शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Bhaiyyu maharaj suicide: भय्यू महाराजांनी का आणि कुणामुळे केली आत्महत्या? त्यांना त्रास देणारी धक्कादायक कारणे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 16:43 IST

एकीकडे जीवापाड प्रेम करणारे लाखो अनुयायी तर दुसरीकडे या मूठभरांचा जाच भय्युजींना असह्य झाला होता.

मुंबई: अध्यात्मिक गुरु भय्यू महाराजांनी आत्महत्या केल्यानंतर मिळालेल्या पत्रात मानसिक तणावाचा उल्लेख आहे. हा मानसिक तणाव नेमका कशामुळे त्याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या निकटवर्तीय वर्तुळातून त्यांच्या जीवनातील ताण-तणावामागची काही कारणे समोर आली आहेत. 

अतिसंवेदनशील स्वभाव, सातत्याने जनोपयोगी कार्यक्रमाच्या आयोजनाचा आग्रह धरणाऱ्या भय्यू महाराराजांकडे आर्थिक साधने पुरेशी नसल्याने आर्थिक आघाडीवर त्रास सहन करावा लागत असे. त्यातच अनुयायी असल्याचा आव आणणाऱ्यांकडूनही अनेकदा फसवणूक केली जात असल्याची खंतही ते बोलून दाखवत असत. एकीकडे जीवापाड प्रेम करणारे लाखो अनुयायी तर दुसरीकडे या मूठभरांचा जाच भय्युजींना असह्य झाला होता. शारीरिक त्रासामुळे होणाऱ्या वेदनांकडे समाजाप्रति असलेल्या निष्ठेमुळे दुर्लक्ष करत भय्युजी कार्यरत राहत असतानाच त्यांना त्यांच्या संवेदनशील स्वभावाचा गैरफायदा घेऊन काही लबाड त्रास देत असत, त्याच्या वेदना ते जवळच्यांकडे बोलून दाखवत असत, असेही सुत्रांनी सांगितले.

भय्युजींच्या स्वभावाचा गैरफायदा घेऊन अशा लबाडांनी त्यांना खूप त्रास दिला होता. त्यातील काहींनी तर मागण्या पूर्ण न झाल्याने काहीवेळा त्यांची नाहक बदनामीही केली. भय्युजी अशा प्रवृत्तींबद्दल खाजगीत वेदनाही व्यक्त करत असत. त्यातच त्यांच्या गतायुष्यात झालेल्या त्रासामुळे त्यांच्या शरीरावरही परिणाम झाला होता. सातत्याने शारीरिक त्रासात असतानाही ते वैद्यकिय सल्ल्याकडे दुर्लक्ष करुन, त्रासाची पर्वा न करता सातत्यानं कार्यरत राहण्याचा प्रयत्न करत. त्यातून तो त्रास अधिकच वाढत असे. त्यांच्या बोलण्यातून हा शारीरिक त्रास परवडला मात्र आर्थिक फसवणूक, आपल्यांकडून विश्वासघाताच्या वेदना असह्य असल्याची वेदना व्यक्त होत असे. 

मधल्या काळात त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यातून ते सावरत असतानाच त्यांच्या मातोश्री आजारी होत्या. त्याच दरम्यान त्यांच्या पहिल्या पत्नीचे निधन झाले. स्वत:च्या लाडक्या लेकीचे कुहूचे जीवन घडवत ते जगत असतानाच जवळच्यांच्या आग्रहामुळे त्यांनी दुसरे लग्न केले. त्या लग्नाच्या निमित्तानेही एका वर्गाने त्यांच्या बदनामीचा घातकी प्रयत्न केला. त्यामुळेही ते आपली वेदना बोलून दाखवत असत. 

एकेकाळी महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात राजगुरुसारखा दबदबा असणाऱ्या भय्युजींना सामाजिक कार्यात पाहिजे तशी साथ मिळत नसल्यानेही त्यांना खूप त्रास होत असे. एकाचवेळी अनेक उपक्रम राबवताना त्यांची, त्यांच्या सूर्योदय आश्रमाची, त्यांच्या हितचिंतकांची खूपच धावपळ होत असे. तसेच आर्थिक तणावही सहन करावा लागत असे. त्यात पुन्हा जवळ असल्याचा आव आणून आर्थिक गैरफायदा घेणाऱ्यांकडून होणारा त्रास वेगळाच होता. त्यांच्या जवळच्या वर्तुळातील शिष्यांच्यामते अतिसंवेदनशील असल्याने भय्युजी महाराजांना या साऱ्याचा मानसिक त्रास होत असे. त्यातूनच त्यांचा मानसिक तणाव वाढत गेला आणि त्यांनी टोकाचे पाऊल उचलले असण्याची शक्यता आहे. 

 

टॅग्स :Bhayyuji Maharajभय्यूजी महाराजSuicideआत्महत्याDeathमृत्यू