शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

“तुमच्यावर शरद पवारांचा दबाव होता का?”; आशिष शेलारांचा संजय राऊतांना थेट सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2023 13:34 IST

Ashish Shelar Vs Sanjay Raut: अडवणूक आंदोलन कधी मोर्चा, मुंबईत उबाठाबाबत एकच चर्चा, धारावीतून निकालेंगे मातोश्री टू का खर्चा, अशी खोचक टीका आशिष शेलार यांनी केली.

Ashish Shelar Vs Sanjay Raut: धारावी पुनर्विकास प्रकल्पावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेत अदानी ग्रुपच्या कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला. धारावी पुनर्विकास प्रकल्पावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. याला भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिले. 

अडवणूक आंदोलन कधी मोर्चा, मुंबईत उबाठाबाबत एकच चर्चा, धारावीतून निकालेंगे मातोश्री टू का खर्चा, अशी खोचक टीका आशिष शेलार यांनी पत्रकारांशी संवाद साधताना केली. धारावीतून निघणारा ठाकरे गटाचा मोर्चा होऊ नये. तो थांबावा, यासाठी दिल्लीतून दबाव आहे, असा दावा संजय राऊत यांनी केला होता. याबाबत आशिष शेलार यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर, तुमच्यावर कोणाचा दबाव होता मग? तुमच्यावर शरद पवारांचा दबाव होता का? पवारांनी दिल्लीतून फोन केला होता का? असा प्रतिप्रश्न आशिष शेलार यांनी केला. 

टीडीआर घोटाळा असेल तर सर्वस्वी पाप उद्धव ठाकरेंचे आहे

धारावी पुनर्विकास प्रकल्प हा देशातील सर्वांत मोठा टीडीआर घोटाळा होताना आम्हाला दिसतोय, असा आरोप संजय राऊतांनी केला होता. यावर बोलताना, या टेंडरच्या अटी, कार्यपद्धतीचे आणि त्याबाबतीतील धोरणात्मक निर्णय उद्धव ठाकरेंच्याच काळात झाले आहेत. टेंडरमध्ये गडबड असेल, टीडीआर घोटाळा असेल तर सर्वस्वी पाप उद्धव ठाकरे यांचेच आहे. ५०० फुटांची घरे हवी होती मग उद्धव मुख्यमंत्री होतात तेव्हा टेंडरमध्ये अट घालायची होती. तेव्हा का नाही घातली? आज तुम्हाला उपरती का झाली? अशी विचारणा आशिष शेलार यांनी केली.

दरम्यान, मुंबईला आणि राज्याला काही विकासातून मिळाले की ज्यांची पोटदुखी होते ते म्हणजे उबाठा. त्यामुळे त्यांच्या पोटदुखीचा हा कार्यक्रम आहे. गांजा, ड्रग्जबाबत संजय राऊत यांनी केलेल्या आरोपात काही तथ्य नाही, अशी टीका आशिष शेलार यांनी केली. तत्पूर्वी, धारावी पुनर्विकास प्रकल्प हा देशातील सर्वांत मोठा टीडीआर घोटाळा होताना आम्हाला दिसतोय. धारावी पुनर्विकास प्रकल्प हा या देशातील टीडीआर प्रकल्प आहे. धारावी वाचवा म्हणजे मुंबई वाचवा. धारावी हा पहिला घास आहे आणि त्यानंतर मुंबई गिळण्याचे गुजराती लॉबीचे फार मोठे कारस्थान आहे. गुजरात मॉडेल जबरदस्त पद्धतीने पुढे जात आहे, या शब्दांत संजय राऊत यांनी टीका केली होती. 

टॅग्स :Ashish Shelarआशीष शेलारSanjay Rautसंजय राऊतdharavi-acधारावी