शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Political Crisis: शिंदे-फडणवीसांचा शिवसेनेला दणका! विधानसभा ‘या’ समितीतून ठाकरे गट बेदखल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2022 15:31 IST

Maharashtra Political Crisis: विधिमंडळातील एका महत्त्वाच्या समितीत शिवसेनेचा कोणताही सदस्य नसल्यामुळे त्यातून उद्धव ठाकरे गटाला बेदखल आले का, याची चर्चा रंगली आहे.

Maharashtra Political Crisis: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शपथ घेऊन ३८ दिवस झाल्यानंतर अखेर मंत्रिमंडळाच्या मुहुर्ताला मूर्त रुप आले. यात भाजपच्या ९ आणि शिंदे गटातील ९ आमदारांनी शपथ घेतली. यानंतर लगेचच नव्या शिंदे-भाजप सरकारने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गटाला मोठा दणका दिल्याचे सांगितले जात आहे. विधानसभेच्या एका महत्त्वाच्या समितीतून शिवसेनेचा कोणताही सदस्य नसल्यामुळे त्यातून उद्धव ठाकरे गटाला बेदखल करण्यात आल्याची चर्चा रंगली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, विधानसभेच्या कामकाज सल्लागारांची एक समिती असते. ही समिती महत्त्वाची मानली जाते. आणि या कामकाज सल्लागार समितीतून उद्धव ठाकरे गटाच्या एकाही सदस्याचा समावेश नसल्याचे सांगितले जात आहे. यासंदर्भात ठाकरे गटाचे विधिमंडळातील गटनेते अजय चौधरी यांनी विधानसभा अध्यक्षांकडे याबाबतची तक्रार केल्याची माहिती देण्यात आली आहे. 

ठाकरे गटातील एकाही सदस्याला समितीत संधी नाही?

विधिमंडळाचे अधिवेशन घेण्यात येते, तेव्हा कामकाज सल्लागार समितीची एक बैठक बोलावली जाते. या सल्लागार समितीत प्रत्येक पक्षाच महत्त्वाचे नेते आणि पदाधिकारी यांचा समावेश केला जातो. या सर्वानुमते अधिवेशनाची तारीख, ठिकाण यांसह अन्य बाबी ठरवण्यात येतात. यामध्ये प्रत्येकाचा सहभाग असतो. सर्वजण आपापली मते देऊन, अमूक एक गोष्ट करण्याबाबत सांगत असतात. मात्र, या सल्लागार समितीच्या बैठकीविषय शिवसेनेच्या म्हणजेच उद्धव ठाकरे गटाच्या आमदाराला पत्र आलेले नाही, अशी माहिती देण्यात आलेली आहे. 

विधानसभा अध्यक्षांना दिलेल्या पत्रात काय?

तशी तरतूद असल्याचे दिसले नाही. याबाबत चिंता व्यक्त करणारे आणि रोष व्यक्त करणारे एक पत्र गटनेते अजय चौधरी यांनी विधानसभा अध्यक्षांना लिहिले आहे. तसेच या समितीत आमचाही सहभाग असावा, नियमबाह्य आणि बेकायदेशीर कृती करू नये. विधिमंडळात शिवसेना पक्ष अधिकृतरित्या असताना आम्हाला उपरोक्त समितीच्या सदस्यांची शिफारस करण्यासाठी पत्र दिलेले नाही, असे सांगत अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आलेले आहेत. तशी तक्रारच अजय चौधरी यांनी दिली आहे.  

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळVidhan Bhavanविधान भवनEknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरे