शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
2
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
3
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
4
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
5
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
6
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
7
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
8
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश
9
११३९ कोटी कधी मिळणार? १६ लाख शेतकरी अजून बँकांच्या केवायसीत अडकलेले
10
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार
11
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
12
देशभरातील आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; २० हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार
13
एमबीबीएस प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा उडाला गोंधळ; निकालापूर्वीच बीएएमएस, बीएचएमएस प्रवेश फेरी सुरू
14
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
15
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
16
सलग दुसऱ्या दिवशीही प्रसूतिगृहाचा काेंडवाडा; सहा महिला वेटिंगवर, दाटीवाटीने लावले बेड
17
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
18
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
19
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
20
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा

Bhaiyyu maharaj suicide: भय्यू महाराजांनी का आणि कुणामुळे केली आत्महत्या? त्यांना त्रास देणारी धक्कादायक कारणे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 16:43 IST

एकीकडे जीवापाड प्रेम करणारे लाखो अनुयायी तर दुसरीकडे या मूठभरांचा जाच भय्युजींना असह्य झाला होता.

मुंबई: अध्यात्मिक गुरु भय्यू महाराजांनी आत्महत्या केल्यानंतर मिळालेल्या पत्रात मानसिक तणावाचा उल्लेख आहे. हा मानसिक तणाव नेमका कशामुळे त्याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या निकटवर्तीय वर्तुळातून त्यांच्या जीवनातील ताण-तणावामागची काही कारणे समोर आली आहेत. 

अतिसंवेदनशील स्वभाव, सातत्याने जनोपयोगी कार्यक्रमाच्या आयोजनाचा आग्रह धरणाऱ्या भय्यू महाराराजांकडे आर्थिक साधने पुरेशी नसल्याने आर्थिक आघाडीवर त्रास सहन करावा लागत असे. त्यातच अनुयायी असल्याचा आव आणणाऱ्यांकडूनही अनेकदा फसवणूक केली जात असल्याची खंतही ते बोलून दाखवत असत. एकीकडे जीवापाड प्रेम करणारे लाखो अनुयायी तर दुसरीकडे या मूठभरांचा जाच भय्युजींना असह्य झाला होता. शारीरिक त्रासामुळे होणाऱ्या वेदनांकडे समाजाप्रति असलेल्या निष्ठेमुळे दुर्लक्ष करत भय्युजी कार्यरत राहत असतानाच त्यांना त्यांच्या संवेदनशील स्वभावाचा गैरफायदा घेऊन काही लबाड त्रास देत असत, त्याच्या वेदना ते जवळच्यांकडे बोलून दाखवत असत, असेही सुत्रांनी सांगितले.

भय्युजींच्या स्वभावाचा गैरफायदा घेऊन अशा लबाडांनी त्यांना खूप त्रास दिला होता. त्यातील काहींनी तर मागण्या पूर्ण न झाल्याने काहीवेळा त्यांची नाहक बदनामीही केली. भय्युजी अशा प्रवृत्तींबद्दल खाजगीत वेदनाही व्यक्त करत असत. त्यातच त्यांच्या गतायुष्यात झालेल्या त्रासामुळे त्यांच्या शरीरावरही परिणाम झाला होता. सातत्याने शारीरिक त्रासात असतानाही ते वैद्यकिय सल्ल्याकडे दुर्लक्ष करुन, त्रासाची पर्वा न करता सातत्यानं कार्यरत राहण्याचा प्रयत्न करत. त्यातून तो त्रास अधिकच वाढत असे. त्यांच्या बोलण्यातून हा शारीरिक त्रास परवडला मात्र आर्थिक फसवणूक, आपल्यांकडून विश्वासघाताच्या वेदना असह्य असल्याची वेदना व्यक्त होत असे. 

मधल्या काळात त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यातून ते सावरत असतानाच त्यांच्या मातोश्री आजारी होत्या. त्याच दरम्यान त्यांच्या पहिल्या पत्नीचे निधन झाले. स्वत:च्या लाडक्या लेकीचे कुहूचे जीवन घडवत ते जगत असतानाच जवळच्यांच्या आग्रहामुळे त्यांनी दुसरे लग्न केले. त्या लग्नाच्या निमित्तानेही एका वर्गाने त्यांच्या बदनामीचा घातकी प्रयत्न केला. त्यामुळेही ते आपली वेदना बोलून दाखवत असत. 

एकेकाळी महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात राजगुरुसारखा दबदबा असणाऱ्या भय्युजींना सामाजिक कार्यात पाहिजे तशी साथ मिळत नसल्यानेही त्यांना खूप त्रास होत असे. एकाचवेळी अनेक उपक्रम राबवताना त्यांची, त्यांच्या सूर्योदय आश्रमाची, त्यांच्या हितचिंतकांची खूपच धावपळ होत असे. तसेच आर्थिक तणावही सहन करावा लागत असे. त्यात पुन्हा जवळ असल्याचा आव आणून आर्थिक गैरफायदा घेणाऱ्यांकडून होणारा त्रास वेगळाच होता. त्यांच्या जवळच्या वर्तुळातील शिष्यांच्यामते अतिसंवेदनशील असल्याने भय्युजी महाराजांना या साऱ्याचा मानसिक त्रास होत असे. त्यातूनच त्यांचा मानसिक तणाव वाढत गेला आणि त्यांनी टोकाचे पाऊल उचलले असण्याची शक्यता आहे. 

 

टॅग्स :Bhayyuji Maharajभय्यूजी महाराजSuicideआत्महत्याDeathमृत्यू