शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
3
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
4
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?
5
"सगळं तिनेच केलं, मी नकार दिलेला अन्..."; पोलिसांनी मुसक्या आवळताच सोनमच्या बॉयफ्रेंडची पलटी! 
6
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीला उपासाबरोबरच 'ही' उपासना कराल, तर होईल अधिक लाभ!
7
चांदीचा दर १ लाख ९ हजारांवर, सोनंही लाखांच्या पार; पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
8
Ahmedabad Plane Crash Live: भीषण! अहमदाबादमध्ये मोठी दुर्घटना, Air India चं विमान कोसळलं, होते २४२ प्रवासी
9
Ahmedabad Plane Crash: विमानाची राखरांगोळी, इमारती कोसळल्या, वाहनांचे सांगाडे; अहमदाबाद दुर्घटनेची भयावह दृश्यं...
10
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
11
Ahmedabad Plane Crash : 242 प्रवासी, 1:17 ला टेकऑफ अन् 1:20 ला क्रॅश...विमान अपघाताचे ताजे अपडेट
12
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
13
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 
14
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीवितहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
15
"...तोपर्यंत चहा उकळत राहील"; हुंड्यासाठी छळाचा आरोप, तरुणाने सासरीच सुरू केली टपरी
16
Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती
17
Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर
18
Sankashti Chaturthi 2025: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी, 'या' ९ राशींवर होणार बाप्पाचा कृपावर्षाव!
19
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
20
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?

BJP Vs Congress: “कंटाळून पक्ष सोडणाऱ्या घरातील लोकांना रोखता येत नाही, आणि हे भारत जोडायला निघालेत”

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2022 17:50 IST

राहुल गांधींची भारत जोडो यात्रा सुरु असतानाच गोव्यातील काँग्रेसच्या ८ आमदारांनी भाजपचे कमळ हाती घेतले.

मुंबई: एकीकडे काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) भारत जोडोच्या माध्यमातून पक्षात पुन्हा नवसंजीवनी आणण्याच्या प्रयत्नात असताना, गोव्यात काँग्रेसमधील ८ आमदारांनी बंडखोरी करत भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याने एकच खळबळ उडाली. काँग्रेस विधिमंडळ गट भाजपमध्ये विलीन करण्याच्या हालचाली गेल्या अनेक दिवसांपासून चालू होता. जुलैमध्ये विधानसभा अधिवेशन तोंडावर असताना दिगंबर कामत व मायकल लोबो यांनी यासाठी प्रयत्न केले होते. परंतु त्यावेळी दोन तृतीयांश म्हणजे आठ आमदारांचे संख्याबळ न झाल्याने प्रयत्न निष्फळ ठरले. यावरून भाजपने काँग्रेसला टोला लगावला आहे. 

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गोवा काँग्रेसच्या फुटीर गटाला हिरवा कंदील दाखवल्यानंतर हालचाली गतिमान झाल्या. गेल्या दोन दिवसात या हालचालींना वेग आला होता. फुटीर काँग्रेस आमदारांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांच्या दालनात फुटीर काँग्रेस आमदारांबरोबर प्रमोद सावंत यांची चर्चाही झाली. वैध फुटीसाठी दोन तृतीयांश संख्याबळ होत नसल्याने या आठ आमदारांचा भाजप प्रवेश अडला होता. यावरून भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. 

...आणि हे भारत जोडायला निघालेत

अतुल भातखळकर यांनी एक ट्विट केले आहे. कंटाळून पक्ष सोडणाऱ्या घरातील लोकांना रोखता येत नाही, आणि हे भारत जोडायला निघालेत..., असा टोला काँग्रेसला लगावण्यात आला आहे. दुसरीकडे, फुटीर गटांमध्ये मायकल लोबो, दिगंबर कामत, संकल्प आमोणकर केदार नाईक, आलेक्स सिक्वेरा, डिलायला लोबो, रुडॉल्फ फर्नांडिस व राजेश फळदेसाई यांचा समावेश आहे.

देवाने मला सांगितले: दिगंबर कामत

मी देवावर विश्वास ठेवणारा माणूस आहे. मी पुन्हा देवाचा कौल घेतला. मी देवापुढे माझे गाऱ्हाणे मांडले, सगळी परिस्थिती सांगितली. त्यावर देवाने मला तुला हवा तो निर्णय घे, मी तुझ्या पाठीशी असल्याचे सांगितले. त्यानंतर आपण भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे आमदार दिगंबर कामत यांनी सांगितले.

दरम्यान, काँग्रेसला गत विधानसभा निवडणुकीत लोकांनी ११ जागा दिल्या होत्या. आठ आमदार भाजपमध्ये गेल्याने आता काँग्रेसकडे फक्त तीन आमदार राहिले आहेत. यात कुंकळ्ळीचे युरी आलेमाव, केपेचे एल्टन डिकॉस्टा आणि हळदोणेचे कार्लुस फेरेरा यांचा समावेश आहे. कार्लुस व एल्टन यांनाही भाजपमध्ये आणण्याचा प्रयत्न भाजपच्या नेत्यांनी करून पाहिला होता, पण त्यांनी प्रतिसाद मिळाला नसल्याचे सांगितले जात आहे. 

टॅग्स :Atul Bhatkhalkarअतुल भातखळकरgoaगोवाcongressकाँग्रेसPramod Sawantप्रमोद सावंतBJPभाजपा