शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

बळीराजाची दिवाळी अंधारातच!, व्यापा-यांनी भाव पाडले, परतीच्या पावसाने कृषीमालाची प्रतवारी खराब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2017 05:05 IST

परतीच्या पावसाने शेतमालाचे नुकसान झाल्याने बळीराजा दिवाळीत दुहेरी संकटात सापडला आहे. कृषीमालाची प्रतवारी खराब झाल्याचे सांगत ऐन दिवाळीत व्यापा-यांनी शेतक-यांची अडवणूक करत भाव पाडले आहेत.

- योगेश बिडवईमुंबई : परतीच्या पावसाने शेतमालाचे नुकसान झाल्याने बळीराजा दिवाळीत दुहेरी संकटात सापडला आहे. कृषीमालाची प्रतवारी खराब झाल्याचे सांगत ऐन दिवाळीत व्यापा-यांनी शेतक-यांची अडवणूक करत भाव पाडले आहेत. तर भारनियमनामुळे पाणी असून कृषिपंप बंद असल्याने दिवाळी अंधारातच साजरी होत आहे.विदर्भात पावसामुळे शेतमाल खराब झाल्याचे सांगत व्यापा-यांनी भाव पाडले आहेत. गेल्या वर्षी कापसाला क्विंटलला ५२०० रुपये भाव होता. यंदा तो चार हजारांवर आला आहे. कृषीमालाची हमीभावाने खरेदी न केल्यास गुन्हे दाखल करण्याचे आदेश असले तरी व्यापाºयांनी त्यास दाद दिलेली नाही, अशी माहिती शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते विजय जावंधिया यांनी ‘लोकमत’ला दिली. पावसामुळे कपाशी पडणे, बोंडे काळी होण्यासारखे संकट ओढवले आहे. चिखलामुळे कापूस वेचणीही अचडणीत आली आहे. सोयाबीन ओले झाल्याने त्यालाही भाव नाही.मराठवाड्यात कडधान्यालाही फटका बसला आहे. उदीड, मुगाला क्विंटलला ३२०० ते ३४०० रुपये भाव आहे. तर सोयाबीन २७०० रुपयांपर्यंत विकले जात आहे.सरकारी खरेदी केंद्रावर माल खरेदी करताना अटीच खूप असल्याचे हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरीचे शेतकरी अविनाश गुंजकर यांनी सांगितले. हिंगोलीत दोन केंद्रे जाहीर झाले असताना अजून एकही सुरू झाले नसल्याचेही ते म्हणाले.पश्चिम व उत्तर महाराष्ट्रातही धान्य बाजारात विशेष तेजी नाही. क्विंटलमागे मका ८०० ते १३०० तर सोयाबीन २४०० ते २८०० रुपये दराने खरेदी केला जात आहे. त्यामुळे शेतक-याला खर्च निघणेही अवघड झाले आहे. नाशिक, पुण्यात दिवाळीतही भाजीपाला विक्रीतून चार चांगले पैसे मिळविण्याचे शेतक-यांचे स्वप्न पूर्ण झालेले नाही.गेल्या वर्षी कापसाला ५२०० ते ५५०० रु. भाव होता. या वर्षी४ हजार रुपये भाव आहे. भावाअभावी शेतक-याचे दिवाळे निघाले आहे.- विजय जावंधिया,ज्येष्ठ नेते, शेतकरी संघटनानाफेडमार्फत तेलबिया व कडधान्याची आॅनलाइन खरेदी करण्याचे आदेश सरकारने दिलेत. त्याचे राज्यातील संबंधित केंद्रांवरील कर्मचाºयांना प्रशिक्षणही दिले आहे. लवकरच खरेदी सुरू होईल. शेतकºयांना दिलासा देण्याचा प्रयत्न आहे.- नानासाहेब पाटील, संचालक, नाफेड१०१ केंद्रांवर हमीभावाने खरेदीराज्यात पणन मंत्रालयाकडून १०१ केंद्रांवर हमीभावाने उडीद, मूग, सोयाबीनची खरेदी सुरू असल्याचे सरकारी पातळीवर सांगितले जात आहे. मात्र अनेक केंद्रे अजून सुरू झालेली नाहीत, असे शेतकºयांचे म्हणणे आहे. ही खरेदी केंद्रे प्रामुख्याने विदर्भ व मराठवाड्यात आहेत. मक्याबाबत मात्र अजून निर्णय झालेला नाही.आॅनलाइन खरेदीचा गोंधळआॅनलाइन खरेदीला अजून सुरुवात झालेली नाही. त्यासाठी शेतकºयाला सात-बारा उताºयासह इतर पुरावे द्यावे लागणार आहेत. सात-बारा उताºयावर नोंद नसल्यास त्याची सरकारी खरेदी होणार नाही.शेतमाल हमीभाव प्रत्यक्ष दर(क्विंटल/रु.) (क्विंटल/रु.)भरडधान्ये ५,०५० ३२००-३४००सोयाबीन ३,०५० २६००-२७००कापूस ४,१२०-४३२० ४,०००मका १,४२५ —-

टॅग्स :FarmerशेतकरीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार