शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

भीमा नदीचे रौद्ररूप; नदीकाठच्या सात गावांना पुराचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 14:41 IST

शेकडो एकर जमीन पाण्याखाली; तामदर्डी गावचा सायंकाळपर्यत संपर्क तुटणार;  मंगळवेढा- सोलापूर महामार्ग पाण्याखाली जाण्याची भीती

ठळक मुद्देसोलापूर-  मंगळवेढा हा महामार्ग उद्या पाण्याखाली जाण्याची शक्यताभीमा नदीकाठी राहणाºया नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याची तालुका प्रशासनाने तयारी सुरू केलीराहाटेवडीमार्गे गावात पाणी येत असल्याने बोराळे ते माचनूर, रहाटेवाडी ते बोराळे हा  मार्ग बंद होणार

मंगळवेढा : उजनी धरणातून १ लाख ५० क्युसेस व वीर मधून  १ लाख क्युसेस असे अडीच लाख क्युसेस चा महाविसर्ग भीमा नदीत सोडल्यामुळे मंगळवेढा तालुक्यातील नदीकाठच्या सात गावात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे.  दरम्यान, पूरपरिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी  तहसीलदार स्वप्निल रावडे यांनी पथके तयार केली आहेत. पाणी मोठ्या प्रमाणात सोडल्यामुळे नदीकाठी हाहाकार उडाला, असून भीमेने रौद्ररूप धारण केले आहे. तामदर्डी गावाचा संपर्क  तुटला आहे.

नदीकाठची मंदिरे पाण्याखाली गेली असून सोलापूर-  मंगळवेढा हा महामार्ग उद्या पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. भीमा नदीकाठी राहणाºया नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याची तालुका प्रशासनाने तयारी सुरू केली आहे़  तालुक्यातील बठाण, उचेठाण, ब्रह्मपुरी, माचनूर, तामदर्डी, अरळी, सिद्धापूर, तांडोर, या सात गावाजवळ पुराचे पाणी पोहचले आहे़  भीमा नदी पात्राबाहेर पडल्याने नदी काठची हजारो एकर जमीन पाण्याखाली गेली आहे़ पाण्याचा वेग असाच वाढत राहिला तर तामदर्दी गावाचा संपर्क तुटणार आहे़ तहसीलदार स्वप्निल रावडे यांनी नदीकाठच्या गावांना भेटी देऊन पूर परिस्थितीचा आढावा घेऊन नदीकाठी वस्ती करून राहणाºयांना सुरक्षितस्थळी जाण्याच्या सूचना दिल्या आहेत़ या मार्गावर राहाटेवडीमार्गे गावात पाणी येत असल्याने बोराळे ते माचनूर, रहाटेवाडी ते बोराळे हा  मार्ग बंद होणार आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरUjine Damउजनी धरणwater transportजलवाहतूकfloodपूरPandharpurपंढरपूर