शहरं
Join us  
Trending Stories
1
ईव्हीएममध्ये २५,००० मते आधीच होती, तरीही आमच्या पक्षाचे २५ उमेदवार जिंकली; 'RJD'च्या जगदानंद यांचा मोठा दावा
2
लाल किल्ला स्फोटात 'डिजिटल सस्पेंस'; स्विस ॲप 'थ्रीमा'चा वापर, सुरक्षा यंत्रणांपुढे मोठे आव्हान!
3
'फिदायीन' उमरनं घातला होता 'बूट बॉम्ब'; यात असं काय होतं? ज्याला म्हटलं जातं 'शैतान की मां'!
4
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाची ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन, सुप्रीम कोर्टात १९ नोव्हेंबरला सुनावणी
5
कागलमध्ये हसन मुश्रीफ-समरजित घाटगेंची युती, मुश्रीफांनी संजयबाबांची मागितली माफी; म्हणाले...
6
'या' बँकेच्या शेअरनं लोकांना केलं मालामाल, १५ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला भाव; किंमतही खिशाला परवडणारी! झुनझुनवालांचा मोठा डाव
7
IND vs SA : "सगळे घाबरुन खेळत आहेत..." डावललेल्या खेळाडूचं नाव घेत कैफ थेट 'गंभीर' मुद्यावर बोलला
8
शेख हसिनांना फाशी, हा भारताविरोधात अमेरिका-पाकिस्तानचा कट; संरक्षण विश्लेषकांचा खळबळजनक दावा
9
दिल्ली लाल किल्ला स्फोट प्रकरणात आणखी एक अटक; हमास स्टाईल हल्ला करण्याची होती योजना
10
भाजपने पहिला गुलाल उधळला! अख्खे पॅनल बिनविरोध विजयी; नगराध्यक्ष निवडणुकीकडे लक्ष
11
तेजस्वी यादवांना राजदने नेता म्हणून निवडले; लालू-राबडी बैठकीतूनच निघाले
12
Travel : परिकथेत रमणाऱ्यांनी आयुष्यात एकदा तरी 'या' ठिकाणांना भेट द्यायलाच हवी! आताच करून ठेवा यादी
13
ओलाची स्कूटर बंद पडली, कंपनी सर्व्हिस देईना; ग्राहकाने बाहेरून दुरुस्त केली, ८५०० रुपयांचे बिल झाले...
14
शेख हसीना यांना तात्काळ परत पाठवा; 'या' कराराचा हवाला बांगलादेशची भारताला विनंती
15
बापरे बाप! बंजी जंपिंग करताना आला हार्ट अटॅक, हवेतच मुलीचा मृत्यू? Video पाहून भरेल धडकी
16
WTC Final Scenario : टीम इंडियाचं गणित पुन्हा बिघडणार? फायनल खेळण्यासाठी जिंकावे लागतील एवढे सामने
17
नवऱ्यासोबत घटस्फोटाच्या चर्चा, सततच्या ट्रोलिंगवर भडकली ऐश्वर्या; म्हणाली, "साखरपुड्यापासूनच..."
18
Hyundai Creta चं टेन्शन वाढणार, येतायेत दोन 'धाकड' SUV; जाणून घ्या फीचर्स, काय असेल खास?
19
शेख हसीना यांना शिक्षा सुनावल्यानंतर ढाक्यामध्ये हिंसाचार उसळला, युनूस सरकार 'अ‍ॅक्शन'मोडवर; परिस्थिती बिघडली
20
आता तरी घ्या रे! ऋतुराज गायकवाडचा मोठा पराक्रम; पुजाराला मागे टाकत ठोठावला टीम इंडियाचा दरवाजा
Daily Top 2Weekly Top 5

भीमा-कोरेगाव प्रकरण, 'जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2018 18:05 IST

भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणाची जबाबदारी स्वीकारत मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी जातीअंत संघर्ष समितीनं केली आहे.

मुंबई- भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणाची जबाबदारी स्वीकारत मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी जातीअंत संघर्ष समितीनं केली आहे. 1 जानेवारी 2018 रोजी भीमा-कोरेगाव शौर्य दिन साजरा केला जातो. यानिमित्तानं विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी जाणा-या दलित, शोषित आणि बहुजनांवर हल्ले करण्यात आले.जागोजागी गाड्यांची मोडतोड व जाळपोळ केली जात आहे. यात अनेक लोक जखमी झाले असून, दोन जणांचा मृत्यूही झाला आहे, अशी माहिती जातीअंत संघर्ष समिती महाराष्ट्रानं केली आहे. या हल्ल्यास हिंदुत्ववादी संघटनेचे जातीयवादी नेते संभाजी भिडे व मिलिंद एकबोटे हे सर्वस्वी जबाबदार असून, यांना अनुसूचित जाती-जमाती कायद्याच्या कलमान्वये त्वरित अटक करा, असं विधान जातीअंत संघर्ष समिती महाराष्ट्रानं केलं आहे.हल्ल्याच्या तीन दिवस आधी वडू-बुद्रूक येथील संभाजी महाराजांच्या समाधीचा निर्माता गोविंद (महार) गायकवाड यांची समाधी गावातील जातीयवाद्यांनी उद्ध्वस्त केलीय. त्यामुळे जातीय तणाव निर्माण झाला असतानाही पोलिसांनी कोणावरही कारवाई केली नाही आणि जातीवाद्यांना मोकाट सोडल्यामुळे या हिंदुत्ववादी, जातीवादी धर्मांध शक्तीचे मनोबल वाढले आहे, त्यातूनच हे हल्ले झाले, असे आमचे मत आहे. या संदर्भात शासनाचे गृहराज्यमंत्री व राज्याचे मुख्यमंत्री यांचा हलगर्जीपणा जबाबदार आहे. मुख्यमंत्र्यांनी वडू-बुद्रक येथील घटनेची गंभीर दखल घेऊन जातीयवाद्यांवर कठोर कारवाई केली असती तर हे हल्ले झाले नसते.आमच्या मते मुख्यमंत्री ह्या जातीयवादी संघटनेचे छुपे समर्थक आहेत आणि त्यांना दलित बहुजनांमध्ये जातीय तणाव वाढवून राजकीय लाभ घेण्याचे कट कारस्थान ते करीत आहेत, त्यामुळेच त्यांनी हा हिंसाचार रोखण्यास कोणतीही कारवाई न करता अप्रत्यक्षपणे चेतावणी दिली.या हिंसाचार वाढवण्यास मुख्यमंञी जबाबदार असल्याने त्यांनी नैतिकतेच्या करणास्तव त्वरित राजीनामा द्यावा, अशी मागणी जातीअंती संघर्ष समितीचे राज्य निमंत्रक कॉ. शैलेंद्र कांबळे व कॉ. सुबोध मोरे यांनी केली आहे. तसेच या हिंसाचाराच्या निषेधार्थ 03 जानेवारी 2018 रोजी महाराष्ट्रातील समग्र फुले, आंबेडकरी, पुरोगामी व समतावादी, परिवर्तनवादी, पक्ष संघटनांनी जे महाराष्ट्र बंद करण्याचे अवाहन केले, त्यास आम्ही पाठिंबा देत आहोत. शांततापूर्ण लोकशाही मार्गाने कडकडीत बंद पाळावा, असे आवाहन जातीअंत संघर्ष समिती महाराष्ट्राकडून करण्यात आली आहे. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBhima-koregaonभीमा-कोरेगाव