शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
3
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
4
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
5
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
6
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
7
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
8
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
9
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
10
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
11
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
12
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
13
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
14
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
15
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
16
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
17
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
18
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
19
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
20
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल

ठाकरे सरकारचा तुघलकी कारभार; किरीट सोमय्यांना नजरकैदेत ठेवल्याप्रकरणी भाजपा आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2021 17:44 IST

ठाकरे सरकार पोलीस बळाचा वापर करून मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न केला जात आहे असा आरोप भाजपाने केला आहे.

ठळक मुद्देकोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात येऊ नये अशी नोटीस बजावली आहेकुठलाही अधिकार नसताना मुंबई पोलीस का अडवतेय? मी लिखित मुलुंड पोलीस स्टेशनला तक्रार देणार आहे. मला अटक करायला आलेत असं पोलिसांनी सांगितले पण कुठल्या कलमाखाली हेच सांगत नाहीत

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर लावलेल्या घोटाळ्याच्या आरोपानंतर पुन्हा एकदा किरीट सोमय्या चर्चेत आले आहेत. कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी सोमय्यांना नोटीस बजावून कोल्हापूर जिल्हा प्रवेश बंदी करत असल्याचे आदेश काढले आहेत. ही नोटीस किरीट सोमय्या यांना दिल्यानंतर मुंबई पोलिसांनी सोमय्यांना स्थानबद्ध केले आहेत.

याबाबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर(Pravin Darekar) म्हणाले की, एखाद्या व्यक्तीला स्थानबद्ध करून त्यांना संविधानाने दिलेल्या अधिकाराचं हनन केले जात आहे. पोलिसांना सरकारी आदेशाचं पालन करावं लागतं. परंतु द्यायचे असेल तर लेखी आदेश द्यावेत. कुठल्याही प्रकारे लिखित आदेश न देता पोलिसांना सूचना दिल्या जातात. पोलिसांचा वापर करून आक्रमक होता येतं का? कायदा-सुव्यवस्थेची काळजी घेण्याऐवजी बिघडवण्याचं काम कोण करतात? उद्या आमचे २०-२५ हजार कार्यकर्ते जमले तर तर परिस्थिती बिघडणार नाही का? असा सवाल त्यांनी केली.

तसेच ठाकरे सरकार पोलीस बळाचा वापर करून मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. गणेश विसर्जनालाही किरीट सोमय्यांना(BJP Kirit Samaiya) जाता येत नाही. महाराष्ट्राच्या इतिहासात एका नेत्याला नजरकैदेत ठेवणं हे पहिल्यांदाच घडतंय. पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेवली जाते. पोलिसांना विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देता येत नाही. तुघलकी कारभार करता येणार नाही. ही मोगलाई लागून गेली नाही अशा शब्दात प्रविण दरेकर यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

दरम्यान, कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात येऊ नये अशी नोटीस बजावली आहे. या नोटिसीत म्हटलं आहे की, किरीट सोमय्या यांना कोल्हापूर जिल्ह्यात प्रवेश बंदी करण्यात आली आहे. जाणीवपूर्वक अशाप्रकारे ठाकरे सरकार दहशत माजवण्याचं काम करतंय. कोल्हापूर जिल्हा प्रवेश बंदी असताना मुंबईत बाहेर पडण्यास का बंदी? महालक्ष्मी एक्सप्रेसनं मी कोल्हापूरला जाणार आहे. दिलीप वळसे पाटील तुम्ही अनिल देशमुख नाही. कुठलाही अधिकार नसताना मुंबई पोलीस का अडवतेय? मी लिखित मुलुंड पोलीस स्टेशनला तक्रार देणार आहे. कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांची नोटीस असताना माझ्या घराबाहेर पोलिसांनी बंदोबस्त ठेवला. उद्धव ठाकरे, दिलीप वळसे पाटील मला मुंबईत गणेश विसर्जनाला जाऊ देत नाही. हम करे सो कायदा असा कारभार सरकारचा सुरु आहे. माझ्या घराबाहेर १०० पोलीस उभे केलेत. मला अटक करायला आलेत असं पोलिसांनी सांगितले पण कुठल्या कलमाखाली हेच सांगत नाहीत असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.

टॅग्स :BJPभाजपाKirit Somaiyaकिरीट सोमय्याpravin darekarप्रवीण दरेकरkolhapurकोल्हापूरPoliceपोलिस