शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: नगरपरिषदेत चुरशीची लढाई: ठाकरेंच्या शिवसेनेने खाते उघडले, काँग्रेसही आघाडीवर; पहा लेटेस्ट अपडेट
2
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
3
Nagar Parishad Election Result: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
4
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
5
नात्याला काळीमा! विमा पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
6
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
7
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
8
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
9
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
10
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
11
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
12
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
13
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
14
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
15
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
16
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
17
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
18
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
19
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
20
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Political Crisis: शिंदे-फडणवीसांचा शिवसेनेला दणका! विधानसभा ‘या’ समितीतून ठाकरे गट बेदखल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2022 15:31 IST

Maharashtra Political Crisis: विधिमंडळातील एका महत्त्वाच्या समितीत शिवसेनेचा कोणताही सदस्य नसल्यामुळे त्यातून उद्धव ठाकरे गटाला बेदखल आले का, याची चर्चा रंगली आहे.

Maharashtra Political Crisis: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शपथ घेऊन ३८ दिवस झाल्यानंतर अखेर मंत्रिमंडळाच्या मुहुर्ताला मूर्त रुप आले. यात भाजपच्या ९ आणि शिंदे गटातील ९ आमदारांनी शपथ घेतली. यानंतर लगेचच नव्या शिंदे-भाजप सरकारने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गटाला मोठा दणका दिल्याचे सांगितले जात आहे. विधानसभेच्या एका महत्त्वाच्या समितीतून शिवसेनेचा कोणताही सदस्य नसल्यामुळे त्यातून उद्धव ठाकरे गटाला बेदखल करण्यात आल्याची चर्चा रंगली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, विधानसभेच्या कामकाज सल्लागारांची एक समिती असते. ही समिती महत्त्वाची मानली जाते. आणि या कामकाज सल्लागार समितीतून उद्धव ठाकरे गटाच्या एकाही सदस्याचा समावेश नसल्याचे सांगितले जात आहे. यासंदर्भात ठाकरे गटाचे विधिमंडळातील गटनेते अजय चौधरी यांनी विधानसभा अध्यक्षांकडे याबाबतची तक्रार केल्याची माहिती देण्यात आली आहे. 

ठाकरे गटातील एकाही सदस्याला समितीत संधी नाही?

विधिमंडळाचे अधिवेशन घेण्यात येते, तेव्हा कामकाज सल्लागार समितीची एक बैठक बोलावली जाते. या सल्लागार समितीत प्रत्येक पक्षाच महत्त्वाचे नेते आणि पदाधिकारी यांचा समावेश केला जातो. या सर्वानुमते अधिवेशनाची तारीख, ठिकाण यांसह अन्य बाबी ठरवण्यात येतात. यामध्ये प्रत्येकाचा सहभाग असतो. सर्वजण आपापली मते देऊन, अमूक एक गोष्ट करण्याबाबत सांगत असतात. मात्र, या सल्लागार समितीच्या बैठकीविषय शिवसेनेच्या म्हणजेच उद्धव ठाकरे गटाच्या आमदाराला पत्र आलेले नाही, अशी माहिती देण्यात आलेली आहे. 

विधानसभा अध्यक्षांना दिलेल्या पत्रात काय?

तशी तरतूद असल्याचे दिसले नाही. याबाबत चिंता व्यक्त करणारे आणि रोष व्यक्त करणारे एक पत्र गटनेते अजय चौधरी यांनी विधानसभा अध्यक्षांना लिहिले आहे. तसेच या समितीत आमचाही सहभाग असावा, नियमबाह्य आणि बेकायदेशीर कृती करू नये. विधिमंडळात शिवसेना पक्ष अधिकृतरित्या असताना आम्हाला उपरोक्त समितीच्या सदस्यांची शिफारस करण्यासाठी पत्र दिलेले नाही, असे सांगत अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आलेले आहेत. तशी तक्रारच अजय चौधरी यांनी दिली आहे.  

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळVidhan Bhavanविधान भवनEknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरे