शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

Maharashtra Political Crisis: शिंदे-फडणवीसांचा शिवसेनेला दणका! विधानसभा ‘या’ समितीतून ठाकरे गट बेदखल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2022 15:31 IST

Maharashtra Political Crisis: विधिमंडळातील एका महत्त्वाच्या समितीत शिवसेनेचा कोणताही सदस्य नसल्यामुळे त्यातून उद्धव ठाकरे गटाला बेदखल आले का, याची चर्चा रंगली आहे.

Maharashtra Political Crisis: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शपथ घेऊन ३८ दिवस झाल्यानंतर अखेर मंत्रिमंडळाच्या मुहुर्ताला मूर्त रुप आले. यात भाजपच्या ९ आणि शिंदे गटातील ९ आमदारांनी शपथ घेतली. यानंतर लगेचच नव्या शिंदे-भाजप सरकारने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गटाला मोठा दणका दिल्याचे सांगितले जात आहे. विधानसभेच्या एका महत्त्वाच्या समितीतून शिवसेनेचा कोणताही सदस्य नसल्यामुळे त्यातून उद्धव ठाकरे गटाला बेदखल करण्यात आल्याची चर्चा रंगली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, विधानसभेच्या कामकाज सल्लागारांची एक समिती असते. ही समिती महत्त्वाची मानली जाते. आणि या कामकाज सल्लागार समितीतून उद्धव ठाकरे गटाच्या एकाही सदस्याचा समावेश नसल्याचे सांगितले जात आहे. यासंदर्भात ठाकरे गटाचे विधिमंडळातील गटनेते अजय चौधरी यांनी विधानसभा अध्यक्षांकडे याबाबतची तक्रार केल्याची माहिती देण्यात आली आहे. 

ठाकरे गटातील एकाही सदस्याला समितीत संधी नाही?

विधिमंडळाचे अधिवेशन घेण्यात येते, तेव्हा कामकाज सल्लागार समितीची एक बैठक बोलावली जाते. या सल्लागार समितीत प्रत्येक पक्षाच महत्त्वाचे नेते आणि पदाधिकारी यांचा समावेश केला जातो. या सर्वानुमते अधिवेशनाची तारीख, ठिकाण यांसह अन्य बाबी ठरवण्यात येतात. यामध्ये प्रत्येकाचा सहभाग असतो. सर्वजण आपापली मते देऊन, अमूक एक गोष्ट करण्याबाबत सांगत असतात. मात्र, या सल्लागार समितीच्या बैठकीविषय शिवसेनेच्या म्हणजेच उद्धव ठाकरे गटाच्या आमदाराला पत्र आलेले नाही, अशी माहिती देण्यात आलेली आहे. 

विधानसभा अध्यक्षांना दिलेल्या पत्रात काय?

तशी तरतूद असल्याचे दिसले नाही. याबाबत चिंता व्यक्त करणारे आणि रोष व्यक्त करणारे एक पत्र गटनेते अजय चौधरी यांनी विधानसभा अध्यक्षांना लिहिले आहे. तसेच या समितीत आमचाही सहभाग असावा, नियमबाह्य आणि बेकायदेशीर कृती करू नये. विधिमंडळात शिवसेना पक्ष अधिकृतरित्या असताना आम्हाला उपरोक्त समितीच्या सदस्यांची शिफारस करण्यासाठी पत्र दिलेले नाही, असे सांगत अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आलेले आहेत. तशी तक्रारच अजय चौधरी यांनी दिली आहे.  

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळVidhan Bhavanविधान भवनEknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरे