शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

Maharashtra Politics: “उद्धवजी पंतप्रधान आणि सरदेसाई भारताचे लष्करप्रमुख बनता बनता राहिले”; भाजपचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2022 17:31 IST

Maharashtra Politics: फेसबुक लाइव्हवाला घरबशा पंतप्रधान लोकांच्या नशिबात नव्हता, असा पलटवार भाजपने केला आहे.

Maharashtra Politics: आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हळूहळू सर्वच पक्ष सक्रीय होताना दिसत आहेत. यातच शिवसेना आणि भाजपमधील संघर्ष अधिकाधिक तीव्र होताना पाहायला मिळत आहे. भाजप आणि शिवसेनेतील नेत्यांमधील आरोप-प्रत्यारोपही वाढत आहेत. यातच युवासेना नेते वरुण सरदेसाई यांनी एक दावा केला असून, याला भाजपने प्रत्युत्तर दिले आहे. उद्धव ठाकरे पंतप्रधान होतील, याच भीतीने भाजपने शिवसेना फोडली, असा दावा वरुण सरदेसाईंनी केला. 

उद्धव ठाकरे राज्यात ५ वर्षे मुख्यमंत्री पदावर राहिले तर, २०२४ साली ते पंतप्रधान पदाचे प्रबळ दावेदार होतील, ही भीती असल्यानेच भाजपने सरकार पाडले, असा आरोप वरुण सरदेसाई यांनी केला आहे. तसेच, भाजपविरोधी प्रत्येक राज्यात जे पक्ष आहेत, ते पक्ष उद्धव ठाकरेंच्या चेहऱ्यामागे उभे राहतील हे भाजपला कळून आले होते. म्हणूनच, कुणाला खोके दिले, कोणाला धमकी दिली, अजून काही दिलं आणि आपल्याला पायउतार व्हावे लागले, असा गंभीर आरोप वरुण सरदेसाई यांनी केला आहे. याला भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 

फेसबुक लाईव्हवाला घरबशा पंतप्रधान लोकांच्या नशिबात नव्हता

अतुल भातखळकर यांनी एक ट्विट केले असून,  वरुण सरदेसाई यांनी केलेल्या दाव्यावर पलटवार केला आहे. 'उद्धव ठाकरे पंतप्रधान होतील याच भीतीने भाजपने शिवसेना फोडली', वरुण सरदेसाईंचा दावा.Hmmmm खरंय, उद्धवजी पंतप्रधान आणि सरदेसाई भारताचे लष्करप्रमुख बनता बनता राहिले... फेसबुक लाईव्हवाला घरबशा पंतप्रधान लोकांच्या नशिबात नव्हता, असे ट्विट अतुल भातखळकर यांनी केले आहे. तसेच दुसऱ्या एका ट्विटमध्ये राज्यातील सत्ता गमावली काही दिवसांनंतर महापालिकाही जाणार. टक्केवारी बंद होणार. म्हणून जनाबसेनेच्या पक्षप्रमुखानी कबरींचे सुशोभीकरण करण्याचा व्यवसाय सुरू केलाय असे कळते, अशी टीकाही अतुल भातखळकर यांनी शिवसेनेवर केली आहे. 

दरम्यान, युवासेना एकच आहे. या युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे आहेत. बाकी कुणाला काय करायचं हा त्यांचा प्रश्न आहे. प्रत्येक गल्लीबोळात अनेक मंडळे असतात. त्यामुळे असे मंडळ स्वत:ला कुणाला स्थापन करावसे वाटत असेल तर त्यांचा विषय आहे असं सांगत युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांची खिल्ली उडवली. 

टॅग्स :PoliticsराजकारणAtul Bhatkhalkarअतुल भातखळकरVarun Sardesaiवरुण सरदेसाईUddhav Thackerayउद्धव ठाकरे