शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ठाकरे सरकारचा तुघलकी कारभार; किरीट सोमय्यांना नजरकैदेत ठेवल्याप्रकरणी भाजपा आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2021 17:44 IST

ठाकरे सरकार पोलीस बळाचा वापर करून मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न केला जात आहे असा आरोप भाजपाने केला आहे.

ठळक मुद्देकोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात येऊ नये अशी नोटीस बजावली आहेकुठलाही अधिकार नसताना मुंबई पोलीस का अडवतेय? मी लिखित मुलुंड पोलीस स्टेशनला तक्रार देणार आहे. मला अटक करायला आलेत असं पोलिसांनी सांगितले पण कुठल्या कलमाखाली हेच सांगत नाहीत

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर लावलेल्या घोटाळ्याच्या आरोपानंतर पुन्हा एकदा किरीट सोमय्या चर्चेत आले आहेत. कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी सोमय्यांना नोटीस बजावून कोल्हापूर जिल्हा प्रवेश बंदी करत असल्याचे आदेश काढले आहेत. ही नोटीस किरीट सोमय्या यांना दिल्यानंतर मुंबई पोलिसांनी सोमय्यांना स्थानबद्ध केले आहेत.

याबाबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर(Pravin Darekar) म्हणाले की, एखाद्या व्यक्तीला स्थानबद्ध करून त्यांना संविधानाने दिलेल्या अधिकाराचं हनन केले जात आहे. पोलिसांना सरकारी आदेशाचं पालन करावं लागतं. परंतु द्यायचे असेल तर लेखी आदेश द्यावेत. कुठल्याही प्रकारे लिखित आदेश न देता पोलिसांना सूचना दिल्या जातात. पोलिसांचा वापर करून आक्रमक होता येतं का? कायदा-सुव्यवस्थेची काळजी घेण्याऐवजी बिघडवण्याचं काम कोण करतात? उद्या आमचे २०-२५ हजार कार्यकर्ते जमले तर तर परिस्थिती बिघडणार नाही का? असा सवाल त्यांनी केली.

तसेच ठाकरे सरकार पोलीस बळाचा वापर करून मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. गणेश विसर्जनालाही किरीट सोमय्यांना(BJP Kirit Samaiya) जाता येत नाही. महाराष्ट्राच्या इतिहासात एका नेत्याला नजरकैदेत ठेवणं हे पहिल्यांदाच घडतंय. पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेवली जाते. पोलिसांना विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देता येत नाही. तुघलकी कारभार करता येणार नाही. ही मोगलाई लागून गेली नाही अशा शब्दात प्रविण दरेकर यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

दरम्यान, कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात येऊ नये अशी नोटीस बजावली आहे. या नोटिसीत म्हटलं आहे की, किरीट सोमय्या यांना कोल्हापूर जिल्ह्यात प्रवेश बंदी करण्यात आली आहे. जाणीवपूर्वक अशाप्रकारे ठाकरे सरकार दहशत माजवण्याचं काम करतंय. कोल्हापूर जिल्हा प्रवेश बंदी असताना मुंबईत बाहेर पडण्यास का बंदी? महालक्ष्मी एक्सप्रेसनं मी कोल्हापूरला जाणार आहे. दिलीप वळसे पाटील तुम्ही अनिल देशमुख नाही. कुठलाही अधिकार नसताना मुंबई पोलीस का अडवतेय? मी लिखित मुलुंड पोलीस स्टेशनला तक्रार देणार आहे. कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांची नोटीस असताना माझ्या घराबाहेर पोलिसांनी बंदोबस्त ठेवला. उद्धव ठाकरे, दिलीप वळसे पाटील मला मुंबईत गणेश विसर्जनाला जाऊ देत नाही. हम करे सो कायदा असा कारभार सरकारचा सुरु आहे. माझ्या घराबाहेर १०० पोलीस उभे केलेत. मला अटक करायला आलेत असं पोलिसांनी सांगितले पण कुठल्या कलमाखाली हेच सांगत नाहीत असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.

टॅग्स :BJPभाजपाKirit Somaiyaकिरीट सोमय्याpravin darekarप्रवीण दरेकरkolhapurकोल्हापूरPoliceपोलिस