शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

आजीचं 'पुस्तकांचे हॉटेल'! अभिनव चळवळीतून करतात मराठी भाषेचं संवर्धन; शासन करणार गौरव

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 10:46 IST

वाचनसंस्कृती आपल्या घरापासून झाली पाहिजे. मी स्वतः आजही या वयात वाचन करते. दैनिकाचे पहिले आणि शेवटचे पान वाचून काढते.

नाशिक - वाचन चळवळ वाढावी आणि प्रत्येक नागरिकाने पुस्तके वाचली पाहिजेत यातून आपल्या मराठी भाषेचे जतन होईल, या उद्देशाने भीमाबाई जोंधळे या आजीबाईंनी 'पुस्तकाचे हॉटेल' सुरू केले. त्यांच्या या अभिनव हॉटेलमध्ये विविध वाङ्‌मयीन प्रकारातील सुमारे सहा ते सात हजार पुस्तके आहेत. हॉटेलात येणारा प्रत्येक जण पुस्तके चाळतो, वाचतो. त्यामुळे आपला उद्देश सफल होत असल्याचे आजीबाई सांगतात. 

नव्या पिढीला वाचनाकडे वळविण्याचा प्रयत्न करणाऱ्या भीमाबाई जोंधळे यांना नुकताच राज्य शासनाचा भाषा संवर्धन पुरस्कार जाहीर झाला आहे. त्याचे वितरण गुरुवारी मुंबईत होत आहे. त्यांनी पुत्र प्रवीण व नात अवनी यांच्यासह नाशिक लोकमत कार्यालयाला मंगळवारी भेट दिली. कार्यकारी संपादक मिलिंद कुलकर्णी यांनी स्वागत केले. 

लोकांनी वाचले पाहिजे, असे का वाटले?

मोबाइल वापराच्या जमान्यात लोक पुस्तकांपासून दुरावलेत, वाचन कमी झाले. मोबाइल गरजेचा असला तरी त्याचा वापर काहीसा कमी करून लोकांनी पुस्तकांकडे वळावे, पुस्तके वाचावित यासाठी ओझरजवळील दहावा मैल येथे 'पुस्तकांचे हॉटेल' सुरू केले. वाचनसंस्कृती आपल्या घरापासून झाली पाहिजे. मी स्वतः आजही या वयात वाचन करते. दैनिकाचे पहिले आणि शेवटचे पान वाचून काढते.

मराठी भाषा संवर्धन पुरस्कार मिळाल्याबद्दल काय वाटते? 

खूप समाधान वाटले. कोणताही प्रस्ताव पाठविला नव्हता, की कोणतीही शिफारस नाही. शासनाकडून थेट पुरस्कार जाहीर झाल्याचे खास 'लोकमत'कडून समजले आणि खूप आनंद झाला. त्यांनीच सर्वप्रथम बातमीही छापली. मुख्यमंत्र्यांचा फोटो रोज दैनिकात पाहायचे, आता प्रत्यक्ष त्यांच्या हातून पुरस्कार घेणार असल्याने आनंद वाटतो.

आजवर आपणास अनेक लोक भेटले त्यांचे काही अनुभव ?

पुस्तकाचे हॉटेलात येणाऱ्यांनी दिलेल्या भेटी आणि लिहिलेले अभिप्राय यांचे एखादे पुस्तक होऊ शकेल इतके त्यांनी वाचनाच्या या चळवळीविषयी लिहिले आहे. आपले काम पाहून नाशिकरोड येथील १०१ वर्षांचे तापसे बाबा आवर्जून भेटायला आले आणि त्यांनी हे काम पाहून त्यावर एक कविता सादर केली. एक दिव्यांग व्यक्ती स्वतः रिक्षा करून खास भेटायला आली, तर डॉ. भरत केळकर यांच्या मातोश्रींनी आग्रह केल्याने डॉक्टर स्वतः त्यांना व्हीलचेअखर घेऊन हॉटेलात आले होते. असे अनेक प्रसंग आहेत.

हॉटेल सुरू केले तेव्हा काही अडचणी आल्यात का?

कष्ट खूप केले ते अजूनही संपलेले नाही. सुरुवातीला काहींनी नावे ठेवली. पाटलाच्या घरातील बाई कपबशा धुते असे म्हणून टीका करायचे, परंतु आज तेच आपले कौतुक करतात, पुरस्कार मिळाला तेव्हा मोबाइलवर स्टेटस ठेवले. हॉटेलात लांबून येणारे ग्राहक जेंव्हा पुस्तके चाळतात, वाचतात आणि आवर्जून पुस्तके घेतात तेंव्हा खुप समाधान वाटते.

आपण कोरोना काळातही सामाजिक सेवा केलीय, त्याविषयी काय सांगाल.

होय, कोरोना काळातच नाही तर नोटाबंदीच्या काळातही पैसे नसतील तरी लोकांना खायला घातले. कोरोनात गावाकडे पायी निघालेल्यांसाठी चहा बनवून दिला.नोटाबंदीच्या काळात ज्यांच्याकडे पैसे नाहीत अशांसाठी 'या जेवण करा, जमेल तेव्हा पैसे द्या' असा उपक्रम राबविला. त्यावेळी अनेक चालकांना पोटभर अन्न देऊ शकले.

टॅग्स :Marathi Bhasha Dinमराठी भाषा दिन