शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

भास्कर जाधवांचा राष्ट्रवादी सोडण्याचा निर्णय फसला ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2020 12:25 IST

विधानसभा निवडणुकीपूर्वीच जाधव यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. जाधव यांचे राष्ट्रवादीत वजन होते. मात्र त्यांनी तरी देखील राष्ट्रवादी पक्ष सोडला. यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले होते. 

मुंबई - प्रदीर्घ काळ लागलेल्या मंत्रीमंडळ विस्ताराला अखेर मुहूर्त लागला असला तर खातेवाटप अद्याप झाले नाही. त्यामुळे महाविकास आघाडीत सध्या बैठकांचा जोर वाढला आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात मंत्र्यांच्या नावाची घोषणा झाली आहे. मात्र मंत्रीमंडळाच्या यादीत नाव नसणारे शिवसेना नेते नाराज असल्याचे दिसून येत आहे. 

आधीच तानाजी सावंत यांना शिवसेनेने जय महाराष्ट्र केले आहे. त्यापाठोपाठ आता राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेले भास्कर जाधव नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वीच जाधव यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. जाधव यांचे राष्ट्रवादीत वजन होते. मात्र त्यांनी तरी देखील राष्ट्रवादी पक्ष सोडला. यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले होते. 

दरम्यान राज्यातील बदलेली राजकीय स्थिती आणि त्यामुळे तयार झालेले नवीन समिकरणे यामुळे अनेक नेत्यांची गोची झाली आहे. एकमेकांविरुद्ध लढलेल्या नेत्यांना आता सत्तेत राहून जनतेची काम करावी लागणार आहे. शिवसेनेकडून अनेक संभाव्य नेत्यांना मंत्रीमंडळातून डावलण्यात आले आहे. त्यात भास्कर जाधव यांचा नंबर लागला आहे. मात्र आपल्याला प्रवेश करण्यापूर्वी उद्धव ठाकरे यांनीच शब्द दिला होता. असं जाधव यांनी सांगितले. 

विधानसभेचा मला दीर्घ अनुभव आहे. उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार देखील मला मिळालेला आहे. आपल्याला सत्तेचा मोह नाही, परंतु  मंत्रीपद मिळालं नाही. त्यामुळे मी कुठ कमी पडलो या विचारात असल्याचे जाधव यांचे म्हणणे आहे. एकूणच राष्ट्रवादी सोडून शिवसेनेसोबत येऊनही जाधव यांना फारसा फायदा झालेला दिसत नाही. किंबहुना राष्ट्रवादीच बरी होती, अशी चर्चा जाधव यांच्या समर्थकांमध्ये आहे.