शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

"कोंबडीवाले, बेडूक...'; थेट कुडाळातून भास्कर जाधवांचा राणेंवर हल्लाबोल, केले गंभीर आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2022 15:10 IST

Bhaskar Jadhav Vs Narayan Rane:आमदार भास्कर जाधव यांनी राणे पितापुत्रांवर घणाघाती टीका केली. तसेच त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले.

सिंधुदुर्ग - शिवसेना आमदार वैभव नाईक यांच्या समर्थनार्थ आज कुडाळमध्ये एका विराट मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. या मोर्चानंतर उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित करताना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी राणे पितापुत्रांवर घणाघाती टीका केली. तसेच त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले. राणेंना गेल्या आठ वर्षांत कुणी सभेसाठी बोलावलेलं नाही. नेते देशाचे आणि गल्लीतलं कुत्रही विचारत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

भास्कर जाधव म्हणाले की, सिंधुदुर्गातील कोंबडीवाले, बेडूक यांनी रे रोडला एक प्रोजेक्ट उभा केला. या प्रोजेक्टमध्ये ३०० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला. त्यांच्याविरोधात ईडीची कारवाई सुरू करावी म्हणून याच भाजपामधील किरीट सोमय्यांची मागणी करण्यात आली होती. आज मंत्रिमंडळात बसलेले ५०-५५ टक्के लोक, आमदार यांच्यावर भाजपाने गंभीर आरोप केले होते. तेच लोक भाजपामध्ये गेल्यावर अगदी साफ स्वच्छ होतात. निरमा पावडरचा कारखानाच भाजपाच्या घरात सुरू झाला आहे, असा टोला भास्कर जाधव यांनी लगावला.

या कोंबडीवाल्यांनी साडे अठरा वर्षांपूर्वी यांनी शिवसेना सोडली. उद्धव ठाकरे यांच्यावर बोलतच नाही. मात्र नारायण राणे हे गेली १८ वर्षे एकच वाक्य बोलताहेत की मी शिवसेना सोडली आणि शिवसेना संपली. उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्रिपद गेलं आणि शिवसेना संपली, बरं मीसुद्धा शिवसेना सोडली होती. पण टीका करण्याची एक मर्यादा असते, असे भास्कर जाधव म्हणाले.

या राणेंना गेल्या आठ वर्षांत कुणी सभेसाठी बोलावलेलं नाही. नेते देशाचे आणि गल्लीतलं कुत्रही विचारत नाही. नुसती उद्धव ठाकरेंची सभा झाली की मीडियासमोर येऊन बोलतात. मी ३९ वर्षे शिवसेनेत काम केलं. मग ३९ वर्षे काय दाढ्या करत होतात काय. आज बाळासाहेब असते तर त्यांनी राणेंना विचारले असते की, त्यावेळी अंधेरी-गोरेगावला म्हशीचे तबेले होते. शिवसेनेने काहीच केलं नाही, मग मुख्यमंत्रीपदापर्यंत गेलेल्या तुम्ही काय म्हशी भादरत होतात का? अशी बोचरी टीका भास्कर जाधव यांनी नारायण राणेंवर केली.

यावेळी जाधव यांनी भाजपाच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या प्रादेशिक पक्षांबाबतच्या भूमिकेवरही टीका केली. ते म्हणाले की, आज स्वातंत्र्याला ७५ वर्षे झाली आहे. या ७५ वर्षात कुठल्याही राज्यकर्त्याने विरोधी पक्षाचा छळवाद मांडला नव्हता. तो भाजपाने मांडलाय. भाजपाचे अध्यक्ष म्हणतात की, छोटे पक्ष शिल्लकच ठेवायचे नाही. राहील तो भाजपाच. या देशाचे गृहमंत्री महाराष्ट्रात येऊन शिवसेनेला जमीन दाखवू, असे म्हणतात, असा आरोप त्यांनी केला.    

टॅग्स :Bhaskar Jadhavभास्कर जाधवNarayan Raneनारायण राणेShiv SenaशिवसेनाVaibhav Naikवैभव नाईक