शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

ED-CBI मागे लावून खंडणी वसुल केली जाते; इलेक्टोरल बाँड्सवरुन राहुल गांधींचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2024 21:39 IST

'नरेंद्र मोदी ईव्हीएमशिवाय निवडणूक जिंकू शकत नाही.'

Bharat Jodo Nyay Yatra: काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप आज(दि.17) मुंबईमधील छत्रपती शिवाजी पार्कवर झाला. या India आघाडीतील अनेक नेत्यांनी हजेरी लावली. यावेळी सभेला संबोधित करताना राहुल गांधी यांनी केंद्रातील भाजप सरकारवर विविध मुद्द्यांवरुन जोरदार हल्लाबोल केला. आम्ही एका पक्षाविरोधात किंवा एका व्यक्तीविरोधात लढत नाही आहोत. आम्ही एका शक्तीविरोधात लढत आहोत. या शक्तीने देशातील सर्व केंद्रीय संस्था आपल्या मुठीत ठेवल्या आहेत, अशी टीका राहुल यांनी केली.

नरेंद्र मोदी फक्त मुखवटा...राहुल गांधी पुढे म्हणतात, नरेंद्र मोदी फक्त मुखवटा आहेत. ज्याप्रकारे बॉलिवूडचे हिरो दररोज एक रोल प्ले करतात, त्याप्रमाणे मोदी दररोज काही ना काही गोष्टी करत असतात. ही शक्ती त्यांच्याकडून ते करुन घेते. नरेंद्र मोदी एक पोकळ व्यक्ती आहेत. आज देशात आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू करण्यासाठी अनेक दिवसांचा वेळ लागतोत. पण, सरकारने एका लग्नासाठी फक्त दहा दिवसात आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू केले. यात काही चूक नाही, पण अशीच तत्परता देशातील इतर ठिकाणी दाखवा ना. देशातील ठरावीक व्यक्तींसाठी कायदे केले जातात.

आम्ही नरेंद्र मोदींविरोधात नाही, तर एका शक्तीविरोधात लढत आहोत; राहुल गांधींचा घणाघात

आज देशात 50 टक्के लोक मागास आहेत. 15 टक्के दलित, 8 टक्के आदिवासी, 15 मायनोरिटी आहेत. पण, मीडियातील मालकांमध्ये एकही दलित, मागास किंवा आदिवासी नाही. त्यांची चूक नाही, कारण तेदेकील मुखवटे आहेत. देशातील उद्योग क्षेत्रातही कोणीच दलित, मागास, आदिवासी नाही. आज केंद्रातील 90 अधिकारी या देशाला चालवतात, त्यात फक्त 3 मागास, 3 दलित आणि एक आदिवासी आहे. 

EVM शिवाय निवडणूक जिंकू शकत नाहीनरेंद्र मोदी ईव्हीएमशिवाय निवडणूक जिंकू शकत नाही. मी आयोगाला म्हणालो होतो की, विरोधकांना ही मशीन उघडून दाखवा. या मशीनमध्ये मत केल्यावर जो कागद निघतो, त्या कागदाची मोजणी करा. पण, आयोगाने कागद मोजण्यास नकार दिला. हा देश काही निवडक उद्योगपतींच्या हातात गेलाय आणि मोदी तुमचे  लक्ष विचलित करण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी करातत. आज देशात चाळीस वर्षातील सर्वाधिक बेरोजगारी आहे. पण, मीडियात तुम्हाला हे कधीच दाखवले जाणार नाही. आज देशात चीनमधून आलेल्या गोष्टी विकल्या जातात. याचा फायदा चीनला आणि भारतालील ठराविक उद्योगपतींना होतो. 

इलेक्टोरल बाँड्सद्वारे खंडणी सुरूसध्या देशात इलेक्टोरल बाँड्सद्वारे खंडणी घेतली जात आहे. आधी कंपनीला कॉन्ट्रॅक्ट देतात, मग कंपनीकडून देणगी घेतातते. एखाद्या कंपनीने देणगी दिली नाही, तर कंपनीविरोधात ईडी सीबीआय लावली जाते आणि खंडणी वसुल केली जाते. या देशात फक्त ठराविक 20-25 कंपन्यांचे राज्य असावे, अशी या शक्तीची इच्छा आहे. या शक्तीला देशातील लहान उद्योग नष्ट करायचे आहेत. जे लोक या देशाला पुढे आणू शकतात, हे त्यांनाच नष्ट करू पाहत आहेत. या शक्तीविरोधात तुम्हाला आवाज उठवावा लागेल. तुम्ही सगळे भारत माता आहात. आमच्यासोबत देशातील तरुणांचीही जबादारी आहे. सर्वांनी सोबत येऊन या शक्तीचा सामना करायचा आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी यावेळी केली.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीBharat Jodo Yatraभारत जोडो यात्राMumbaiमुंबईBJPभाजपा