रसारमाध्यमांशी बोलताना अतुल सावे यांनी आपली भूमिका मांडली.

उद्धव ठाकरे यांनी पूर्ण गोष्ट का सांगितली नाही?

अतुल सावे म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी आपल्या औरंगाबाद येथील भाषणात माझे वडील स्वर्गीय मोरेश्वर सावे यांचा उल्लेख केला. माझे वडील मोरेश्वर सावे हे बाबरी मशीद पडली तेव्हा कारसेवक म्हणून अयोध्येला गेले होते. पण अयोध्येला जाऊन आल्यानंतर माझे वडील सातत्याने प्रखर हिंदुत्त्वाची भूमिका मांडत होते. ही गोष्ट शिवसेना नेत्यांना आवडली नाही. त्यामुळे शिवसेना नेत्यांकडून मोरेश्वर सावे यांचे खच्चीकरण करण्यात आले. शिवसेनेने माझ्या वडिलांना साधे लोकसभेचे तिकीट दिले नाही. उद्धव ठाकरे यांनी मोरेश्वर सावे अयोध्येला गेल्याचे सांगितले, पण पूर्ण गोष्ट का सांगितली नाही, हा माझा सवाल आहे. मोरेश्वर सावे यांचा इतकाच अभिमान होता, तर शिवसेनेने त्यांना लोकसभा निवडणुकीचे तिकीट का दिले नाही, हा प्रश्न मी मुख्यमंत्र्यांना विचारु इच्छितो, असे अतुल सावे यांनी म्हटले. 

नेमके काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?

देवेंद्र फडणवीस हे आता सांगत आहेत की, बाबरी पतनावेळी मी अयोध्येत गेलो होतो. तिकडे एकही शिवसैनिक नव्हता. पण औरंगाबादमधील आमचे मोरेश्वर सावे आणि इतर शिवसैनिक त्यावेळी अयोध्येत होते. मोरेश्वर सावे हे माजी महापौर आणि खासदार आहेत. आता मोरेश्वर सावे यांचे चिरंजीव तुमच्याकडे (भाजप) येऊन आमदार झाले आहेत. ते हिंदुत्वाच्या मुद्द्यावरच आमदार झाले आहेत. तेव्हा सावे यांनीच देवेंद्र फडणवीस यांना सांगावे की, माझे बाबा अयोध्येला गेले होते की नव्हते. सावे ज्या फडणवीसांची पालखी वाहत आहेत त्यांच्यासमोर खरे-खोटे करावे. मोरेश्वर सावे त्यावेळी अयोध्येला गेले नसतील तर त्यांच्या चिरंजीवांनी सरळ सांगून टाकावे की, माझे बाबा अयोध्येला गेले नव्हते. 

टॅग्स :Atul Saveअतुल सावेBJPभाजपाUddhav Thackerayउद्धव ठाकरे