शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
2
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
3
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
4
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
5
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
6
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
7
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
8
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
9
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
10
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
Daily Top 2Weekly Top 5

एक मोहीम गमावली म्हणून, पूर्ण लढाई हरलो असं नाही: फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2020 11:19 IST

भाजपच्या कार्यकर्त्याने मैदानात उतरले पाहिजे,असे फडणवीस म्हणाले.

मुंबई : शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवेल असे वचन मी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना दिले असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणतात, मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाच्या जीवावर शिवसेनेच्या मुख्यमंत्री बनवणार असल्याचे वचन दिले होते का, असे म्हणत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. तर आम्ही एक मोहीम गमावली म्हणून, पूर्ण लढाई हरलो असं होत नसल्याचे सुद्धा ते म्हणाले.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षासोबत जाण्याच्या निर्णयावरून बाळासाहेब ठाकरे यांनी तुम्हाला कधीच माफ केलं नसतं. तसेच विश्वासघात तर झालाच आहे, मात्र आता रडायचं नाही तर लढायचं. त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्याने मैदानात उतरले पाहिजे,असे फडणवीस म्हणाले.

तर आता ही लढाई आपल्याला जिंकायची असून, एखादी मोहीम हरल्याने ती लढाई मागे पुढे होत नाही. एखाद्या विश्वासघातानं सरकार गेले तर आपण हात-पाय गाळून बसणाऱ्यांपैकी नाही. त्यामुळे विरोधी पक्षांची भूमिका सुद्धा ताकदीने निभावली पाहिजे. अंगचोरून काम होत नाही. विरोधी पक्षात काम करायचे असेल तर रस्त्यावर भिडाव लागतं,समाजाच्या वेदना मांडाव्या लागतात, असेही ते म्हणाले.