शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

Maharashtra Political Crisis: शिवसेनेला मोठे खिंडार! जिल्हाप्रमुखच लागला गळाला? २५ पदाधिकारी, शेकडो कार्यकर्ते शिंदे गटात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2022 15:16 IST

Maharashtra Political Crisis: एकनाथ शिंदेंच्या मूळ गावी शिवसेनेची ताकद तोकडी पडत असल्याचा फायदा शिंदे गट घेणार असल्याचे सांगितले जात आहे.

सातारा:शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या ऐतिहासिक बंडखोरीनंतर पक्षाला मोठेच खिंडार पडल्याचे पाहायला मिळत आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आता कंबर कसली असून, आदित्य ठाकरेही (Aaditya Thackeray) सक्रीय झाले आहेत. यातच आदित्य ठाकरेही राज्यभर दौरे करत आहेत. मात्र, दुसरीकडे शिंदे गटालाही राज्यभरातून पाठिंबा वाढत आहे. साताऱ्यातील शिवसेनेच्या मोठ्या नेत्याने शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर आता २५ पदाधिकाऱ्यांसह शेकडो कार्यकर्तेही त्यांच्याच मार्गावर जाणार असल्याचे सांगितले जात आहे. 

शिवसेनेचे माजी नेते पुरुषोत्तम जाधव यांनी काही दिवसांपूर्वी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर जाधवांनी इतर शिवसैनिकांना संपर्क करत आता शिंदे गटात प्रवेश करण्याबाबत मनपरिवर्तन करत असल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय, खंडाळा तालुक्यातील सुमारे २५ पदाधिकाऱ्यांसह १०० पेक्षा जास्त शिवसैनिकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. या प्रवेशात आजी-माजी पदाधिकाऱ्यांचा समावेश असून साताऱ्यात शिवसेनेसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

शिवसैनिकांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला

खंडाळा येथे शिवसैनिकांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला. यावेळी बंडखोर आमदार भरत गोगावले यांनी त्यांच्यासोबत फोनवरून संवाद साधत तुम्हाला काही कमी पडू देणार नाही, असा विश्वास दिला आहे. तसेच आता शिवसेनेचा जिल्हाप्रमुखही शिंदे गटाच्या गळाला लागल्याच्या चर्चा साताऱ्यात सुरू आहेत. साताऱ्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत शिंदे गटातील नेत्यांच्या बैठका सध्या सुरू आहेत. यामुळे नक्की किती शिवसैनिक शिंदे गटात जाणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र, असे असले तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मूळ गाव असलेल्या सातारा जिल्ह्यातून जास्तीत जास्त शिवसैनिक आपल्या गटाला मिळाले पाहिजे, असे प्रयत्न शिंदे गटाचे सुरू असल्याचे सांगितले जात आहे. 

दरम्यान, पुरुषोत्तम जाधव हे मितभाषी आहेत. जिल्ह्यातील इतर नेत्यांसोबत जाधव यांच्या असलेल्या संपर्काचा फायदा उचलत त्यांना जिल्हाभर फिरवून संपर्कातले पदाधिकारी कसे जाळ्यात येतील, यासाठीचे प्रयत्न सुरू केले आहेत. दुसऱ्या बाजुला जिल्ह्यातील शिवसेनेची ताकद आता तोकडी पडताना पाहायला मिळत आहे. जिल्ह्यात शिवसेनेचे ३ जिल्हाप्रमुख काम करत आहेत. तरीही शिवसेनेला मोठे खिंडार पडल्याचं चित्र आहे. जिल्हा शिवसेनेत समन्वयाचा अभाव असल्याचे बोलले जाते. तसंच पक्षाचे संपर्कप्रमुखच संपर्काच्या बाहेर आहेत, अशी अवस्था असल्याची चर्चा आहे. 

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना