शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
4
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
5
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
6
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
7
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
8
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
9
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
10
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
11
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
12
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
13
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
14
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
17
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
18
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
19
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
20
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू

ठाकरे सरकारचा तुघलकी कारभार; किरीट सोमय्यांना नजरकैदेत ठेवल्याप्रकरणी भाजपा आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2021 17:44 IST

ठाकरे सरकार पोलीस बळाचा वापर करून मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न केला जात आहे असा आरोप भाजपाने केला आहे.

ठळक मुद्देकोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात येऊ नये अशी नोटीस बजावली आहेकुठलाही अधिकार नसताना मुंबई पोलीस का अडवतेय? मी लिखित मुलुंड पोलीस स्टेशनला तक्रार देणार आहे. मला अटक करायला आलेत असं पोलिसांनी सांगितले पण कुठल्या कलमाखाली हेच सांगत नाहीत

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर लावलेल्या घोटाळ्याच्या आरोपानंतर पुन्हा एकदा किरीट सोमय्या चर्चेत आले आहेत. कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी सोमय्यांना नोटीस बजावून कोल्हापूर जिल्हा प्रवेश बंदी करत असल्याचे आदेश काढले आहेत. ही नोटीस किरीट सोमय्या यांना दिल्यानंतर मुंबई पोलिसांनी सोमय्यांना स्थानबद्ध केले आहेत.

याबाबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर(Pravin Darekar) म्हणाले की, एखाद्या व्यक्तीला स्थानबद्ध करून त्यांना संविधानाने दिलेल्या अधिकाराचं हनन केले जात आहे. पोलिसांना सरकारी आदेशाचं पालन करावं लागतं. परंतु द्यायचे असेल तर लेखी आदेश द्यावेत. कुठल्याही प्रकारे लिखित आदेश न देता पोलिसांना सूचना दिल्या जातात. पोलिसांचा वापर करून आक्रमक होता येतं का? कायदा-सुव्यवस्थेची काळजी घेण्याऐवजी बिघडवण्याचं काम कोण करतात? उद्या आमचे २०-२५ हजार कार्यकर्ते जमले तर तर परिस्थिती बिघडणार नाही का? असा सवाल त्यांनी केली.

तसेच ठाकरे सरकार पोलीस बळाचा वापर करून मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. गणेश विसर्जनालाही किरीट सोमय्यांना(BJP Kirit Samaiya) जाता येत नाही. महाराष्ट्राच्या इतिहासात एका नेत्याला नजरकैदेत ठेवणं हे पहिल्यांदाच घडतंय. पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेवली जाते. पोलिसांना विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देता येत नाही. तुघलकी कारभार करता येणार नाही. ही मोगलाई लागून गेली नाही अशा शब्दात प्रविण दरेकर यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

दरम्यान, कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात येऊ नये अशी नोटीस बजावली आहे. या नोटिसीत म्हटलं आहे की, किरीट सोमय्या यांना कोल्हापूर जिल्ह्यात प्रवेश बंदी करण्यात आली आहे. जाणीवपूर्वक अशाप्रकारे ठाकरे सरकार दहशत माजवण्याचं काम करतंय. कोल्हापूर जिल्हा प्रवेश बंदी असताना मुंबईत बाहेर पडण्यास का बंदी? महालक्ष्मी एक्सप्रेसनं मी कोल्हापूरला जाणार आहे. दिलीप वळसे पाटील तुम्ही अनिल देशमुख नाही. कुठलाही अधिकार नसताना मुंबई पोलीस का अडवतेय? मी लिखित मुलुंड पोलीस स्टेशनला तक्रार देणार आहे. कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांची नोटीस असताना माझ्या घराबाहेर पोलिसांनी बंदोबस्त ठेवला. उद्धव ठाकरे, दिलीप वळसे पाटील मला मुंबईत गणेश विसर्जनाला जाऊ देत नाही. हम करे सो कायदा असा कारभार सरकारचा सुरु आहे. माझ्या घराबाहेर १०० पोलीस उभे केलेत. मला अटक करायला आलेत असं पोलिसांनी सांगितले पण कुठल्या कलमाखाली हेच सांगत नाहीत असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.

टॅग्स :BJPभाजपाKirit Somaiyaकिरीट सोमय्याpravin darekarप्रवीण दरेकरkolhapurकोल्हापूरPoliceपोलिस