शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

Maharashtra Politics: मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची भाजपाला धास्ती; राज्यात लोकसभेसोबत विधानसभा टाळणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2023 08:51 IST

उद्धव ठाकरेंची सहानुभूती रोखण्यासाठी भाजपची रणनीती

- संजय शर्मालोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीसोबत विधानसभा निवडणुका होणार नाहीत. विधानसभा निवडणुका वेळेवरच होतील. उद्धव ठाकरे यांना मिळणारी जनतेची सहानुभूती रोखण्यासाठी भाजपने रणनीती तयार केली आहे. याचा परिणाम आगामी काळात दिसणार आहे.

महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीसोबतच विधानसभा निवडणुकाही होणार असल्याची चर्चा होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनीही म्हटले होते की, महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका लवकर होऊ शकतात. लोकसभा निवडणुकीपूर्वीही महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होऊ शकतात.पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वालाही महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४८ जागांची चिंता आहे. विशेषत: राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची आघाडी तोडण्याची तयारी सुरू आहे. धनुष्यबाण आणि शिवसेना पक्ष एकनाथ शिंदे यांना मिळाल्यानंतर जनतेची सहानुभूती उद्धव ठाकरे यांना मिळते की काय, अशी काळजी भाजपला आहे.

लोकसभा निवडणुकीसोबत महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका घेण्याचा विचार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फेटाळून लावला आहे. लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यात थेट लढत होते. याचा फायदा भाजपला मिळतो; पण विधानसभा निवडणुका सोबत घेतल्यास लोकसभा निवडणुकीत नुकसान होऊ शकते. कारण, महाराष्ट्रात उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या नावावर मत पडणार आहे. तेव्हा ही लढत नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी होणार नाही.

काय आहे रणनीती ?उद्धव ठाकरे यांना सहानुभूती मिळताना दिसत आहे. ही सहानुभूती रोखण्यासाठी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध अभियान चालविण्यास महाराष्ट्र भाजपला सांगितले आहे. तसेच, सामान्य जनतेपर्यंत काही मुद्दे पोहोचविण्यास सांगण्यात आले आहे. यात उद्धव ठाकरे यांच्याकडून हिंदुत्व सोडणे आणि हिंदुत्वाच्या विरोधकांसोबत आघाडी करण्याचा मुद्दा आहे. उद्धव ठाकरे यांनी कशा प्रकारे बाळासाहेब ठाकरे यांनी दाखविलेल्या मार्गावरून स्वत:ला दूर केले. तसेच, ज्या काँग्रेससोबत बाळासाहेबांनी आयुष्यभर संघर्ष केला त्यांच्यासोबत हातमिळवणी केली, या मुद्द्यांचा यात समावेश आहे. महाराष्ट्रात २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत ४८ पैकी ३५ जागा जिंकण्याची रणनीती भाजपने आखली आहे.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी