शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

पुढील वर्षी स्वातंत्र्यानंतरचे सर्वात मोठे आर्थिक संकट : आनंद शर्मा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2019 21:28 IST

नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस यांना कधीच नोबेल मिळणार नाही. पण ज्यांना नोबेल पुरस्कार मिळाला आहे, किमान त्यांचा सन्मान तरी करा,

ठळक मुद्देराष्ट्रवाद व राष्ट्रभक्तीच्या नावाखाली मनभेद निर्माण अन्न सुरक्षा कायद्याची अंमलबजावणी करा

पुणे : देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलरवर नेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या भाजपाने देशासमोर मोठे आर्थिक संकट निर्माण केले आहे. आर्थिक बेशिस्त आणि नियोजनाच्या अभावामुळे उद्योग बंद पडत असून बेरोजगारी वाढली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर रुपयाचे मूल्य घसरत चालले आहे. वित्तीय तुट मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. यातून बाहेर पडण्यासाठी केंद्र सरकारकडे कोणताही ' रोडमॅप' नाही. त्यामुळे २०२० हे वर्ष आर्थिकदृष्ट्या स्वातंत्र्यानंतरचे सर्वात भयंकर असेल, अशी भीती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार आनंद शर्मा यांनी व्यक्त केले. प्रचाराच्या अखेरच्या दिवशी शर्मा यांनी काँग्रेस भवन येथे पत्रकार परिषदेत शर्मा बोलत होते. खासदार वंदना चव्हाण, काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या जरिता लेतफ्लँग, माजी खासदार रजनी पाटील, आमदार शरद रणपिसे, माजी आमदार मोहन जोशी आदी यावेळी उपस्थित होते. शर्मा म्हणाले, की सत्ताधाऱ्यांनी गेल्या पाच वर्षातील कामाचा हिशेब जनतेसमोर मांडणे गरजेचे होते.  राज्याशी संबंध नसलेले विषय मांडले जात आहेत. आपल्याकडे व्यक्तीवाद वाढला असून तो लोकशाहीसाठी धोकादायक असल्याची टीकी शर्मा यांनी केली.नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस यांना कधीच नोबेल मिळणार नाही. पण ज्यांना नोबेल पुरस्कार मिळाला आहे, किमान त्यांचा सन्मान तरी करा, अशा शब्दांत शर्मा यांनी पियुष गोयल यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. राष्ट्रवाद व राष्ट्रभक्तीच्या नावाखाली मनभेद निर्माण केले जात असल्याबद्दलही त्यांनी चिंता व्यक्त केली. ---------अन्न सुरक्षा कायद्याची अंमलबजावणी कराभुकेच्या निदेर्शांकात भारतापेक्षा पाकिस्तान, बांग्लादेश पुढे असल्याचे वास्तव आहे. जगातील मागासलेल्या देशांच्या पंक्तीत आपण आहोत. गुजरातमधील दोन जिल्हेही कुपोषणात आघाडीवर आहेत, अशी टीका शर्मा यांनी केली. भाजपा व शिवसेनेकडून पाच व दहा रुपयात जेवण देण्याच्या आश्वासनावर बोलताना त्यांनी अन्न सुरक्षा कायद्याची अंमलबजावणी करण्याचा सल्ला त्यांनी दिला. 

टॅग्स :Puneपुणेcongressकाँग्रेसElectionनिवडणूकBJPभाजपाGovernmentसरकारNarendra Modiनरेंद्र मोदीpiyush goyalपीयुष गोयल