शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

५ ते १२ नोव्हेंबरदरम्यान राज्यात पक्षी सप्ताह; पक्ष्यांचे महत्त्व, अधिवासाची मिळणार माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2020 06:59 IST

Maharashtra News : राज्य वन्यजीव मंडळाच्या १५ व्या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार, दरवर्षी या कालावधीत पक्षी सप्ताह साजरा करण्याची बाब विचाराधीन होती. आता  महाराष्ट्र राज्य पक्षी सप्ताह साजरे करणारे भारतातील पहिले राज्य आहे. 

मुंबई : पद्मभूषण डॉ. सलीम अली यांच्या जयंतीचे औचित्य साधत आणि साहित्यिक, सेवानिवृत्त वनाधिकारी मारुती चितमपल्ली यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधत ५ ते १२ नोव्हेंबर या कालावधीत दरवर्षी पक्षी सप्ताह साजरा करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. राज्य वन्यजीव मंडळाच्या १५ व्या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार, दरवर्षी या कालावधीत पक्षी  सप्ताह साजरा करण्याची बाब विचाराधीन होती. आता  महाराष्ट्र राज्य पक्षी सप्ताह साजरे करणारे भारतातील पहिले राज्य आहे. महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळाच्या १५ व्या बैठकीत मंडळाचे सदस्य यादव तरटे पाटील यांनी हा विषय ठेवून पाठपुरावा केला होता. शासन निर्णय निर्गमित झाला असून, सर्व पक्षिमित्रांचे अभिनंदन केले जात आहे. पक्षी सप्ताहामध्ये पक्ष्यांचे निसर्गातील महत्त्व, संकटग्रस्त पक्षी आणि त्यांचे अधिवास, स्थलांतर, अधिवासाचे संरक्षण, पक्षी संरक्षण व संवर्धन कायद्याविषयी माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत. सर्वसामान्य नागरिकांसाठी पक्षी छायाचित्र प्रदर्शन, पक्षी  छायाचित्र स्पर्धा आयोजित करण्यात याव्यात.  शालेय विद्यार्थ्यांकरिता चित्रकला, निबंध स्पर्धा, छायाचित्र प्रदर्शनी, कार्यशाळा, माहितीपटाचे आयोजन करण्यात यावे. स्थलांतरित पक्ष्यांचे अधिवास, पाणथळी, तलाव, धरण, जंगल येथे कार्यक्रम आयोजित करावे. पक्षी गणना, अधिवास स्वच्छता, पक्षी अभ्यास असे  कार्यक्रम आयोजित करण्यात  यावेत. जलसंपदा, कृषी, पोलीस विभाग यांच्या शासकीय यंत्रणांना यात सहभागी करून घ्यावे, अशा सूचना यानिमित्ताने देण्यात आल्या  आहेत. 

जन्मदिन आणि जयंतीचे औचित्य साधत पक्षी सप्ताहनोव्हेंबर हा महिना पक्षी स्थलांतरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. मारुती चितमपल्ली यांचा जन्मदिन ५ नोव्हेंबर असून, सलीम अली यांची जयंती १२ नोव्हेंबर रोजी असते. जन्मदिन आणि जयंतीचे औचित्य साधत ५ ते १२ नोव्हेंबर हा आठवडा पक्षी सप्ताह साजरा करण्यात यावा, अशी मागणी पक्षीप्रेमी संस्था आणि राज्य वन्यजीव मंडळातील सदस्यांकडून होत होती. या मागणीचा विचार करत हा निर्णय घेण्यात आला आहे.सलीम अली यांच्या द बुक ऑफ इंडियन बर्ड्सच्या आधारावर अनेक पक्षीमित्र वाटचाल करत आहेत. मारुती चितमपल्ली यांचे वन्यजीवविषयक साहित्य वाचून महाराष्ट्रातील अनेक जण पक्षी व वन्यजीव अभ्यास व संवर्धनाकडे वळले आहेत. योगायोगाने या दोघांचा जन्मदिवस नोव्हेंबर महिन्यात येतो. 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रwildlifeवन्यजीव