शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

Ashish Shelar : "ज्यांना मुंबईतील बुजवता येत नाही खड्डे, त्यांना विद्यापीठांचे कशाला करायचे होते राजकीय अड्डे"

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2022 14:14 IST

BJP Ashish Shelar Slams Shivsena : "पेंग्विन सेनेला चपराक! सरकारचे आभार!" असं म्हणत शिवसेनेला खोचक टोला लगावला आहे.

भाजपाचे नेते आशिष शेलार (BJP Ashish Shelar) यांनी पुन्हा एकदा शिवसेना आणि आदित्य ठाकरेंवर (Shivsena Aaditya Thackeray) जोरदार निशाणा साधला आहे. "ज्यांना मुंबईतील बुजवता येत नाही खड्डे, त्यांना विद्यापीठांचे कशाला करायचे होते राजकीय अड्डे" असं म्हणत हल्लाबोल केला आहे. तसेच "शिंदे-फडणवीस सरकारने हे विधेयक मागे घेऊन विद्यापीठांचे संभाव्य राजकीयकरण थांबवले" असं ही म्हटलं आहे. आशिष शेलार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे.  

"पेंग्विन सेनेला चपराक! सरकारचे आभार!" असं म्हणत शिवसेनेला खोचक टोला लगावला आहे. आशिष शेलार यांनी "विद्यापीठांचे कुलपती म्हणून राज्यपालांना असलेले अधिकार काढून ते शिक्षण मंत्र्यांना देण्याच्या राजकीय निर्णयाला समाजातील प्रत्येक स्तरातून प्रचंड विरोध असतानाही ठाकरे सरकारने अट्टाहासाने ते विधेयक मंजूर केले होते. आम्ही त्याला सभागृहात आणि बाहेरही कडाडून विरोध केला होता" असं ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

"पेंग्विन सेनेला चपराक! सरकारचे आभार"

"शिंदे-फडणवीस सरकारने हे विधेयक मागे घेऊन विद्यापीठांचे संभाव्य राजकीयकरण थांबवले! विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान रोखले. पेंग्विन सेनेला चपराक! सरकारचे आभार! ज्यांना मुंबईतील रस्त्यावरील बुजवता येत नाही खड्डे त्यांना विद्यापीठांचे कशाला करायचे होते राजकीय अड्डे!" असं देखील शेलार यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. शेलार यांनी याआधीही वेदांत-फॉक्सकॉनवरून उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे. 

"अडीच वर्षे कंपनीला का लटकवले?"

"ठाकरे सरकारच्या अडीच वर्षांच्या काळात वेदांत -फॉक्सकॉन कंपनीला ना जमीन दिली ना, कुठला करार केला... हा घ्या सरकारी पुरावा. प्रकल्प महाराष्ट्रात तुम्ही आणलाच नाही आणि गेला म्हणून ओरडता? अडीच वर्षे कंपनीला का लटकवले? टक्केवारीसाठी वाटाघाटी सुरू होत्या का? चौकशी झालीच पाहिजे!" असं शेलार यांनी म्हटलं आहे. 

"आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी"

"या प्रकरणी खोटे बोलून मराठी तरुणांची माथी भडकवण्याचा प्रयत्न करणाऱ्या आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी! चौकशीला समोरे जा... अजून बरेच निघेल! अन्यथा तरुणांची माथी भडकवणे, दोन समाजात तेढ निर्माण करणे या प्रकरणी कायदेशीर कारवाई सरकारने का करू नये?" असं देखील आशिष शेलार यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.  याआधी देखील शेलार यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. आमची रोखठोक सच्चाई असं म्हणत शिवसेनेला उद्देशून खुलं पत्र लिहिलं आहे. 

टॅग्स :Ashish Shelarआशीष शेलारBJPभाजपाShiv SenaशिवसेनाPoliticsराजकारण