शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

बळीराजाची दिवाळी अंधारातच!, व्यापा-यांनी भाव पाडले, परतीच्या पावसाने कृषीमालाची प्रतवारी खराब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2017 05:05 IST

परतीच्या पावसाने शेतमालाचे नुकसान झाल्याने बळीराजा दिवाळीत दुहेरी संकटात सापडला आहे. कृषीमालाची प्रतवारी खराब झाल्याचे सांगत ऐन दिवाळीत व्यापा-यांनी शेतक-यांची अडवणूक करत भाव पाडले आहेत.

- योगेश बिडवईमुंबई : परतीच्या पावसाने शेतमालाचे नुकसान झाल्याने बळीराजा दिवाळीत दुहेरी संकटात सापडला आहे. कृषीमालाची प्रतवारी खराब झाल्याचे सांगत ऐन दिवाळीत व्यापा-यांनी शेतक-यांची अडवणूक करत भाव पाडले आहेत. तर भारनियमनामुळे पाणी असून कृषिपंप बंद असल्याने दिवाळी अंधारातच साजरी होत आहे.विदर्भात पावसामुळे शेतमाल खराब झाल्याचे सांगत व्यापा-यांनी भाव पाडले आहेत. गेल्या वर्षी कापसाला क्विंटलला ५२०० रुपये भाव होता. यंदा तो चार हजारांवर आला आहे. कृषीमालाची हमीभावाने खरेदी न केल्यास गुन्हे दाखल करण्याचे आदेश असले तरी व्यापाºयांनी त्यास दाद दिलेली नाही, अशी माहिती शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते विजय जावंधिया यांनी ‘लोकमत’ला दिली. पावसामुळे कपाशी पडणे, बोंडे काळी होण्यासारखे संकट ओढवले आहे. चिखलामुळे कापूस वेचणीही अचडणीत आली आहे. सोयाबीन ओले झाल्याने त्यालाही भाव नाही.मराठवाड्यात कडधान्यालाही फटका बसला आहे. उदीड, मुगाला क्विंटलला ३२०० ते ३४०० रुपये भाव आहे. तर सोयाबीन २७०० रुपयांपर्यंत विकले जात आहे.सरकारी खरेदी केंद्रावर माल खरेदी करताना अटीच खूप असल्याचे हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरीचे शेतकरी अविनाश गुंजकर यांनी सांगितले. हिंगोलीत दोन केंद्रे जाहीर झाले असताना अजून एकही सुरू झाले नसल्याचेही ते म्हणाले.पश्चिम व उत्तर महाराष्ट्रातही धान्य बाजारात विशेष तेजी नाही. क्विंटलमागे मका ८०० ते १३०० तर सोयाबीन २४०० ते २८०० रुपये दराने खरेदी केला जात आहे. त्यामुळे शेतक-याला खर्च निघणेही अवघड झाले आहे. नाशिक, पुण्यात दिवाळीतही भाजीपाला विक्रीतून चार चांगले पैसे मिळविण्याचे शेतक-यांचे स्वप्न पूर्ण झालेले नाही.गेल्या वर्षी कापसाला ५२०० ते ५५०० रु. भाव होता. या वर्षी४ हजार रुपये भाव आहे. भावाअभावी शेतक-याचे दिवाळे निघाले आहे.- विजय जावंधिया,ज्येष्ठ नेते, शेतकरी संघटनानाफेडमार्फत तेलबिया व कडधान्याची आॅनलाइन खरेदी करण्याचे आदेश सरकारने दिलेत. त्याचे राज्यातील संबंधित केंद्रांवरील कर्मचाºयांना प्रशिक्षणही दिले आहे. लवकरच खरेदी सुरू होईल. शेतकºयांना दिलासा देण्याचा प्रयत्न आहे.- नानासाहेब पाटील, संचालक, नाफेड१०१ केंद्रांवर हमीभावाने खरेदीराज्यात पणन मंत्रालयाकडून १०१ केंद्रांवर हमीभावाने उडीद, मूग, सोयाबीनची खरेदी सुरू असल्याचे सरकारी पातळीवर सांगितले जात आहे. मात्र अनेक केंद्रे अजून सुरू झालेली नाहीत, असे शेतकºयांचे म्हणणे आहे. ही खरेदी केंद्रे प्रामुख्याने विदर्भ व मराठवाड्यात आहेत. मक्याबाबत मात्र अजून निर्णय झालेला नाही.आॅनलाइन खरेदीचा गोंधळआॅनलाइन खरेदीला अजून सुरुवात झालेली नाही. त्यासाठी शेतकºयाला सात-बारा उताºयासह इतर पुरावे द्यावे लागणार आहेत. सात-बारा उताºयावर नोंद नसल्यास त्याची सरकारी खरेदी होणार नाही.शेतमाल हमीभाव प्रत्यक्ष दर(क्विंटल/रु.) (क्विंटल/रु.)भरडधान्ये ५,०५० ३२००-३४००सोयाबीन ३,०५० २६००-२७००कापूस ४,१२०-४३२० ४,०००मका १,४२५ —-

टॅग्स :FarmerशेतकरीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार