शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

Maharashtra Politics: “उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी कोणत्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला होता?”

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2022 14:17 IST

Maharashtra News: संजय राऊतांनी वायफळ आणि फालतू बडबड करू नये, अशी टीका करण्यात आली आहे.

Maharashtra Politics: गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात अनेकविध मुद्द्यांवरून राजकारण तापताना दिसत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी नव्या भारताचे राष्ट्रपिता असल्याचे म्हटले होते. यावरून संजय राऊत (Sanjay Raut) यांनी नवे राष्ट्रपित्यांनी कोणत्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला होता? अशी विचारणा केली. यावरून आता उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी कोणत्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला होता, अशी विचारणा भाजपने केली आहे.

भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी संजय राऊत यांनी केलेल्या टीकेचा खरपूस शब्दांत समाचार घेतला. संजय राऊत यांनी कोणत्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला होता? त्यांचे चालक, मालक, पालक ज्यांच्याकडे ते नोकरी करतात त्या उद्धव ठाकरेंनी कोणत्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला होता? संजय राऊतांनी वायफळ आणि फालतू बडबड करू नये. नाही तर पूर्वीचे दिवस येतील, असा इशारा अतुल भातखळकर यांनी दिला. 

एसआयटी स्थापन झाल्यानंतर त्यांची झोप उडाली आहे

दिशा सालियन प्रकरणाचा तपासच केला नसल्याचे सीबीआयने म्हटले आहे. तरीही या प्रकरणात सीबीआयने क्लिनचीट दिल्याचे काही लोक सांगत आहेत. त्यातून त्यांचा खरा चेहरा दिसत आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन झाल्यानंतर त्यांची झोप उडाली आहे. हे सरकार दिशा सालियनला न्याय मिळवून देईल, असा विश्वास भातखळकर यांनी व्यक्त केला. 

दरम्यान, अमृता फडणवीस हे एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व आहे आणि त्यांची मते त्या मांडत असतात. आता त्यांनी एक मत मांडले. आपल्या देशाचे दोन राष्ट्रपिता आहेत. महात्मा गांधी हे जुन्या भारताचे, तर नरेंद्र मोदी हे नवीन भारताचे राष्ट्रपिता आहेत! अमृता फडणवीस यांचे स्वतंत्र विचार असू शकतात आणि एक नागरिक म्हणून त्यांना आपली मते मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे. पण अमृता फडणवीस यांनी मांडलेल्या विचारांशी त्यांचा पक्ष सहमत आहे काय, अशी विचारणा संजय राऊतांनी केली.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Atul Bhatkhalkarअतुल भातखळकरUddhav Thackerayउद्धव ठाकरेSanjay Rautसंजय राऊत