शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

मविआबद्दल मोठी बातमी: प्रमुख नेत्यांची लवकरच दिल्लीत बैठक, जागावाटपावर शिक्कामोर्तब होणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2024 18:00 IST

जागावाटपाचा तिढा सोडवण्यासाठी आता नवी दिल्ली येथे महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Maha Vikas Aghadi MVA ( Marathi News ) :लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं असून जागावाटपावरून महाविकास आघाडीत मोठा पेच निर्माण झाला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत आता प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीदेखील मविआमध्ये सामील होण्याची शक्यता आहे. मात्र या चारही पक्षांतील विविध नेत्यांकडून जागांच्या वाटपावरून दावे-प्रतिदावे करत एकमेकांवर निशाणा साधण्यात येत आहे. मित्रपक्षातील नेतेच टीकास्त्र सोडू लागल्याने मविआच्या कार्यकर्त्यांमध्येही गोंधळाचं वातावरण निर्माण झालं आहे. या पार्श्वभूमीवर जागावाटपाचा तिढा सोडवण्यासाठी आता नवी दिल्ली येथे महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक होणार असल्याची माहिती समोर आली आहे. जागावाटपावर अंतिम शिक्कामोर्तब करण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे या नेत्यांची बैठक होणार आहे.

दिल्लीत १४ किंवा १५ तारखेला होणाऱ्या या हाय व्होल्टेज बैठकीत लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जागावाटपावर एकमत करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. जो पक्ष ज्या ठिकाणी मजबूत असेल ती जागा सदर पक्षाला दिली जावी, या सूत्राच्या आधारे मविआचे हे नेते जागावाटपावर तोडगा काढणार असल्याचे समजते. जागावाटपाचा तिढा जितक्या लवकरात लवकर सुटेल तितका फायदा मविआला निवडणुकीत होईल, असं या सर्वच नेत्यांचं म्हणणं असल्याने ही बैठक आयोजित करण्यात आली आहे.

कोणता पक्ष किती जागा लढवण्याची शक्यता?

महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ जागा असून आतापर्यंत मविआचे विविध संभाव्य फॉर्म्युले समोर आले आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आगामी निवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला १८ ते १९ जागा, काँग्रेसला १३ जागा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला १० जागा, वंचित आघाडीला २ जागा, स्वाभिमानी शेतकरी पक्ष २ जागा आणि बहुजन विकास आघाडी १ जागा देण्यावर एकमत होऊ शकतं. मात्र अजून चार जागांवर असलेल्या चर्चा अंतिम टप्यात असून लवकरच मविआचे अंतिम जागावाटप जाहीर करण्यात येईल अशी माहिती सूत्रांनी दिली.

मुंबईतून सहा लोकसभा जागांपैकी दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई आणि उत्तर पश्चिम मुंबई या तीन जागा शिवसेना उबाठा लढवण्याची शक्यता असून उत्तर मध्य मुंबई आणि उत्तर मुंबई या दोन जागा काँग्रेस लढणार असून उत्तर पूर्व मुंबईची जागा राष्ट्रवादीला सोडण्यात येण्याची शक्यता आहे. तर रायगड, संभाजी नगर या दोन जागा ठाकरेंच्या शिवसेनेला सोडण्यात आल्याची माहिती आहे. काँगसच्या १३ जागांमध्ये  उत्तर मुंबई, उत्तर मध्य मुंबई, भिवंडी, पुणे, सोलापूर, लातूर, नांदेड, धुळे, नंदुरबार, नागपूर, रामटेक, चंद्रपूर, गडचिरोली, तर वंचितसाठी अकोला, शिर्डी आणि राजू शेट्टी यांना कोल्हापूर, हातकणंगले, तर बहुजन विकास आघाडी सामील झाल्यास त्यांना पालघरची जागा सोडण्यात येण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीlok sabhaलोकसभाSharad Pawarशरद पवारSonia Gandhiसोनिया गांधीUddhav Thackerayउद्धव ठाकरे