शहरं
Join us  
Trending Stories
1
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
2
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
3
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
4
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
5
एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
6
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
7
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
8
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
9
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
10
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
11
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
12
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
13
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
14
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
15
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
16
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
17
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
18
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
19
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
20
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण

बाबासाहेब आंबेडकर रामभक्त होते, असंही भाजपा म्हणेल -प्रकाश आंबेडकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2018 09:40 IST

2019 च्या निवडणुकीआधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे रामभक्त होते असंही भाजपा जाहीर करू शकतं.

मुंबई- 2019 च्या निवडणुकीआधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे रामभक्त होते असंही भाजपा जाहीर करू शकतं, अशी टीका भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकरांचं नाव डॉ.भीमराव अंबेडकर नाही तर 'डॉ. भीमराव रामजी आंबेडकर' असं पूर्ण नाव वापरलं पाहिजे, असा शासनादेश उत्तर प्रदेश सरकारने जारी केला. उत्तर प्रदेश सरकारच्या या निर्णयावरून प्रकाश आंबेडकर आणि त्यांचे भाऊ आनंदराज आंबेडकर यांनी सरकारवर टीका केली आहे. भाजपाला 2019 च्या आधी त्यांचा अजेंडा निश्चित करायचा आहे. त्यामुळे हे सगळं फक्त मतांसाठी चाललं आहे, असंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हंटलं. 

बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावात बदल करण्यापूर्वी कुणीही त्यांच्या परिवाराशी संपर्क केला नसल्याचं आनंद आंबेडकर यांनी म्हंटलं. बाबासाहेब आंबेडकर हे मराठीत सही करतानाच भीमराव रामजी आंबेडकर अशी सही करत एरवी ते बी आर आंबेडकर अशीच सही करत असं आनंद आंबेडकर यांनी म्हंटलं आहे. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावात आताच रामजी का आणलं जातं आहे? यामागील राजकीय हेतू नेमका काय? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. 

दरम्यान, बसपानेही उत्तर प्रदेश सरकारच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. दाखविण्यासाठी व स्वस्तातील लोकप्रियता मिळविण्याचा हा प्रयत्न असल्याचं मायावती यांनी म्हटलं. भाजपाचे लोक दलित मतांसाठी ह्रदयावर दगड ठेवून बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतात आणि त्यांच्यावरून विविध नाटकं करतात, अशी टीका त्यांनी केली. महात्मा गांधींचं पूर्ण नाव कधीच कुणी घेत नाही. भाजपा सरकार जाहिरातींमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचं पूर्ण नाव लिहिते का? त्यामुळे फक्त बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावरून स्वार्थी राजकारण का केलं जातंय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.  

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरDr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकर