शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Politics: “सुप्रियाताई, गजनी चित्रपट पाहा, सूडाचे राजकारण टोकापर्यंत नेणे ही ठाकरे सरकारची भूमिका”

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2023 16:30 IST

Maharashtra News: संजय पांडेंनी २५० पानांचा अहवाल तयार केला होता. त्यातील काही पानांवर देवेंद्र फडणवीस यांचे नाव लिहिण्याचा प्रयत्न केला, असा मोठा दावा करण्यात आला आहे.

Maharashtra Politics:  भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारवर गंभीर आरोप करत, मोठा गौप्यस्फोट केला. यानंतर राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहे. महाविकास आघाडीचे नेते भाजपवर टीका करताना दिसत असून, भाजप नेते महाविकास आघाडीवर पलटवार करताना दिसत आहेत. यातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी केलेल्या टीकेला भाजप नेते आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 

या वक्तव्यावर सुप्रिया सुळेंनी नाराजी व्यक्त करताना, देवेंद्रजी आपस ये उम्मीद न थी. अशा खोट्या नाट्या गोष्टी पसरवण्यापेक्षा पुण्यात कोयता गॅंग, धायरीत गोळीबार झाला अशा घटना घडल्या आहेत. राज्याचे गृहमंत्री म्हणून त्यांनी यावर बोलणे अपेक्षित होते. त्यांना विनम्र विनंती आहे की, पुण्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न आहे. सगळीकडे गुन्हेगारी वाढत आहे. अशी परिस्थिती त्यांनी यावर बोलावे, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले. यावर भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 

सुप्रियाताईंनी पुन्हा एकदा गजनी सिनेमा पाहावा 

सुप्रियाताईंनी पुन्हा एकदा गजनी सिनेमा पाहावा अशी माझी इच्छा आहे. कारण त्या सिनेमात शॉर्ट मेमरीचा आजार असल्याचे दाखवले आहे. ताईंना असा आजार होऊ नये, अशी माझी इच्छा आहे. कारण त्यांची वक्तव्य त्याच पद्धतीची दिसतायत. मी पूर्ण यादी वाचून दाखवेन ताईंना. सूडाच्या राजकारणाची भूमिका टोकापर्यंत नेणारे सरकार म्हणजे उद्धव ठाकरेंचे, शरद पवार आणि काँग्रेसच्या समर्थनाचे सरकार होते, अशी टीका आशिष शेलार यांनी केली. 

देवेंद्र फडणवीसांचे नाव लिहिण्याचा त्यांनी प्रयत्न केला

देवेंद्र फडणवीस म्हणाले की त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न ठाकरे सरकारने केला. याचा साक्षीदार मी स्वत: आहे. त्या काळात २५० पानांचा अहवाल तत्कालीन आयुक्त संजय पांडे यांनी त्यांच्या खासगी जागेत ठेवलेला आणि नंतर सार्वजनिक कार्यालयात आणला. तो अहवाल मी स्वत: वाचला आहे. त्यात कुठल्या पानावर देवेंद्र फडणवीसांचे नाव लिहिण्याचा त्यांनी प्रयत्न केला, हे मी स्वत: वाचले आहे. एका गोष्टीच्या चौकशीत दुसरी गोष्ट आणणे हे काम तत्कालीन आयुक्तांकडून करून घेण्याचा प्रयत्न हे त्या वेळच्या गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांचेच पाप होते. कुणाला सुडाचे राजकारण सांगताय ताई? अशी विचारणा आशिष शेलार यांनी केली आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Ashish Shelarआशीष शेलारSupriya Suleसुप्रिया सुळेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस